विधानपरिषद निवडणूक म्हणजे आता तन, मन लावून नव्हे तर धन लावून लढण्याचा प्रकार झाली आहे. या आधीही अपक्षांना मॅनेज करून, इतर पक्षातल्या नाराजांना गोंजारून अनेकांनी या निवडणुकीत बाजी मारली आहे. मात्र यावेळची निवडणूक ही हटके ठरली. विधानसभा निवडणुकीच्यावेळी शिवसेना - भाजप युती आणि काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधात समर्थ पर्याय असल्याचा दावा करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले होते. युती आणि काँग्रेस कसे नालायक आहेत, असं सांगत त्यांनी प्रचाराची राळ उडवून दिली होती. नवनिर्माण तर काही झाले नाही. मात्र पहिल्याच फटक्यात मनसेचे तेरा आमदार निवडून आले. तेरातल्या चौघांनी भर सभागृहात अबू आझमीला झापडवले. मग मनसेच्या या चार आमदारांना निलंबनाची कायदेशीर चपराक लगावण्यात आली. तेरामधून चार वजा झाले आणि 'नऊ'निर्माण मात्र प्रत्यक्षात साकार झालं.
विधानसभा निवडणुकीत मनसेचे तेरा आमदार निवडून आले हे सत्य आहे. मात्र या तेरा आमदारांमुळे शिवसेना भाजप युतीचे तीनतेरा वाजले, हेही तितकंच सत्य आहे. आणि यातूनच मनसेला काँग्रेसची फूस तर नाही ना ? अशी चर्चा सुरू झाली. शिवसेना - भाजप युतीची अभेद्य मराठी वोटबँक काँग्रेसच्या बाटग्यांना फोडता येत नव्हती. मात्र मनसेसारख्या घरभेद्यांमुळे मराठी माणसांच्या मतांमध्ये फूट पाडण्यात त्यांना यश आलं. शिवसेना - भाजपला मनसेमुळे झालेल्या मतविभागणीमुळे अनेक जागा गमवाव्या लागल्या. परिणामी या 'राज'कृपेमुळे अशोक चव्हाणांची पुन्हा मुख्यमंत्रीपदी प्राणप्रतिष्ठापणा झाली. काँग्रेस पुन्हा सत्तेत आली. मात्र त्याच काँग्रेसने मनसेचे चार आमदार निलंबीत केले. आणि त्यांचे निलंबन रद्द करण्यासाठी मनसेला नाक घासत शरण आणलं. ज्या विधानसभा निवडणुकीत मनसेने काँग्रेसला लक्ष्य केले होते. पुन्हा त्यांच्याच दारी निलंबन रद्द करण्यासाठी मनसेला जावं लागलं. काँग्रेसने पुरेपूर किंमत वसूल केली. शेवटी काँग्रेस हा शेठजींचाच पक्ष. टक्केवारीची सवय असलेल्या धनिक काँग्रेजींनी मनसेची मते फुकटात पदरात पाडून घेतली.
राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांच्या पक्षाचे निर्णय घेण्यासाठी त्यांना कुणाच्या मताची गरजही नाही. आमदारांचे निलंबन रद्द करण्यासाठी त्यांना काँग्रेसला पाठिंबा द्यावाही लागला असेल. मात्र यातून हे स्पष्ट झालंय की, त्यांच्या स्वार्थासाठी ते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टीच्या कळपातही जाऊ शकतात. मनसे म्हणजे मराठी मतांमध्ये फूट पाडण्यासाठी काँग्रेसने निर्माण केलेला 'राज'मार्ग आहे, हे आता सगळ्यांनाच पटू लागलं आहे. मनसेने विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसला दिलेल्या पाठिंब्यानंतर आता त्यांनीच जनतेच्या काय भावना आहेत ? हे जाणून घ्यावं.
खमंग फोडणी - मनसेचा शिवसेना विरोध आता थांबायला हवा. कारण यातून नुकसान होतंय ते फक्त मराठी माणसांच. मनसेचा शिवसेना द्वेष काँग्रेसच्या पथ्यावर पडतोय, ही साधी बाब त्यांना कळत नसेल का ? मात्र 'नवरा मेला तरी चालेल, पण सवत रंडकी झाली पाहीजे' ही मनसेची स्वार्थी विचारसरणी मराठी माणसाच्या मुळावर आणि काँग्रसच्या पथ्यावर पडतेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वाढदिवसानिमीत्त मुंबई महापालिकेच्या आकाराचा केक कापला. काँग्रेसही महापालिका कापण्यासाठी टपलेली आहेच. आणि मनसेची ही कृती महापालिकेचा हा केक काँग्रेसच्या तोंडात पडावा यासाठी प्रयत्न करणारी अशीच आहे. आता जनतेसमोर मनसे आणि मुंबई महापालिकेचा केकही आला आहे. कुणाच्या हातात सुरी आहे, तेही दिसलं आहे. त्यामुळे या ढोंग्यांचे पितळ उघडे पडले आहे.
Monday, June 14, 2010
Friday, May 7, 2010
तुरूंगातील धर्मांतरे आणि आमची जात
तुरूंगात येणा-यांचा धर्म काय असू शकतो ? असा प्रश्नच मनात येत नाही. कारण तुरूंगात येणारे त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा भोगण्यासाठी तिथं आलेले असतात. त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षाही मिळायलाच हवी, असाच विचार सर्वसामान्य लोक करतात किंवा करतील. मात्र ज्यांना धर्म वाढवायचा आहे, त्यांना हे पटणार नाही. कारण तुरूंगात येणा-या अनेकांची आर्थिक स्थिती चांगली नसते, गुन्हेगारीचा शिक्का बसलेला असतो, कायद्याची लढाई लढण्यासाठी वकिल लावण्याची ऐपत नसते. आणि अशाच कैद्यांना आता टार्गेट करण्यात येतंय. परिस्थितीपुढे हतबल असलेल्या कैद्यांना पद्धतशीरपणे मुस्लिम धर्मात ओढलं जातंय.
यासाठी National Islamic Prisons Foundation या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र हे सर्व जगात विस्तारलेलं आहे. सौदी अरेबिया सारखे श्रीमंत देश आणि जगभरातले श्रीमंत मुस्लिम या संस्थेला पैसा पुरवतात. 'The Washington Times' ने 16 जुलै 2006 च्या त्यांच्या अंकात याविषयी माहिती देणारा सविस्तर लेख प्रकाशित केला आहे.
एकट्या अमेरिकेत मागील दशकात तीन लाख कैद्यांचे धर्मांतर करण्यात आले आहे. तर सध्या दरवर्षी यात लाख पस्तीस हजार कैद्यांची भर पडतेय. यात मोठ्या संख्येनं निग्रो कैद्यांचा समावेश आहे. श्वेतवर्णीय अमेरिकन तुम्हाला तुच्छ लेखतात. तर इस्लाम समानतेची वागणूक देतो, अशी उदाहरणं देवून निग्रोंचा बुद्धीभ्रम करून त्यांना धर्मांतरासाठी तयार केलं जातं आहे. 1960 मध्ये अमेरिकेत 20 मशिदी होत्या. आता त्यांची संख्या ही दोन हजारांच्यावर गेली आहे. इतकंच नव्हे तर चर्चपेक्षा मशिदींची मोठ्या संख्येनं तिथं वाढ होत आहे. अमेरिकेच्याच कैद्यांचे आणि गुन्हेगारांचे धर्मांतर करून तिथं 'इस्लामिक आर्मी' उभारून युद्ध पुकारण्याचा एक आंतरराष्ट्रीय कट पूर्णत्वाला नेण्याच्या दिशेने हे काम सुरू आहे.
9/11 च्या दहशतवादी हल्ल्याची पद्धत ही सर्वाथाने वेगळी होती. अमेरिकेच्याच विमानांचा वापर करून त्यांच्याच देशाचे वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवण्यात आले होते. त्याच थिअरी नुसार अमेरिकेतल्याच गुन्हेगारांचे धर्मांतर करून त्यांना दहशतवादी करायचे आणि ही 'इस्लामिक आर्मी' त्यांच्यावरच उलटवण्याचा हा धूर्त डाव आहे. ज्या धर्माचा स्वीकार केल्यानंतर हातात बंदूक येत असेल तो धर्म नव्हे तर 'अधर्म'च म्हणायला हवा.
इंग्लंडमध्येही मुस्लिम गुंडांच्या दबावाला बळी पडून अनेक ख्रिश्चन कैद्यांना धर्मांतर करावं लागलं आहे. मुस्लिम गुंडांच्या संघटित टोळ्या इंग्लंडमधल्या तुरूंगांमध्ये शरिअतनुसार कार्य करत असल्याची बातमीही काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेले दोन खतरनाक दहशतवादी Richard Reid आणि Dirty bomber नावाने कुप्रसिद्ध असलेला Padilla या दोघांचेही धर्मांतर करून त्यांना मुस्लिम करण्यात आलं होतं. आणि त्यानंतर ते पकडले गेले थेट दहशतवादी कृत्यातच. अमेरिका आणि इंग्लंड हे प्रगत, सुरक्षीत देशही इस्लामी धर्मांतराच्या कटातून सुटलेले नाहीत. युरोपातल्या अनेक देशांमध्येही असे प्रकार उघडकीस आले आहेत. 'जिहाद जेन' या नावाने कुप्रसिद्ध झालेली कोलीन ही सुद्धा एक धर्मांतरीत अमेरिकन युवती होती. इस्लामचा स्वीकार केल्यानंतर हे लोक जिहादकडे कसे काय आकर्षित होतात ? हा सुद्धा एक संशोधनाचाच विषय आहे.
सौदी अरेबियात खास प्रशिक्षण घेतलेले अनुयायी या धर्मांतराच्या कार्यात गुंतलेले आहेत. काफिरांची हत्या केल्यावर जन्नत मिळते. 99 सुंद-या उपभोगण्यासाठी मिळतात असे उच्च इस्लामिक धार्मिक 'संस्कार' त्यांच्यावर केले जातात. परिणामी मुस्लिम झालेले अनेक कैदी नंतर इस्लामी दहशतवादाकडे वळल्याचे सिद्ध झालं आहे. अर्थात या कैद्यांचे धर्मांतर करण्याचा मुळ उद्देशही तोच असतो.
muslim converts association, association converts islam, converts to islam, conversion into islam, want become muslim, want convert muslim हे शब्द गुगलवर टाईप केले तरी धर्मांतराशी रिलेटेड असलेल्या अनेक साईट्स बघायला मिळतात. त्यावरून धर्मांतराचे हे कार्य किती विविध पातळीवरून पद्धतशीरपणे सुरू आहे, हे लक्षात येतं. अनेक सुशिक्षीत, आधुनिक म्हणवणारे मुस्लिमही या कार्यात गुंतलेले आहेत. कितीतरी तथाकथित सुधारणावाद्यांचा 'बुरखा' या निमीत्ताने टराटरा फाटला आहे. धर्माचा प्रसार करणं हे पुण्याचं काम आहे, ही बालपणापासून मनावर बिंबवलेली शिकवण जगभरातले मुस्लीम प्रत्यक्ष आचरणात आणत आहेत.
पाकिस्तानच्या क्रिकेट संघात असलेला एकमेव क्रिकेट खेळाडू युसूफ योहान्ना धर्मांतर करून महंमद योहान्ना बनला. http://www.pakistanchristianpost.com/ ही वेबसाईट बघितली तरी पाकिस्तानातल्या ख्रिश्चनांवर किती अमानवीय अत्याचार सुरू आहेत, हे लक्षात येईल. अर्थात हे सर्व अत्याचार ख्रिश्चनांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार करावा यासाठीच सुरू आहेत. आणि दिवसेंदिवस पाकिस्तानातल्या ख्रिश्चनांची संख्याही घटत चालली आहे.
माधुरी गुप्ता या प्रकरणावरूनही बराच बोध घेता येण्यासारखं आहे. माधुरी गुप्ताने सहा वर्षांपूर्वीच धर्मांतर केल्याचीही वृत्तपत्रामध्ये बातमी आली आहे. त्यामुळे धर्मांतर करवून घेण्याच्या किडीची व्याप्ती लक्षात येते. कैदी, गरीब इतकंच नव्हे तर नोकरीत नाराज असलेले सुद्धा या धर्मांधांचे लक्ष होवू शकतात.
केरळमध्ये काही महिन्यांपूर्वी उघडकीस आलेल्या 'लव जिहाद'मुळेही चांगलीच खळबळ उडाली होती. अर्थात हा जिहादही हिंदू तरूणींना मुस्लिम करण्यासाठी केलेला एक कट होता. मुस्लिम युवकांना परदेशातून पैसा पुरवून हिंदू तरूणींना प्रेमाच्या पाशात ओढलं जातं. एकदा का या तरूणी मुस्लिम युवकांच्या भूलथापांना बळी पडल्या की त्यांचा मुस्लिम धर्मात प्रवेश करून त्यांच्या बरोबर विवाह रचला जातो. त्यानंतर त्या अभागी तरूणींचा ब्रेन वॉश करून त्यांना दहशतवादी कृत्यात सहभाग घ्यायला भाग पाडलं जायचं. दोन तरूणींनी याला विरोध केल्यानंतर हा राष्ट्रघातकी कट उघडकीला आला होता. हिंदूंचे होणारे धर्मांतर हे धर्मांतर नव्हे तर राष्ट्रांतरच आहे. कारण मुस्लिमांना त्यांची संख्या वाढवून इस्लामी राज्य स्थापन करायचं आहे. त्यासाठी हिंदू तरूणी, दलित, आदिवासी हे त्यांचे सॉफ्ट टार्गेट आहेत.
दाऊद इब्राहिम टोळीचे गुंडही तुरूंगात धर्मांतर करण्याच्या कार्यात गुंतले असल्याचं उघड झालं आहे. कोल्हापूरच्या कळंब तुरूंगातल्या तीन शीख कैद्यांनी शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीला पाठवलेल्या पत्रामुळे तिथल्या कटाचा सुगावा पोलिसांना लागला होता. हिंदू कैद्यांना सुटकेसाठी कायदेशीर मदत, महिना दोन हजार रूपयांचे प्रलोभन दाखवून त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारायला लावण्याचे उद्योग सुरू होते. आर्थर रोड जेलमध्येही या प्रकारचे प्रयत्न करण्यात आले आहेत. मुंबईत मागे गाजलेल्या सिरीअल किलींग प्रकरणात 'बिअर मॅन' रवींद्र कंट्रोले याचंही धर्मांतर झालेलं आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 'माझी जन्मठेप' या त्यांच्या आत्मचरित्रातही अंदमानच्या तुरूंगात तिथले पठाण इंग्रजांच्या वरदहस्ताने हिंदू कैद्यांचे कशाप्रकारे धर्मांतर करायचे याचा उल्लेख केलेला आहे. ( आता हा भस्मासूर इंग्रजांवर उलटला आहे. शेवटी करावे तसे भरावे, म्हणतात ते काही खोटं नाही. ) कैदी आहेत म्हणून समाजाने त्यांच्याकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. गुन्हेगार हे आपल्या धर्मात राहिले काय किंवा दुस-या धर्मात गेले काय ? हा विचार किती चूकीचा आहे, हे सावरकरांनी साध्या सोप्या उदाहरणाद्वारे पटवून दिलं आहे. गुन्हेगारांची मुले, ही गुन्हेगार होतील असं नाही. त्यामुळे गुन्हेगार असले तरी त्यांना मुस्लिम होऊ देणं देश हिताच्यादृष्टीने परवडणारं नाही. असली दूरदृष्टी सावरकरांनी किती तरी वर्ष आधी दाखवली होती. आपले डोळे आता तरी उघडणार आहेत का ?
खमंग फोडणी - धर्म वाढवण्यासाठी काय काय उद्योग सुरू आहेत ते आपण बघितलं. मात्र आपल्या देशातील नेते अजूनही जातीच्या बाहेर पडायला तयार नाहीत. फुले, शाहू, आंबेडकरांचा जयघोष करायचा, आणि जातीचेच राजकारण करायचे हा आपल्या राजकारण्यांचा धर्म आहे. जातीनुसार जनगणना झाली म्हणजे, कोणत्या जातीची लोकसंख्या किती हे कळेल. आणि मग त्यानुसार त्या त्या जातींना गोंजारून, आरक्षणाचे आमिष दाखवून पुन्हा मतांचे राजकारण करायचे. सत्ता प्राप्ती करायची हा राजकारण्यांचा डाव आहे. या निमीत्ताने राजकारण्यांनी पुन्हा त्यांची 'जात' दाखवून दिली आहे. जनगणनेच्या मुद्यावरून राजकीय नेते कसे जातीवर येतात, हेच ढळढळीतपणे सिद्ध होत आहे. छगन भुजबळांनी तर समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींचे दुकान थाटलेलेच आहे. आणि आता या दुकानदाराबरोबर गोपीनाथ मुंडे यांची चुंबाचुंबी सुरू आहे. शिवसेनेत असताना हिंदूत्वावर बोलणारे भुजबळ आता पार जातीवर आलेत. तर संघाच्या मुशीत तयार झालेले गोपीनाथ मुंडेही जातीनुसार जनगणना व्हावी असा आग्रह धरत आहेत. अखंड हिंदूस्थानचे स्वप्न पाहणा-यांनीही जातीवर यावे, या सारखे दुसरे दुर्दैव तरी काय म्हणावे ? शाळेत प्रवेश घेताना लहान बालकाला चिटकवली जाणारी जात काढून टाकावी अशी राजकारण्यांची मानसिकता नाही. राज्यघटनेतील समतेच्या तत्वाला काळिमा फासण्याचेच काम राजकारणी करत आहेत. कारण जातपात पाहूनच त्यांनी आतापर्यंत राजकारण केलेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा तरी कशी करणार ? शेवटी जात नाही ती 'जात' असं म्हणायचं आणि शांत रहायचं. कारण आपली 'जात'कुळी ही शांत राहण्याचीच आहे.
यासाठी National Islamic Prisons Foundation या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र हे सर्व जगात विस्तारलेलं आहे. सौदी अरेबिया सारखे श्रीमंत देश आणि जगभरातले श्रीमंत मुस्लिम या संस्थेला पैसा पुरवतात. 'The Washington Times' ने 16 जुलै 2006 च्या त्यांच्या अंकात याविषयी माहिती देणारा सविस्तर लेख प्रकाशित केला आहे.
एकट्या अमेरिकेत मागील दशकात तीन लाख कैद्यांचे धर्मांतर करण्यात आले आहे. तर सध्या दरवर्षी यात लाख पस्तीस हजार कैद्यांची भर पडतेय. यात मोठ्या संख्येनं निग्रो कैद्यांचा समावेश आहे. श्वेतवर्णीय अमेरिकन तुम्हाला तुच्छ लेखतात. तर इस्लाम समानतेची वागणूक देतो, अशी उदाहरणं देवून निग्रोंचा बुद्धीभ्रम करून त्यांना धर्मांतरासाठी तयार केलं जातं आहे. 1960 मध्ये अमेरिकेत 20 मशिदी होत्या. आता त्यांची संख्या ही दोन हजारांच्यावर गेली आहे. इतकंच नव्हे तर चर्चपेक्षा मशिदींची मोठ्या संख्येनं तिथं वाढ होत आहे. अमेरिकेच्याच कैद्यांचे आणि गुन्हेगारांचे धर्मांतर करून तिथं 'इस्लामिक आर्मी' उभारून युद्ध पुकारण्याचा एक आंतरराष्ट्रीय कट पूर्णत्वाला नेण्याच्या दिशेने हे काम सुरू आहे.
9/11 च्या दहशतवादी हल्ल्याची पद्धत ही सर्वाथाने वेगळी होती. अमेरिकेच्याच विमानांचा वापर करून त्यांच्याच देशाचे वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवण्यात आले होते. त्याच थिअरी नुसार अमेरिकेतल्याच गुन्हेगारांचे धर्मांतर करून त्यांना दहशतवादी करायचे आणि ही 'इस्लामिक आर्मी' त्यांच्यावरच उलटवण्याचा हा धूर्त डाव आहे. ज्या धर्माचा स्वीकार केल्यानंतर हातात बंदूक येत असेल तो धर्म नव्हे तर 'अधर्म'च म्हणायला हवा.
इंग्लंडमध्येही मुस्लिम गुंडांच्या दबावाला बळी पडून अनेक ख्रिश्चन कैद्यांना धर्मांतर करावं लागलं आहे. मुस्लिम गुंडांच्या संघटित टोळ्या इंग्लंडमधल्या तुरूंगांमध्ये शरिअतनुसार कार्य करत असल्याची बातमीही काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेले दोन खतरनाक दहशतवादी Richard Reid आणि Dirty bomber नावाने कुप्रसिद्ध असलेला Padilla या दोघांचेही धर्मांतर करून त्यांना मुस्लिम करण्यात आलं होतं. आणि त्यानंतर ते पकडले गेले थेट दहशतवादी कृत्यातच. अमेरिका आणि इंग्लंड हे प्रगत, सुरक्षीत देशही इस्लामी धर्मांतराच्या कटातून सुटलेले नाहीत. युरोपातल्या अनेक देशांमध्येही असे प्रकार उघडकीस आले आहेत. 'जिहाद जेन' या नावाने कुप्रसिद्ध झालेली कोलीन ही सुद्धा एक धर्मांतरीत अमेरिकन युवती होती. इस्लामचा स्वीकार केल्यानंतर हे लोक जिहादकडे कसे काय आकर्षित होतात ? हा सुद्धा एक संशोधनाचाच विषय आहे.
सौदी अरेबियात खास प्रशिक्षण घेतलेले अनुयायी या धर्मांतराच्या कार्यात गुंतलेले आहेत. काफिरांची हत्या केल्यावर जन्नत मिळते. 99 सुंद-या उपभोगण्यासाठी मिळतात असे उच्च इस्लामिक धार्मिक 'संस्कार' त्यांच्यावर केले जातात. परिणामी मुस्लिम झालेले अनेक कैदी नंतर इस्लामी दहशतवादाकडे वळल्याचे सिद्ध झालं आहे. अर्थात या कैद्यांचे धर्मांतर करण्याचा मुळ उद्देशही तोच असतो.
muslim converts association, association converts islam, converts to islam, conversion into islam, want become muslim, want convert muslim हे शब्द गुगलवर टाईप केले तरी धर्मांतराशी रिलेटेड असलेल्या अनेक साईट्स बघायला मिळतात. त्यावरून धर्मांतराचे हे कार्य किती विविध पातळीवरून पद्धतशीरपणे सुरू आहे, हे लक्षात येतं. अनेक सुशिक्षीत, आधुनिक म्हणवणारे मुस्लिमही या कार्यात गुंतलेले आहेत. कितीतरी तथाकथित सुधारणावाद्यांचा 'बुरखा' या निमीत्ताने टराटरा फाटला आहे. धर्माचा प्रसार करणं हे पुण्याचं काम आहे, ही बालपणापासून मनावर बिंबवलेली शिकवण जगभरातले मुस्लीम प्रत्यक्ष आचरणात आणत आहेत.
पाकिस्तानच्या क्रिकेट संघात असलेला एकमेव क्रिकेट खेळाडू युसूफ योहान्ना धर्मांतर करून महंमद योहान्ना बनला. http://www.pakistanchristianpost.com/ ही वेबसाईट बघितली तरी पाकिस्तानातल्या ख्रिश्चनांवर किती अमानवीय अत्याचार सुरू आहेत, हे लक्षात येईल. अर्थात हे सर्व अत्याचार ख्रिश्चनांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार करावा यासाठीच सुरू आहेत. आणि दिवसेंदिवस पाकिस्तानातल्या ख्रिश्चनांची संख्याही घटत चालली आहे.
माधुरी गुप्ता या प्रकरणावरूनही बराच बोध घेता येण्यासारखं आहे. माधुरी गुप्ताने सहा वर्षांपूर्वीच धर्मांतर केल्याचीही वृत्तपत्रामध्ये बातमी आली आहे. त्यामुळे धर्मांतर करवून घेण्याच्या किडीची व्याप्ती लक्षात येते. कैदी, गरीब इतकंच नव्हे तर नोकरीत नाराज असलेले सुद्धा या धर्मांधांचे लक्ष होवू शकतात.
केरळमध्ये काही महिन्यांपूर्वी उघडकीस आलेल्या 'लव जिहाद'मुळेही चांगलीच खळबळ उडाली होती. अर्थात हा जिहादही हिंदू तरूणींना मुस्लिम करण्यासाठी केलेला एक कट होता. मुस्लिम युवकांना परदेशातून पैसा पुरवून हिंदू तरूणींना प्रेमाच्या पाशात ओढलं जातं. एकदा का या तरूणी मुस्लिम युवकांच्या भूलथापांना बळी पडल्या की त्यांचा मुस्लिम धर्मात प्रवेश करून त्यांच्या बरोबर विवाह रचला जातो. त्यानंतर त्या अभागी तरूणींचा ब्रेन वॉश करून त्यांना दहशतवादी कृत्यात सहभाग घ्यायला भाग पाडलं जायचं. दोन तरूणींनी याला विरोध केल्यानंतर हा राष्ट्रघातकी कट उघडकीला आला होता. हिंदूंचे होणारे धर्मांतर हे धर्मांतर नव्हे तर राष्ट्रांतरच आहे. कारण मुस्लिमांना त्यांची संख्या वाढवून इस्लामी राज्य स्थापन करायचं आहे. त्यासाठी हिंदू तरूणी, दलित, आदिवासी हे त्यांचे सॉफ्ट टार्गेट आहेत.
दाऊद इब्राहिम टोळीचे गुंडही तुरूंगात धर्मांतर करण्याच्या कार्यात गुंतले असल्याचं उघड झालं आहे. कोल्हापूरच्या कळंब तुरूंगातल्या तीन शीख कैद्यांनी शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधक समितीला पाठवलेल्या पत्रामुळे तिथल्या कटाचा सुगावा पोलिसांना लागला होता. हिंदू कैद्यांना सुटकेसाठी कायदेशीर मदत, महिना दोन हजार रूपयांचे प्रलोभन दाखवून त्यांना मुस्लिम धर्म स्वीकारायला लावण्याचे उद्योग सुरू होते. आर्थर रोड जेलमध्येही या प्रकारचे प्रयत्न करण्यात आले आहेत. मुंबईत मागे गाजलेल्या सिरीअल किलींग प्रकरणात 'बिअर मॅन' रवींद्र कंट्रोले याचंही धर्मांतर झालेलं आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 'माझी जन्मठेप' या त्यांच्या आत्मचरित्रातही अंदमानच्या तुरूंगात तिथले पठाण इंग्रजांच्या वरदहस्ताने हिंदू कैद्यांचे कशाप्रकारे धर्मांतर करायचे याचा उल्लेख केलेला आहे. ( आता हा भस्मासूर इंग्रजांवर उलटला आहे. शेवटी करावे तसे भरावे, म्हणतात ते काही खोटं नाही. ) कैदी आहेत म्हणून समाजाने त्यांच्याकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. गुन्हेगार हे आपल्या धर्मात राहिले काय किंवा दुस-या धर्मात गेले काय ? हा विचार किती चूकीचा आहे, हे सावरकरांनी साध्या सोप्या उदाहरणाद्वारे पटवून दिलं आहे. गुन्हेगारांची मुले, ही गुन्हेगार होतील असं नाही. त्यामुळे गुन्हेगार असले तरी त्यांना मुस्लिम होऊ देणं देश हिताच्यादृष्टीने परवडणारं नाही. असली दूरदृष्टी सावरकरांनी किती तरी वर्ष आधी दाखवली होती. आपले डोळे आता तरी उघडणार आहेत का ?
खमंग फोडणी - धर्म वाढवण्यासाठी काय काय उद्योग सुरू आहेत ते आपण बघितलं. मात्र आपल्या देशातील नेते अजूनही जातीच्या बाहेर पडायला तयार नाहीत. फुले, शाहू, आंबेडकरांचा जयघोष करायचा, आणि जातीचेच राजकारण करायचे हा आपल्या राजकारण्यांचा धर्म आहे. जातीनुसार जनगणना झाली म्हणजे, कोणत्या जातीची लोकसंख्या किती हे कळेल. आणि मग त्यानुसार त्या त्या जातींना गोंजारून, आरक्षणाचे आमिष दाखवून पुन्हा मतांचे राजकारण करायचे. सत्ता प्राप्ती करायची हा राजकारण्यांचा डाव आहे. या निमीत्ताने राजकारण्यांनी पुन्हा त्यांची 'जात' दाखवून दिली आहे. जनगणनेच्या मुद्यावरून राजकीय नेते कसे जातीवर येतात, हेच ढळढळीतपणे सिद्ध होत आहे. छगन भुजबळांनी तर समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींचे दुकान थाटलेलेच आहे. आणि आता या दुकानदाराबरोबर गोपीनाथ मुंडे यांची चुंबाचुंबी सुरू आहे. शिवसेनेत असताना हिंदूत्वावर बोलणारे भुजबळ आता पार जातीवर आलेत. तर संघाच्या मुशीत तयार झालेले गोपीनाथ मुंडेही जातीनुसार जनगणना व्हावी असा आग्रह धरत आहेत. अखंड हिंदूस्थानचे स्वप्न पाहणा-यांनीही जातीवर यावे, या सारखे दुसरे दुर्दैव तरी काय म्हणावे ? शाळेत प्रवेश घेताना लहान बालकाला चिटकवली जाणारी जात काढून टाकावी अशी राजकारण्यांची मानसिकता नाही. राज्यघटनेतील समतेच्या तत्वाला काळिमा फासण्याचेच काम राजकारणी करत आहेत. कारण जातपात पाहूनच त्यांनी आतापर्यंत राजकारण केलेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा तरी कशी करणार ? शेवटी जात नाही ती 'जात' असं म्हणायचं आणि शांत रहायचं. कारण आपली 'जात'कुळी ही शांत राहण्याचीच आहे.
Thursday, May 6, 2010
शिक्षा झाली, अंमलबजावणी कधी ?
दहशतवादी अजमल आमीर कसाबला विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आणि देशभरात एकच जल्लोष झाला. न्यायपालिकेनेही हा खटला त्वरेने पूर्णत्वास नेला. अनेक साक्षीदारांच्या साक्षी, उलट तपासणी या सर्व प्रक्रिया पार पाडून न्यायालयाने दिलेला निर्णय सामान्य नागरिकांना सुखावणारा होता. दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडलेला हा दहशतवादी म्हणजे मुंबई पोलिसांच्या असामान्य शौर्याचं प्रतीकच आहे. शहीद तुकाराम ओंबळे यांच्या बलिदानामुळे हा क्रुरकर्मा पोलिसांच्या हाती लागला. पाकिस्तानी दहशतवादाचा बुरखा जगासमोर टराटरा फाडता आला. भारतात दहशतवादी कारवाया करून जबाबदारी नाकारणा-या पाकिस्तानचे दात या निमीत्ताने घशात घालण्यात भारताला यश मिळालं.
मात्र या कसाबला फाशी कधी देणार ? हाच प्रश्न आता सगळ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. कारण आपल्या लोकशाहीचे मंदिर असणा-या संसदेवर हल्ला घडवून आणणारा आरोपी अफजल गुरू यालाही न्यायालयाने फाशीची ठोठावलेली शिक्षा अजून पूर्णत्वास गेलेली नाही. दहशतवादाच्या गुरूवर्यांवरच अजून राष्ट्रपतींचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे या कसाबचा हिसाब कधी होणार ?
कसाब या सापाला आता जिवंत ठेवून उपयोग होणार नाही. कारण मौलाना मसूद अझर याला 1994 साली श्रीनगरमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर 1995 मध्ये काही विदेशी पर्यटकांचे अपहरण करून अझरच्या सुटकेची मागणी करण्यात आली होती. मात्र मागणी मान्य न झाल्याने त्या पर्यटकांची हत्या करण्यात आली होती. मात्र डिसेंबर 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट 814 या विमानाचे अपहरण करून ते कंदहारमध्ये उतरवण्यात आलं, आणि त्या बदल्यात मौलाना मसूद अझर या सापाला सोडावं लागलं. नंतर या सापाने त्याची जात दाखवलीच. अर्थात सापाचा धर्म, दंश करणे हाच आहे. त्यामुळे तो त्याच्या धर्माला जागला. भारतीय संसदेवर त्याने हल्ला घडवून आणला. त्याआधी अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला घडवण्याच्या कटातही तो सामील होता. आणि मुंबईवरील हल्ल्यातही त्याचे नाव पुढे आले. पाकिस्ताननेही त्याच्यावर थातूरमातूर कारवाई केल्याचे दाखवले. मात्र त्या सापावर पाकिस्तानने कोणतेही आरोप ठेवलेले नव्हते.
आता पुन्हा तेच संकट घोंगावू लागलं आहे. कसाब या सापाला सोडवण्यासाठी त्याचे इतर साथीदार साप, कोणती तरी दहशतवादी कृती करण्याच्या आधीच त्याला फासावर लटकणं गरजेचं आहे. या सापाला गेट वे ऑफ इंडियासमोरच ठेचायला पाहिजे. तरच इतर सापांची वळवळ थांबेल. दहशतवाद्यांवर जरब बसवायची असेल तर अशी धाडसी कृती केल्याशिवाय पर्याय नाही. कारण काळ सोकावला तर अफजल गुरूची सुटका करण्याच्या मागणीसाठी जसे मानवाधिकारवाले रस्त्यावर उतरले होते. त्याप्रमाणे कसाबसाठीही गळा काढायला हे लोक कमी करणार नाहीत.
मात्र या कसाबला फाशी कधी देणार ? हाच प्रश्न आता सगळ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. कारण आपल्या लोकशाहीचे मंदिर असणा-या संसदेवर हल्ला घडवून आणणारा आरोपी अफजल गुरू यालाही न्यायालयाने फाशीची ठोठावलेली शिक्षा अजून पूर्णत्वास गेलेली नाही. दहशतवादाच्या गुरूवर्यांवरच अजून राष्ट्रपतींचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे या कसाबचा हिसाब कधी होणार ?
कसाब या सापाला आता जिवंत ठेवून उपयोग होणार नाही. कारण मौलाना मसूद अझर याला 1994 साली श्रीनगरमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर 1995 मध्ये काही विदेशी पर्यटकांचे अपहरण करून अझरच्या सुटकेची मागणी करण्यात आली होती. मात्र मागणी मान्य न झाल्याने त्या पर्यटकांची हत्या करण्यात आली होती. मात्र डिसेंबर 1999 मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या फ्लाईट 814 या विमानाचे अपहरण करून ते कंदहारमध्ये उतरवण्यात आलं, आणि त्या बदल्यात मौलाना मसूद अझर या सापाला सोडावं लागलं. नंतर या सापाने त्याची जात दाखवलीच. अर्थात सापाचा धर्म, दंश करणे हाच आहे. त्यामुळे तो त्याच्या धर्माला जागला. भारतीय संसदेवर त्याने हल्ला घडवून आणला. त्याआधी अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला घडवण्याच्या कटातही तो सामील होता. आणि मुंबईवरील हल्ल्यातही त्याचे नाव पुढे आले. पाकिस्ताननेही त्याच्यावर थातूरमातूर कारवाई केल्याचे दाखवले. मात्र त्या सापावर पाकिस्तानने कोणतेही आरोप ठेवलेले नव्हते.
आता पुन्हा तेच संकट घोंगावू लागलं आहे. कसाब या सापाला सोडवण्यासाठी त्याचे इतर साथीदार साप, कोणती तरी दहशतवादी कृती करण्याच्या आधीच त्याला फासावर लटकणं गरजेचं आहे. या सापाला गेट वे ऑफ इंडियासमोरच ठेचायला पाहिजे. तरच इतर सापांची वळवळ थांबेल. दहशतवाद्यांवर जरब बसवायची असेल तर अशी धाडसी कृती केल्याशिवाय पर्याय नाही. कारण काळ सोकावला तर अफजल गुरूची सुटका करण्याच्या मागणीसाठी जसे मानवाधिकारवाले रस्त्यावर उतरले होते. त्याप्रमाणे कसाबसाठीही गळा काढायला हे लोक कमी करणार नाहीत.
Monday, May 3, 2010
मुंबईचे शांघाय नव्हे, झाली गोगलगाय
मोटरमन संपावर गेले, आणि मुंबई रस्त्यावर आली. सरकार नावाची काही चीज या शहरात अस्तित्वात आहे किंवा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. लाखो प्रवासी अनेक स्थानकांवर ताटकळत थांबले. परंतू त्यांच्या वाहतूकीची कोणतीही व्यवस्था सरकारकडे नव्हती. बेस्ट बसेस तरी अशा किती पुरणार होत्या ? त्यामुळे सरकारने खाजगी गाड्यांनाही वाहतूकीची परवानगी दिली. इतर वेळी प्रवासी वाहतूक करणा-या खाजगी गाड्यांवर कारवाई केली जाते. मात्र आता काही पर्यायच नाही, म्हटल्यावर काय करणार ? काही मोटरमन एका शहराला वेठीस धरतात. आणि सरकार मख्खपणे त्याकडे पाहते. संयमाने वागणा-या प्रवाशांनीही मग अनेक ठिकाणी त्यांचा संताप व्यक्त केला.
राज्यात आणि देशात काँग्रेसचे सरकार सत्तेत आहे. सरकारच्या कारभा-यांना मुंबईचे शांघाय करण्याचे डोहाळे मागील काही वर्षांपासून लागले आहेत. आता आजच्या या मोटरमनच्या संपाने त्यांचे डोहाळ जेवण झाले, असं म्हणायला हरकत नाही. पायाभूत सुविधा कशाबरोबर खातात ? याचा सरकारला काही पत्ता तरी आहे का ? या सरकारला तर फक्त पैशांची टक्केवारी आणि जमिनी या व्यतीरिक्त काही कळत नाही.
या मुंबईत काँग्रेसचे सहा खासदार आहेत. आम आदमी स्थानकांवर ताटकळत होता. तेव्हा हे खासदार कुठे होते ? नको तेव्हा वाहिन्यांसमोर चमकेशगिरी करणारे हे खासदार या काळात आम आदमीला दिलासा देण्यासाठी का समोर आले नाहीत ? मुंबईचे शांघाय करायचे गाजर दाखवता. आणि आम मुंबईकर संकटात असतो तेव्हा तोंड लपवता. अशाने कसे होणार शांघाय ? मुंबईत पायाभूत सुविधांचा किती अभाव आहे, हेच या निमीत्ताने दिसून आले. काही हजार मोटरमन या शहराला वेठीस धरू शकतात. तेव्हा आपण या शहरात आणि राज्यात विदेशी गुंतवणूक व्हावी अशी अपेक्षा तरी कशी धरावी ?
मुंबईचे शांघाय हे राज्यकर्ते करू शकत नाहीत. कारण त्यासाठी अंगात हवी असणारी रग आणि प्रबळ इच्छाशक्तीचा त्यांच्यात अभाव आहे. परप्रांतियांचे लोंढे, बांग्लादेशी घुसखोर यासारख्यांना इथं सुविधा मिळू शकतील. मात्र पायाभूत सुविधांचा विकास होणे या आघाडी सरकारकडून शक्य नाही. मुंबईचे शांघाय तर होणार नाही. मात्र मुंबईचा वेग थांबवून तिची गोगलगाय करण्याची 'क्षमता' या सरकारमध्ये आहे हे नक्की.
राज्यात आणि देशात काँग्रेसचे सरकार सत्तेत आहे. सरकारच्या कारभा-यांना मुंबईचे शांघाय करण्याचे डोहाळे मागील काही वर्षांपासून लागले आहेत. आता आजच्या या मोटरमनच्या संपाने त्यांचे डोहाळ जेवण झाले, असं म्हणायला हरकत नाही. पायाभूत सुविधा कशाबरोबर खातात ? याचा सरकारला काही पत्ता तरी आहे का ? या सरकारला तर फक्त पैशांची टक्केवारी आणि जमिनी या व्यतीरिक्त काही कळत नाही.
या मुंबईत काँग्रेसचे सहा खासदार आहेत. आम आदमी स्थानकांवर ताटकळत होता. तेव्हा हे खासदार कुठे होते ? नको तेव्हा वाहिन्यांसमोर चमकेशगिरी करणारे हे खासदार या काळात आम आदमीला दिलासा देण्यासाठी का समोर आले नाहीत ? मुंबईचे शांघाय करायचे गाजर दाखवता. आणि आम मुंबईकर संकटात असतो तेव्हा तोंड लपवता. अशाने कसे होणार शांघाय ? मुंबईत पायाभूत सुविधांचा किती अभाव आहे, हेच या निमीत्ताने दिसून आले. काही हजार मोटरमन या शहराला वेठीस धरू शकतात. तेव्हा आपण या शहरात आणि राज्यात विदेशी गुंतवणूक व्हावी अशी अपेक्षा तरी कशी धरावी ?
मुंबईचे शांघाय हे राज्यकर्ते करू शकत नाहीत. कारण त्यासाठी अंगात हवी असणारी रग आणि प्रबळ इच्छाशक्तीचा त्यांच्यात अभाव आहे. परप्रांतियांचे लोंढे, बांग्लादेशी घुसखोर यासारख्यांना इथं सुविधा मिळू शकतील. मात्र पायाभूत सुविधांचा विकास होणे या आघाडी सरकारकडून शक्य नाही. मुंबईचे शांघाय तर होणार नाही. मात्र मुंबईचा वेग थांबवून तिची गोगलगाय करण्याची 'क्षमता' या सरकारमध्ये आहे हे नक्की.
Thursday, April 22, 2010
पैशांसाठी झटेल तोच पवारांना 'पटेल'
आयपीएलची फायनल आता अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातली मॅच पाहण्यासाठी क्रिकेट रसिक आतुर झाले आहेत. मात्र या मॅचेसपेक्षाही थरारक अशा लढती मैदानाबाहेर सुरू आहेत. शशी थरूर यांची विकेट केव्हाच गेली आहे. त्यामुळे आता दुसरी विकेट कुणाची जाणार याची चर्चाही आता सुरू झाली आहे. दुसरी विकेट कुणाची जाणार याची चर्चा सुरू व्हावी आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आयपीएलशी आमचा संबंध नाही, असं सांगायला सुरूवात करावी याचा अर्थ सुज्ञांना केव्हाच कळला. राष्ट्रवादीची ही भूमिका म्हणजे 'आम्ही नाही त्यातले आणि कडी लावा...' अशीच आहे.
खरं तर आयपीएलच्या विरोधात इतकी आदळआपट करण्याची मुळात गरजच नाही. कारण आयपीएलमुळे देशातल्या राजकारण्यांचा ब्लॅक मनी बिनबोभाट व्हाईट होतोय. पाणीटंचाईची धग कुणाला जाणवत नाही. अनेक दु:खांवरचं उत्तर म्हणजे आयपीएल म्हणता येईल. शेतक-यांच्या आत्महत्येचा मुद्दाही आता केव्हाच मागे पडलाय. केंद्रीय कृषीमंत्री असलेल्या शरद पवार यांनी शेतक-यांच्या आत्महत्येचा मुद्दा, या माध्यमातून निकाली काढला आहे. कारण शेतकरी नावाची काही चीज या देशात आहे, याचाच आता सगळ्यांना विसर पडला आहे. आयपीएलसाठी पैसा लावणे, आणि पैसा कमावणे हाच आता राजकारण्यांचा मुख्य व्यवसाय झाला आहे. त्यांच्या बरोबरीने माफियाही आलेच.
विदर्भात आतापर्यंत हजारो शेतक-यांनी आत्महत्या केल्या. मात्र शरद पवार त्यांचे अश्रू पुसण्यासाठी तिथं गेले नाहीत. मात्र आयपीएलसाठी त्यांनी छातीचा कोट केला. ललित मोदी यांचीही जीवापाड पाठराखण केली. मात्र हे प्रकरण अंगलट येणार याची जाणीव झाल्यानंतर नेहमीप्रमाणे हात झटकले. आता त्यांच्या पक्षाचे नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांची कन्या पूर्णा पटेल हिची चौकशी करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर पूर्णा पटेल हिन प्रफुल्ल पटेल यांच्या सचिवांकडे एक ई-मेलही पाठवला होता. पूर्णा पटेल आयपीएलसाठी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यरत आहे . तिनेच पटेल यांच्या सचिव चंपा भारद्वाजकडे मेल पाठवला होता . हाच मेल भारद्वाज यांनी १९ मार्च रोजी तत्कालिन परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरुर यांना फॉरवर्ड केला होता. या मेलमध्ये आयपीएलच्या दोन नव्या टीमसाठी होणा- या लिलावात कोणत्या कंपन्या सहभागी होणार आहेत आणि साधारण किती मोठ्या बोली लागणार अशी माहिती होती. पटेल यांची सचिव त्यांच्या परवानगीशिवाय एवढी हिंमत करणं शक्य नाही.
आता सुप्रिया सुळे यांनी पूर्णा पटेल या निर्दोष असल्याचं पक्क राष्ट्रवादी प्रमाणपत्र दिलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रफुल्ल पटेल राजीनामा देणार नाहीत, असं जाहीर केलंय. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एवढी तत्परता शेत-यांविषयी किंवा सामान्य जनतेविषयी कधी दाखवल्याचं आठवत नाही. मात्र आता प्रश्न सामान्यांशी नव्हे तर पैशाशी निगडीत आहे. आणि हाच पैसा राष्ट्रवादी काँग्रेसला हवा आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्या त्या भागातले सरंजामदार, बडे नेते, गुंड यांच्या पाठिंब्यानेच सुरू आहे. आणि या सर्वांना पोसण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. तो पैसा कुणाला 'पटेल' अथवा न 'पटेल' मात्र तो अशाच नेत्यांच्या मार्फत उभारावा लागतो. कोटीच्या कोटी उड्डाणे यशस्वी करायची असतील तर त्याला पर्याय नाही. पटेल यांनी एअर इंडियाचा 'महाराजा' भिकेला लावण्याची वेळ आणली आहे. मात्र पक्षासाठी हवी असणारी मनी पॉवरही तेच उभारू शकतात. 'जो जो करील मनोरंजन मुलांचे, जडेल प्रभुशी नाते तयांचे' याच पार्श्वभूमीवर 'जो जो जोडेल पैसा पक्षासाठी, जडेल त्यांच्याशा नाते राष्ट्रवादीचे' अशी सध्या स्थिती आहे.
खमंग फोडणी - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधला हनीमून कधीच संपला आहे. मुळात त्यांच्यात तसं नातं कधी नव्हतंच. होतो तो फक्त सत्तेचा व्यवहार. आणि या व्यवहारातूनच दोन्ही पक्षांमध्ये आता गँगवॉर सुरू झालंय. काँग्रेसच्या शशी थरूर यांची विकेट गेली आहे. आता काँग्रेस गँगही राष्ट्रवादीच्या एखाद्या नेत्याचा गेम केल्याशिवाय आता शांत बसणार नाही. आता कुणाला 'पटेल' अथवा न 'पटेल' मात्र जो पर्यंत एखाद्याचा गेम होणार नाही तोपर्यंत काँग्रेसचे नेते 'प्रफुल्ली'त होणार नाहीत.
खरं तर आयपीएलच्या विरोधात इतकी आदळआपट करण्याची मुळात गरजच नाही. कारण आयपीएलमुळे देशातल्या राजकारण्यांचा ब्लॅक मनी बिनबोभाट व्हाईट होतोय. पाणीटंचाईची धग कुणाला जाणवत नाही. अनेक दु:खांवरचं उत्तर म्हणजे आयपीएल म्हणता येईल. शेतक-यांच्या आत्महत्येचा मुद्दाही आता केव्हाच मागे पडलाय. केंद्रीय कृषीमंत्री असलेल्या शरद पवार यांनी शेतक-यांच्या आत्महत्येचा मुद्दा, या माध्यमातून निकाली काढला आहे. कारण शेतकरी नावाची काही चीज या देशात आहे, याचाच आता सगळ्यांना विसर पडला आहे. आयपीएलसाठी पैसा लावणे, आणि पैसा कमावणे हाच आता राजकारण्यांचा मुख्य व्यवसाय झाला आहे. त्यांच्या बरोबरीने माफियाही आलेच.
विदर्भात आतापर्यंत हजारो शेतक-यांनी आत्महत्या केल्या. मात्र शरद पवार त्यांचे अश्रू पुसण्यासाठी तिथं गेले नाहीत. मात्र आयपीएलसाठी त्यांनी छातीचा कोट केला. ललित मोदी यांचीही जीवापाड पाठराखण केली. मात्र हे प्रकरण अंगलट येणार याची जाणीव झाल्यानंतर नेहमीप्रमाणे हात झटकले. आता त्यांच्या पक्षाचे नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांची कन्या पूर्णा पटेल हिची चौकशी करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर पूर्णा पटेल हिन प्रफुल्ल पटेल यांच्या सचिवांकडे एक ई-मेलही पाठवला होता. पूर्णा पटेल आयपीएलसाठी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यरत आहे . तिनेच पटेल यांच्या सचिव चंपा भारद्वाजकडे मेल पाठवला होता . हाच मेल भारद्वाज यांनी १९ मार्च रोजी तत्कालिन परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरुर यांना फॉरवर्ड केला होता. या मेलमध्ये आयपीएलच्या दोन नव्या टीमसाठी होणा- या लिलावात कोणत्या कंपन्या सहभागी होणार आहेत आणि साधारण किती मोठ्या बोली लागणार अशी माहिती होती. पटेल यांची सचिव त्यांच्या परवानगीशिवाय एवढी हिंमत करणं शक्य नाही.
आता सुप्रिया सुळे यांनी पूर्णा पटेल या निर्दोष असल्याचं पक्क राष्ट्रवादी प्रमाणपत्र दिलंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रफुल्ल पटेल राजीनामा देणार नाहीत, असं जाहीर केलंय. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी एवढी तत्परता शेत-यांविषयी किंवा सामान्य जनतेविषयी कधी दाखवल्याचं आठवत नाही. मात्र आता प्रश्न सामान्यांशी नव्हे तर पैशाशी निगडीत आहे. आणि हाच पैसा राष्ट्रवादी काँग्रेसला हवा आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्या त्या भागातले सरंजामदार, बडे नेते, गुंड यांच्या पाठिंब्यानेच सुरू आहे. आणि या सर्वांना पोसण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. तो पैसा कुणाला 'पटेल' अथवा न 'पटेल' मात्र तो अशाच नेत्यांच्या मार्फत उभारावा लागतो. कोटीच्या कोटी उड्डाणे यशस्वी करायची असतील तर त्याला पर्याय नाही. पटेल यांनी एअर इंडियाचा 'महाराजा' भिकेला लावण्याची वेळ आणली आहे. मात्र पक्षासाठी हवी असणारी मनी पॉवरही तेच उभारू शकतात. 'जो जो करील मनोरंजन मुलांचे, जडेल प्रभुशी नाते तयांचे' याच पार्श्वभूमीवर 'जो जो जोडेल पैसा पक्षासाठी, जडेल त्यांच्याशा नाते राष्ट्रवादीचे' अशी सध्या स्थिती आहे.
खमंग फोडणी - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधला हनीमून कधीच संपला आहे. मुळात त्यांच्यात तसं नातं कधी नव्हतंच. होतो तो फक्त सत्तेचा व्यवहार. आणि या व्यवहारातूनच दोन्ही पक्षांमध्ये आता गँगवॉर सुरू झालंय. काँग्रेसच्या शशी थरूर यांची विकेट गेली आहे. आता काँग्रेस गँगही राष्ट्रवादीच्या एखाद्या नेत्याचा गेम केल्याशिवाय आता शांत बसणार नाही. आता कुणाला 'पटेल' अथवा न 'पटेल' मात्र जो पर्यंत एखाद्याचा गेम होणार नाही तोपर्यंत काँग्रेसचे नेते 'प्रफुल्ली'त होणार नाहीत.
Monday, April 12, 2010
भगवा झेंडा फडकला, काँग्रेसी दर्डा दडपला
संभाजीनगरवरील भगव्या झेंड्याची शान कायम राखण्यात शिवसेनेला पुन्हा एकदा यश आलं आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची पाशवी मसल आणि मनी पॉवर, त्याला मिळालेली आमदार प्रदीप जैस्वाल यांची रसद याच्या जोरावर भगवा उतरवण्याचे मनसूबे रचले जात होते. मात्र शहरातला मतदार हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा पाईक आहे. या शहराला दंगेखोर मुस्लिमांच्या भीतीतून दूर सारण्याचं काम शिवसेनेनं केलेलं आहे. अडीनडीला इथला शिवसैनिक मदतीला धावून जातो, या बाबी मतदारांच्या लक्षात आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मनपाची केलेली कोंडीही मतदारांच्या लक्षात आली. मनपाला शहरात पुरेसा पाणीपुरवठा करता येवू नये यासाठी सहकार्य करण्यात आलं नाही. आणि जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी आघाडी निवडून आली तर 24 तास पाणीपुरवठा करू असं आश्वासन दिलं. काँग्रेस आघाडीचा असं हे जीवघेणं राजकारण. प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणा-यांचीच ही अवलाद असावी की काय ? असा संशय येतो. मत देणार असाल तर पाणी. नाही तर खुशाल मरा असा यांचा डाव. मात्र हा डाव मतदारांनी ओळखला आणि काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस - जैस्वाल गटालाच पाणी पाजलं.
शिवसेनेने उपस्थित केलेल्या संभाजीनगर की औरंगाबाद ? या मुद्यावर अनेक बोरू बहाद्दरांनी टीका केली. शिवसेना भावनिक राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र संभाजीनगर हा भावनिक राजकारणाचा मुद्दा नाहीच. कारण तो अस्मितेचा प्रश्न आहे. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचे नाव देण्याचा मुद्दा आता पुढे आला आहे. परभणी कृषी विद्यापीठालाही वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं, अशी जूनी मागणी आहे. बॉम्बेचे मुंबई, मद्रासचं चेन्नई, कलकत्ताचं कोलकाता असं नव नामकरण झालंच आहे. देशात अनेक ठिकाणी विद्यापीठं आणि शहरांना नवी नावं देताना तो अस्मितेचा मुद्दा असल्याचं म्हटलं गेलं. अर्थात ते योग्यही होतं. वरील नाव बदलताना किंवा मागणी करताना ते भावनिक राजकारण असल्याचा आरोप केला जात नाही. मात्र संभाजीनगरचा मुद्दा उपस्थित झाल्यावरच अनेकांच्या पोटात कळ उठते. संभाजीनगर हा आमच्याही अस्मितेचा प्रश्न आहे. कृपया करून भगवी, हिरवी, निळी, पिवळी आणि इतर रंगांची अस्मिता अशी मिसळ करू नका. आमची तीच अस्मिता आणि शिवसेनेचे भावनिक राजकारण हा बेगडीपणा आता टाकून द्यायला हवा.
औरंगजेबाचं राज्य हे शिवाजी महाराजांच्या राज्यापेक्षा मोठं होतं. मात्र शिवाजी महाराजांच्या राज्यात असलेली लोकशाही औरंगजेबाकडे होती का ? शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थीतीत केलेला संघर्ष, सर्व धर्मियांना दिलेली समान वागणूक यांची तूलना होवू शकत नाही. जिझीया कर बसवणारा औरंगजेब आम्हाला नको आहे. शिखांच्या धर्मगुरूंची दिल्लीत भर चौकात हत्या करवणा-या औरंगजेबाचं नाव आमच्या शहराला नकोच आहे.
संभाजी महाराजांनी इस्लाम धर्म स्वीकारायला नकार दिल्याने त्यांना हालाहाल करून मारण्यात आलं. हा इतिहास औरंगाबाद या नावामुळे आठवतो. या नावाने ही जूनी जखम भळाभळा वाहते. औरंगजेबाला खुलताबादमध्ये जागा दिली आहे. त्यानं तिथंच रहावं. त्याचा पुळका येत असणा-यांनी हवं तर तिथं जावून सुंता करून घ्यावी. त्याला कुणाचाही विरोध नाही. मात्र संभाजीनगरला विरोध कराल तर आता खबरदार....
महापालिका निवडणुकीत उद्योगमंत्री राजेंद्र दर्डांचा पैशाचा महापूर, राष्ट्रवादीची रसद, जैस्वाल गटाचे रेडिमेड कार्यकर्ते असा फौजफाटा आघाडीला तारू शकला नाही. काँग्रेसचा 'पैसेवाला हाथ' आणि अब्दूल सत्तारांची 'लाथ ' ही मनी आणि मसल पॉवर मतदारांनी लाथाडली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचीही मधल्यामध्ये 'विखेट' गेली. माजी नगरसेवक गणेश तांबे यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवली.
शिवसेनेने महापालिका जिंकली असली तर त्यांनाही आता रस्त्यावर उतरावेच लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शुक्राचार्यांनी अडवलेलं पाणी संघर्ष करून सोडावंच लागेल. त्यासाठी जायकवाडीवर धडक मारावी लागली तरी बेहत्तर. महापालिकेसाठीच्या योजना आणि निधी मंजूर करून घेण्यासाठी युतीच्या आमदारांनी वैधानिक आयुधांचा वापर करून सरकारला जेरीस आणायला हवं.
शिवसेनेला मिळालेला हा कौल काँग्रेस आघाडीची पैशाची मस्ती उतरवणारा आहे. संभाजीनगर हे मराठवाड्याचं 'पॉवर हाऊस' आहे. इथं डौलाने फडकणारा भगवा मराठवाड्याचे प्रेरणा स्त्रोत आहे. विधानसभा निवडणुकीत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये मनसेमुळे काँग्रेस आघाडीला फायदा झाला होता. यावेळी मतदारांनी ही चूक टाळून मनसेला खड्याप्रमाणे बाजूला सारलं. आता शिवसेनेने या विजयाचा बोध घेऊन पुन्हा मैदानात उतरावं. मतदारांचा शिवसेनेवर विश्वास आहे. याची वारंवार प्रचिती येतच राहिल. शिवसेनेनं फक्त लढत रहावं.
खमंग फोडणी - संभाजीनगरची जनताही पैश्यांवर नव्हे तर विचारांवर प्रेम करणारी आहे. पैशाच्या 'लोकमता'मागे धावण्यापेक्षा संकटांचा 'सामना' करणा-यांना इथल्या मतदाराच्या मनात स्थान आहे. 'हॅलो औरंगाबाद' करणा-यांना आता मतदारांनी चांगलेच 'दर्डा'वले आहे. त्यामुळे आता 'गुडमॉर्निंग संभाजीनगर'.
निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मनपाची केलेली कोंडीही मतदारांच्या लक्षात आली. मनपाला शहरात पुरेसा पाणीपुरवठा करता येवू नये यासाठी सहकार्य करण्यात आलं नाही. आणि जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी आघाडी निवडून आली तर 24 तास पाणीपुरवठा करू असं आश्वासन दिलं. काँग्रेस आघाडीचा असं हे जीवघेणं राजकारण. प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणा-यांचीच ही अवलाद असावी की काय ? असा संशय येतो. मत देणार असाल तर पाणी. नाही तर खुशाल मरा असा यांचा डाव. मात्र हा डाव मतदारांनी ओळखला आणि काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस - जैस्वाल गटालाच पाणी पाजलं.
शिवसेनेने उपस्थित केलेल्या संभाजीनगर की औरंगाबाद ? या मुद्यावर अनेक बोरू बहाद्दरांनी टीका केली. शिवसेना भावनिक राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र संभाजीनगर हा भावनिक राजकारणाचा मुद्दा नाहीच. कारण तो अस्मितेचा प्रश्न आहे. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचे नाव देण्याचा मुद्दा आता पुढे आला आहे. परभणी कृषी विद्यापीठालाही वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं, अशी जूनी मागणी आहे. बॉम्बेचे मुंबई, मद्रासचं चेन्नई, कलकत्ताचं कोलकाता असं नव नामकरण झालंच आहे. देशात अनेक ठिकाणी विद्यापीठं आणि शहरांना नवी नावं देताना तो अस्मितेचा मुद्दा असल्याचं म्हटलं गेलं. अर्थात ते योग्यही होतं. वरील नाव बदलताना किंवा मागणी करताना ते भावनिक राजकारण असल्याचा आरोप केला जात नाही. मात्र संभाजीनगरचा मुद्दा उपस्थित झाल्यावरच अनेकांच्या पोटात कळ उठते. संभाजीनगर हा आमच्याही अस्मितेचा प्रश्न आहे. कृपया करून भगवी, हिरवी, निळी, पिवळी आणि इतर रंगांची अस्मिता अशी मिसळ करू नका. आमची तीच अस्मिता आणि शिवसेनेचे भावनिक राजकारण हा बेगडीपणा आता टाकून द्यायला हवा.
औरंगजेबाचं राज्य हे शिवाजी महाराजांच्या राज्यापेक्षा मोठं होतं. मात्र शिवाजी महाराजांच्या राज्यात असलेली लोकशाही औरंगजेबाकडे होती का ? शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थीतीत केलेला संघर्ष, सर्व धर्मियांना दिलेली समान वागणूक यांची तूलना होवू शकत नाही. जिझीया कर बसवणारा औरंगजेब आम्हाला नको आहे. शिखांच्या धर्मगुरूंची दिल्लीत भर चौकात हत्या करवणा-या औरंगजेबाचं नाव आमच्या शहराला नकोच आहे.
संभाजी महाराजांनी इस्लाम धर्म स्वीकारायला नकार दिल्याने त्यांना हालाहाल करून मारण्यात आलं. हा इतिहास औरंगाबाद या नावामुळे आठवतो. या नावाने ही जूनी जखम भळाभळा वाहते. औरंगजेबाला खुलताबादमध्ये जागा दिली आहे. त्यानं तिथंच रहावं. त्याचा पुळका येत असणा-यांनी हवं तर तिथं जावून सुंता करून घ्यावी. त्याला कुणाचाही विरोध नाही. मात्र संभाजीनगरला विरोध कराल तर आता खबरदार....
महापालिका निवडणुकीत उद्योगमंत्री राजेंद्र दर्डांचा पैशाचा महापूर, राष्ट्रवादीची रसद, जैस्वाल गटाचे रेडिमेड कार्यकर्ते असा फौजफाटा आघाडीला तारू शकला नाही. काँग्रेसचा 'पैसेवाला हाथ' आणि अब्दूल सत्तारांची 'लाथ ' ही मनी आणि मसल पॉवर मतदारांनी लाथाडली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचीही मधल्यामध्ये 'विखेट' गेली. माजी नगरसेवक गणेश तांबे यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवली.
शिवसेनेने महापालिका जिंकली असली तर त्यांनाही आता रस्त्यावर उतरावेच लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शुक्राचार्यांनी अडवलेलं पाणी संघर्ष करून सोडावंच लागेल. त्यासाठी जायकवाडीवर धडक मारावी लागली तरी बेहत्तर. महापालिकेसाठीच्या योजना आणि निधी मंजूर करून घेण्यासाठी युतीच्या आमदारांनी वैधानिक आयुधांचा वापर करून सरकारला जेरीस आणायला हवं.
शिवसेनेला मिळालेला हा कौल काँग्रेस आघाडीची पैशाची मस्ती उतरवणारा आहे. संभाजीनगर हे मराठवाड्याचं 'पॉवर हाऊस' आहे. इथं डौलाने फडकणारा भगवा मराठवाड्याचे प्रेरणा स्त्रोत आहे. विधानसभा निवडणुकीत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये मनसेमुळे काँग्रेस आघाडीला फायदा झाला होता. यावेळी मतदारांनी ही चूक टाळून मनसेला खड्याप्रमाणे बाजूला सारलं. आता शिवसेनेने या विजयाचा बोध घेऊन पुन्हा मैदानात उतरावं. मतदारांचा शिवसेनेवर विश्वास आहे. याची वारंवार प्रचिती येतच राहिल. शिवसेनेनं फक्त लढत रहावं.
खमंग फोडणी - संभाजीनगरची जनताही पैश्यांवर नव्हे तर विचारांवर प्रेम करणारी आहे. पैशाच्या 'लोकमता'मागे धावण्यापेक्षा संकटांचा 'सामना' करणा-यांना इथल्या मतदाराच्या मनात स्थान आहे. 'हॅलो औरंगाबाद' करणा-यांना आता मतदारांनी चांगलेच 'दर्डा'वले आहे. त्यामुळे आता 'गुडमॉर्निंग संभाजीनगर'.
Friday, April 9, 2010
तुम हमे वोट दो, हम तुम्हे पानी देंगे
महापालिका निवडणुकीचा प्रचार आज थंडावला. नवी मुंबई आणि संभाजीनगरसाठी 11 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. प्रचारासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दोन्ही शहरात सभा घेतल्या. जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी तर संभाजीनगरात धक्कादायक विधान केलं. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जैस्वाल गटाला सत्ता दिली तर शहराला 24 तास पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की, शहराला पुरवठा करण्यासाठी पुरेसं पाणी आहे. मात्र युतीची सत्ता असल्याने ते पाणी द्यायचं नाही, अशी भूमिका आघीडीने घेतली आहे. चला या निमीत्ताने झारीतले शुक्राचार्य जनतेला दिसले. तसंच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचं पाणीही जोखता आलं.
मुख्यमंत्र्यांनीही नवी मुंबईत वाढिव एसएफआयचं आश्वासन देताना आपण वाढपी असल्याचं सांगत मतदारांना एक प्रकारे काँग्रेसकडेच सत्ता सोपविण्याचे निर्देशच दिले. निवडणुकीत आश्वासनं काही नवी नाही. मात्र मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी आपण सत्ता कशा प्रकारे वाकवू शकतो याचीच प्रचिती दिली. नाही तरी काँग्रेस आघाडीच्या या राज्यात काही दिल्याशिवाय काही मिळत नाहीच. त्याला ही निवडणूक तरी कशी अपवाद ठरेल. अर्थात काँग्रेसच्या रक्तातच हा गुण आहे, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण देशाला जे काही स्वातंत्र्य मिळाले ते काँग्रेस मुळेच मिळाले असा दावा काँग्रेसवाले अगदी देश स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वीपासून करताहेत. बरं हे स्वातंत्र्य कसं मिळालं तर पाकिस्तान देवून. या न्यायाने काही दिल्याशिवाय काही मिळत नाही, हे खरंच.
काँग्रेसचे हे वाढपी मुख्यमंत्री सांगतात की ओळखीचा वाढपी असल्यावर शेवटच्या पंगतीत शेवटच्या रांगेत असला तरी बुंदी मिळते. आता ही बुंदी पात्रात पाडायची म्हणजे काँग्रेसला मत द्यावं लागणार असाच हा इशारा आहे. मात्र वाढप्याचाही हा काय नादानपणा म्हणायचा, राज्य चालवता आणि महापालिकेसाठीही तुमची औकात काय आहे ती दाखवून देता. महापालिका विरोधकांच्या ताब्यात असल्यावर विकास कामांना खीळ घालायची, सरकारकडून सहकार्य करायचे नाही. आणि पुन्हा विकास झाली नाही अशी बोंब ठोकायची. ही दुटप्पी नीती आता जगजाहीर झाली आहे. त्यामुळे जनतेनेही काँग्रेसची ही कुल्हेकुई ओळखून त्यांना त्यांची जागा दाखवून देणं गरजेचं आहे.
खमंग फोडणी - लग्न सराई आता सुरू झालेली आहे. त्यातल्या काही तिथी तर अगदीच दाट आहेत. त्यामुळे लग्नातच्या ठिकाणी पाहुणेमंडळींची मोठी धांदल उडणार आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने लग्नाच्या ठिकाणी पोचण्यासाठी घामाघूम होत आणि धावपळ करत जावं लागणार. लग्न लावल्यानंतर पंगतीला बसल्यावर अशोकरावांचा शोध घ्या. दिसल्यावर त्यांना हात दाखवा. आणि वाढिव बुंदी ताटात पाडून घ्या. कारण राज्याला आता नवा वाढपी मिळालाय. घ्या बुंदी.
मुख्यमंत्र्यांनीही नवी मुंबईत वाढिव एसएफआयचं आश्वासन देताना आपण वाढपी असल्याचं सांगत मतदारांना एक प्रकारे काँग्रेसकडेच सत्ता सोपविण्याचे निर्देशच दिले. निवडणुकीत आश्वासनं काही नवी नाही. मात्र मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी आपण सत्ता कशा प्रकारे वाकवू शकतो याचीच प्रचिती दिली. नाही तरी काँग्रेस आघाडीच्या या राज्यात काही दिल्याशिवाय काही मिळत नाहीच. त्याला ही निवडणूक तरी कशी अपवाद ठरेल. अर्थात काँग्रेसच्या रक्तातच हा गुण आहे, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण देशाला जे काही स्वातंत्र्य मिळाले ते काँग्रेस मुळेच मिळाले असा दावा काँग्रेसवाले अगदी देश स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वीपासून करताहेत. बरं हे स्वातंत्र्य कसं मिळालं तर पाकिस्तान देवून. या न्यायाने काही दिल्याशिवाय काही मिळत नाही, हे खरंच.
काँग्रेसचे हे वाढपी मुख्यमंत्री सांगतात की ओळखीचा वाढपी असल्यावर शेवटच्या पंगतीत शेवटच्या रांगेत असला तरी बुंदी मिळते. आता ही बुंदी पात्रात पाडायची म्हणजे काँग्रेसला मत द्यावं लागणार असाच हा इशारा आहे. मात्र वाढप्याचाही हा काय नादानपणा म्हणायचा, राज्य चालवता आणि महापालिकेसाठीही तुमची औकात काय आहे ती दाखवून देता. महापालिका विरोधकांच्या ताब्यात असल्यावर विकास कामांना खीळ घालायची, सरकारकडून सहकार्य करायचे नाही. आणि पुन्हा विकास झाली नाही अशी बोंब ठोकायची. ही दुटप्पी नीती आता जगजाहीर झाली आहे. त्यामुळे जनतेनेही काँग्रेसची ही कुल्हेकुई ओळखून त्यांना त्यांची जागा दाखवून देणं गरजेचं आहे.
खमंग फोडणी - लग्न सराई आता सुरू झालेली आहे. त्यातल्या काही तिथी तर अगदीच दाट आहेत. त्यामुळे लग्नातच्या ठिकाणी पाहुणेमंडळींची मोठी धांदल उडणार आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने लग्नाच्या ठिकाणी पोचण्यासाठी घामाघूम होत आणि धावपळ करत जावं लागणार. लग्न लावल्यानंतर पंगतीला बसल्यावर अशोकरावांचा शोध घ्या. दिसल्यावर त्यांना हात दाखवा. आणि वाढिव बुंदी ताटात पाडून घ्या. कारण राज्याला आता नवा वाढपी मिळालाय. घ्या बुंदी.
Subscribe to:
Posts (Atom)