Monday, April 12, 2010

भगवा झेंडा फडकला, काँग्रेसी दर्डा दडपला

संभाजीनगरवरील भगव्या झेंड्याची शान कायम राखण्यात शिवसेनेला पुन्हा एकदा यश आलं आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची पाशवी मसल आणि मनी पॉवर, त्याला मिळालेली आमदार प्रदीप जैस्वाल यांची रसद याच्या जोरावर भगवा उतरवण्याचे मनसूबे रचले जात होते. मात्र शहरातला मतदार हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा पाईक आहे. या शहराला दंगेखोर मुस्लिमांच्या भीतीतून दूर सारण्याचं काम शिवसेनेनं केलेलं आहे. अडीनडीला इथला शिवसैनिक मदतीला धावून जातो, या बाबी मतदारांच्या लक्षात आहेत.
निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मनपाची केलेली कोंडीही मतदारांच्या लक्षात आली. मनपाला शहरात पुरेसा पाणीपुरवठा करता येवू नये यासाठी सहकार्य करण्यात आलं नाही. आणि जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी आघाडी निवडून आली तर 24 तास पाणीपुरवठा करू असं आश्वासन दिलं. काँग्रेस आघाडीचा असं हे जीवघेणं राजकारण. प्रेताच्या टाळूवरील लोणी खाणा-यांचीच ही अवलाद असावी की काय ? असा संशय येतो. मत देणार असाल तर पाणी. नाही तर खुशाल मरा असा यांचा डाव. मात्र हा डाव मतदारांनी ओळखला आणि काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस - जैस्वाल गटालाच पाणी पाजलं.
शिवसेनेने उपस्थित केलेल्या संभाजीनगर की औरंगाबाद ? या मुद्यावर अनेक बोरू बहाद्दरांनी टीका केली. शिवसेना भावनिक राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र संभाजीनगर हा भावनिक राजकारणाचा मुद्दा नाहीच. कारण तो अस्मितेचा प्रश्न आहे. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचे नाव देण्याचा मुद्दा आता पुढे आला आहे. परभणी कृषी विद्यापीठालाही वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं, अशी जूनी मागणी आहे. बॉम्बेचे मुंबई, मद्रासचं चेन्नई, कलकत्ताचं कोलकाता असं नव नामकरण झालंच आहे. देशात अनेक ठिकाणी विद्यापीठं आणि शहरांना नवी नावं देताना तो अस्मितेचा मुद्दा असल्याचं म्हटलं गेलं. अर्थात ते योग्यही होतं. वरील नाव बदलताना किंवा मागणी करताना ते भावनिक राजकारण असल्याचा आरोप केला जात नाही. मात्र संभाजीनगरचा मुद्दा उपस्थित झाल्यावरच अनेकांच्या पोटात कळ उठते. संभाजीनगर हा आमच्याही अस्मितेचा प्रश्न आहे. कृपया करून भगवी, हिरवी, निळी, पिवळी आणि इतर रंगांची अस्मिता अशी मिसळ करू नका. आमची तीच अस्मिता आणि शिवसेनेचे भावनिक राजकारण हा बेगडीपणा आता टाकून द्यायला हवा.
औरंगजेबाचं राज्य हे शिवाजी महाराजांच्या राज्यापेक्षा मोठं होतं. मात्र शिवाजी महाराजांच्या राज्यात असलेली लोकशाही औरंगजेबाकडे होती का ? शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थीतीत केलेला संघर्ष, सर्व धर्मियांना दिलेली समान वागणूक यांची तूलना होवू शकत नाही. जिझीया कर बसवणारा औरंगजेब आम्हाला नको आहे. शिखांच्या धर्मगुरूंची दिल्लीत भर चौकात हत्या करवणा-या औरंगजेबाचं नाव आमच्या शहराला नकोच आहे.
संभाजी महाराजांनी इस्लाम धर्म स्वीकारायला नकार दिल्याने त्यांना हालाहाल करून मारण्यात आलं. हा इतिहास औरंगाबाद या नावामुळे आठवतो. या नावाने ही जूनी जखम भळाभळा वाहते. औरंगजेबाला खुलताबादमध्ये जागा दिली आहे. त्यानं तिथंच रहावं. त्याचा पुळका येत असणा-यांनी हवं तर तिथं जावून सुंता करून घ्यावी. त्याला कुणाचाही विरोध नाही. मात्र संभाजीनगरला विरोध कराल तर आता खबरदार....
महापालिका निवडणुकीत उद्योगमंत्री राजेंद्र दर्डांचा पैशाचा महापूर, राष्ट्रवादीची रसद, जैस्वाल गटाचे रेडिमेड कार्यकर्ते असा फौजफाटा आघाडीला तारू शकला नाही. काँग्रेसचा 'पैसेवाला हाथ' आणि अब्दूल सत्तारांची 'लाथ ' ही मनी आणि मसल पॉवर मतदारांनी लाथाडली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचीही मधल्यामध्ये 'विखेट' गेली. माजी नगरसेवक गणेश तांबे यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्यांना मतदारांनी त्यांची जागा दाखवली.
शिवसेनेने महापालिका जिंकली असली तर त्यांनाही आता रस्त्यावर उतरावेच लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शुक्राचार्यांनी अडवलेलं पाणी संघर्ष करून सोडावंच लागेल. त्यासाठी जायकवाडीवर धडक मारावी लागली तरी बेहत्तर. महापालिकेसाठीच्या योजना आणि निधी मंजूर करून घेण्यासाठी युतीच्या आमदारांनी वैधानिक आयुधांचा वापर करून सरकारला जेरीस आणायला हवं.
शिवसेनेला मिळालेला हा कौल काँग्रेस आघाडीची पैशाची मस्ती उतरवणारा आहे. संभाजीनगर हे मराठवाड्याचं 'पॉवर हाऊस' आहे. इथं डौलाने फडकणारा भगवा मराठवाड्याचे प्रेरणा स्त्रोत आहे. विधानसभा निवडणुकीत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकमध्ये मनसेमुळे काँग्रेस आघाडीला फायदा झाला होता. यावेळी मतदारांनी ही चूक टाळून मनसेला खड्याप्रमाणे बाजूला सारलं. आता शिवसेनेने या विजयाचा बोध घेऊन पुन्हा मैदानात उतरावं. मतदारांचा शिवसेनेवर विश्वास आहे. याची वारंवार प्रचिती येतच राहिल. शिवसेनेनं फक्त लढत रहावं.

खमंग फोडणी - संभाजीनगरची जनताही पैश्यांवर नव्हे तर विचारांवर प्रेम करणारी आहे. पैशाच्या 'लोकमता'मागे धावण्यापेक्षा संकटांचा 'सामना' करणा-यांना इथल्या मतदाराच्या मनात स्थान आहे. 'हॅलो औरंगाबाद' करणा-यांना आता मतदारांनी चांगलेच 'दर्डा'वले आहे. त्यामुळे आता 'गुडमॉर्निंग संभाजीनगर'.

5 comments:

  1. अरे बाबा तु सरळ आम्हाला सामना चा अंक वाचा असे सांगत जा ना. माझा ब्लॉग वाचा असे का सांगत असतोस. कधीतरी समतोल लिहिण्याचा प्रयत्न करा. ज्यादिवशी समतोल लिहाल त्यादिवशी तुमचा ब्लॉग मी अवश्य वाचतो.

    ReplyDelete
  2. SAHI SAHI

    Keep posting !

    And slowly improve the style :)
    Nice blog :)

    Keep it up

    ReplyDelete
  3. avghade saaheb tumhi vachu naka pan dusryanna tar vachu dya .

    ReplyDelete
  4. samtol mhanje kay? zombal ka kahi......

    ReplyDelete
  5. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर हा विजय युतीसाठी दिलासादायक आहे.आता युतीने याचा फायदा उठवयाला हवा. लोकांची कामे करण्यावर भर द्यायला हवा. आणि हो औरंगाबादचे संभाजीनगर हे नामकरण होण्याकरता एकदिलाने आणि सर्वशक्तीने प्रयत्न करायला हवेत.

    ReplyDelete