Friday, August 19, 2011

अण्णांचे आंदोलन, काँग्रेसचा आत्मक्लेश

अण्णा हजारेंच्या आंदोलनाला मिळणा-या पाठिंब्यामुळे धास्तावलेल्या काँग्रेस सरकारच्या पायाखालची वाळू सरकली. आणि त्यानंतर काँग्रेस सरकारचे सगळे निर्णयही चुकत गेले. अण्णा हजारेंना उपोषणाची परवानगी देण्यात आली नाही. जेपी पार्ककडे निघालेल्या अण्णांना अटक करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी त्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आंदोलनासाठी बिनशर्त अटींवर अडून बसलेल्या अण्णांनी तिहारमध्येच उपोषण सुरू ठेवलं. तर तिहारच्या बाहेर त्यांच्या समर्थकांची गर्दी वाढत गेली. अखेर सरकारने अण्णांना रामलीला मैदानावर उपोषणाची परवानगी दिली. काँग्रेस सरकारमध्ये या मुद्यावर किती गोंधळ उडालेला आहे, आणि या सरकारने आत्मविश्वास गमावल्याचं या घटनाक्रमातून सिद्ध होतं.
अण्णा हजारेंवर बेछूट आरोप करण्याची काँग्रेसच्या चाणक्यांची नीती सपशेल फसली. मनीष तिवारींच्या बेताल वक्तव्यानंतर काँग्रेस बॅकफूटवर गेली. तर पी. चिदंबरम, कपिल सिब्बल, अंबिका सोनी यांनीही त्यांच्या पातळीवर जितका गोंधळ उडवून देता येईल तितका उडवून दिला.
अण्णांच्या मागण्या मान्य होतील किंवा नाही, हा एक विषय आहे. मात्र इथं आपल्या चर्चा करायची आहे ती या मुद्यावर की, अण्णांना इतका पाठिंबा का मिळतोय ?
सामान्य नागरिकांचा विशेषत: तरूणांचा राजकीय पक्षांवरील विश्वास उडू लागला आहे का ? आणि जर याचं उत्तर होय असेल तर हा आपल्या लोकशाहीप्रधान देशाला धोकाच म्हणायला हवा. कारण आपल्या देशाचा जो काही विकास झाला आहे, तो याच पद्धतीतून झाला आहे. अर्थात देशाचं जे काही वाटोळं झालंय, तेही याच माध्यमातून झालंय हे ही नाकारता येणार नाही.
देशातल्या वाढत्या भ्रष्टाचारामुळं इथला तरूण व्यथित झालाय. सत्ताधारी भ्रष्टाचार संपवण्यासाठी नालायक आहेत. इतकंच नव्हे तर भ्रष्टाचा-यांना सरकारचा पाठिंबा आहे की काय ? असं वाटावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कॉमनवेल्थ घोटाळ्याप्रकरणी फक्त काँग्रेसचे खासदार सुरेश कलमाडी यांनाच तुरूंगात टाकण्यात आलं. मात्र या भ्रष्टाचारात सामील असलेले त्यांचे वरिष्ठ कधी गजाआड होणार ? हा सवाल सामान्य जनतेच्या आणि तरूणांच्या मनात आहे.
सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार, राजकीय नेत्यांची उघड होणारी भ्रष्टाचाराची प्रकरणे यामुळे देशातला तरूण निराश झाला होता. ही परिस्थिती त्याला बदलायची होती. मात्र विरोधी पक्ष या प्रश्नावर रस्त्यावर उतरत नव्हते. या प्रश्नावर लढण्याची ताकद आणि ऊर्मीसुध्दा विरोधी पक्षांनी गमावली की काय ? असा सवाल उपस्थित होत होता.
नालायक सत्ताधारी आणि निष्क्रीय विरोधक यांच्यातली ही स्पेस अण्णा हजारेंनी भरून काढली. एकाचवेळी सत्ताधा-यांवर आसूड ओढत असतानाच त्यांनी विरोधी पक्षांची भूमिकाही पार पाडली. इंडिया अगेनस्ट करप्शन या संघटनेचीही अण्णांना चांगलीच साथ मिळत आहे. मीडियानेही हा मुद्दा चांगलाच लावून धरलाय. अण्णांच्या आंदोलनाला मिळणा-या LIVE प्रसिद्धीमुळेही समाजात चांगलीच जनजागृती निर्माण होऊ लागली आहे. परिणामी अण्णांचे आंदोलन व्यापक होत चालले आहे. तर मधल्या मधे चुकीच्या निर्णयांमुळे काँग्रेसवर आत्मक्लेश करण्याची वेळ आली आहे.

Monday, July 25, 2011

द ग्रेट काँग्रेस सर्कस !

मणिशंकर अय्यर. काँग्रेस संस्कृतीत मुरलेल्या नेत्यांपैकी एक. मात्र आता त्यांच्यामुळं काँग्रेस मुख्यालयाच्या इमारतीची ओळखच बदलली गेली आहे. आता काँग्रेसचं मुख्यालय जणू काही सर्कसचा तंबू दिसायला लागलं आहे. याचं कारणही तसंच आहे. 'काँग्रेसमध्ये कुणाला पद मिळवायचं असतं, तर कुणाला पदाला मुकावं लागतं. त्यामुळे काँग्रेसमध्ये अशा प्रकारे सर्कस सुरू असते', असं विधान मणिशंकर अय्यर यांनी केलं आहे. बरं काँग्रेसच्या संस्कृतीचा आणि त्या पक्षाच्या इतिहासात पाहिल्यावर सर्कसमध्ये शोभावेत असे अनेक जोकर तिथं रूजले आणि चांगलेच फोफावलेसुद्धा. त्या जोकरांनी स्वत:चा विकास करून घेतला. मात्र त्यांच्या विदूषकी चाळ्यांमुळे देशाची स्थिती हास्यास्पद झाली.

काँग्रेसच्या सर्कशीचे रिंगमास्टर हे गांधी घराणं आहे. या रिंगमास्टरला खुश ठेवण्यासाठी सर्कशीतल्या प्राण्यांची आणि विदुषकांची कसरत सुरू असते. मग त्यातून कुणी 'इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा', असं विधान करण्यात धन्यता मानतात. एखादा छुटभैय्या नेता सोनिया गांधींनी पंतप्रधानपद स्वीकारावं यासाठी भर गर्दीत गाडीवर चढून डोक्याला पिस्तूल लावून फिरतो. सध्याचा लेटेस्ट विदुषक म्हणजे दिग्विजय सिंग. हा विदुषक सध्या बेफाम सुटला आहे. रिंगमास्टर सोनिया गांधी आणि ज्युनिअर रिंग मास्टर राहुल गांधी यांना खुश करण्यासाठी त्यानी फक्त सुंता करून घेण्याचीच बाकी ठेवली आहे. आपल्या बेताल वक्तव्यांनी या विदुषकाने भारतीय राजकारणाचं जगात हसं करून ठेवलं आहे.

कलमाडींचा झाला गझनी

काँग्रेसच्या या सर्कसमधला आणखी एक कलाकार म्हणजे सुरेश कलमाडी. मात्र आता या कलमाडींना स्मृतीभंश झाला आहे. त्यांनी आतापर्यंत इतका भ्रष्टाचार करून ठेवला आहे की, त्यामुळे पैसे कुठेकुठे ठेवलेत हे लक्षात ठेवताना त्यांच्या बुद्धीवर ताण पडला. परिणामी या धक्क्यामुळं त्यांना स्मृतीभंश झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरेश कलमाडींचा भ्रष्टाचारच इतका व्यापक आणि चौफेर प्रमाणात होता की, त्याचा आकडा नेमका किती असावा यावरूनही अजून वाद आहे.


आता सुरेश कलमाडींना ते खासदार आहेत की नाही ? हे सुद्धा आठवत असेल का ? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यांना हा आजार चार वर्षांपासून असल्याचं त्यांच्या वकिलांनी सांगितलं. दोनच वर्षांपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. त्यावेळी त्यांना स्मृतीभंश कसा झाला नाही. तेव्हा तर त्यांनी आठवणीने खासदारकीचं तिकीट घेतलं. आणि आत्ताच स्मृतीभंश झाल्याची बातमी येते, त्यावरून हे प्रकरण दिसतं तितकं सोपं नाही, हे स्पष्ट होतं. 'सबसे बडा खिलाडी, सुरेश कलमाडी'ची ही नवी चाल असणार, यात फार जास्त शंका उपस्थित करण्याचं कारणच नाही.


सर्कशीतला पाहुणा कलाकार


काँग्रेसच्या या तंबूत सध्या पाहुणा कलाकार असलेल्या ए. राजानेही सध्या काँग्रेसचा चांगलाच बाजा वाजवला आहे. टू जी स्पेक्ट्रममध्ये केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी तिहार जेलमध्ये ए. राजा शिक्षा भोगत आहे. सीबीआयच्या विशेष कोर्टात सुनावणीत दिलेल्या जबानीत ए. राजाने काँग्रेसचा भ्रष्ट बुरखा टराटरा फाडला. पंतप्रधानांच्या उपस्थितीत स्पेक्ट्रमचं वितरण केल्याची जबानी राजाने दिली आणि काँग्रेसच्या तंबूत दाणादाण उडाली. ए. राजाच्या जबानीनंतर थेट पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. ए. राजाच्या जबानीवरून काँग्रेसही बॅकफूटवरू गेली आहे. एका आरोपीच्या मागणीवरून राजीनाम्याची मागणी करणं योग्य नाही, अशी भूमिका आता काँग्रेसने घेतली आहे.

चला, हे आघाडी सरकार सामान्य नागरिकाला सुखी ठेऊ शकत नाही. त्याला सुरक्षी देऊ शकत नाही. दहशतवाद्यांना रोखू शकत नाही. पण काँग्रेसच्या सर्कशीतले हे जोकर सामान्य नागरिकांचं मनोरंजन करण्यासाठी सक्षम आहेत, हे मान्य करावंच लागेल.

Friday, July 15, 2011

अजून किती सहन करायचं ?

केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे खरोखरच धन्यवाद मानायलाच हवे. कारण 31 महिन्यांनंतर मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. 13 जुलै रोजी कसाबच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून दहशतवाद्यांनी डाव साधला, आणि कसाबला तीन बॉम्बची सलामी दिली. कसाबच्या वाढदिवसाच्या या जश्नमध्ये 18 मुंबईकरांना जीव गमवावा लागला, तर शंभरपेक्षा जास्त जणांना जखमी व्हावं लागलं. मात्र यात वाईट कशाला वाटून घ्यायचं ? देशाची धर्मनिरपेक्षता जपायची असेल तर असे क्रुरकर्मा अजमल कसाब, अफजल गुरू यांना जपायलाच हवं. आज तर गुरूपोर्णिमा आहे. केंद्र सरकारनं आजच्या मुहूर्तावर अफजल गुरूचं एखादं पोस्टाचं तिकीट का प्रकाशित केलं नाही ? हा माझ्यासारख्या धर्मनिरपेक्ष देशातल्या सामान्य नागरिकाला प्रश्न पडला आहे.
आताच थोड्या वेळापूर्वी ऑफिसमध्ये माझा एक सहकारी अमर काणे यानं एक मत व्यक्त केलं. ते मत म्हणजे सामान्यांच्या मनात किती संताप खदखदतोय याचंच एक प्रातिनिधीक चित्र आहे. मुंबईतल्या एखाद्या चौकाला कसाबचं नाव द्यायला हवं, असं माझ्या मित्रानं सांगितलं. नाही तरी अजून कसाबला फासावर लटकवलेलं नाही. त्यामुळं या काँग्रेसच्या जावयाचे लाड करायलाच लागतील. खाली दिसणा-या या छायाचित्रातल्या सामान्य नागरिकांना अश्रू ढाळावेच लागतील.

मात्रं हे अजून किती दिवस सहन करायचं ? कोणी पेरले मुंबईत तीन बॉम्ब ? किती जणांच्या स्लीपर सेलनं केलं हे कृत्य ? 'दहशतवादाला धर्म नसतो' हे वाक्य किती दिवस ऐकायचं. जर दहशतवादाला धर्म नसतो तर मग भेंडी बाजारात का होत नाहीत बॉम्बस्फोट ? ज्या धर्मांध मुस्लिमांना जगावर इस्लामचं राज्य आणायचं आहे, ते सांगून सवरून धर्मासाठीच हिंसाचार घडवत आहेत. आणि आपले काँग्रेसी राज्यकर्ते कशाला आणि कशाच्या आधारे म्हणतात की दहशतवादाला धर्म नसतो. मतांसाठी लाचार झालेल्यांना धर्म नसतो. तसाच या काँग्रेसवाल्यांना कोणताही धर्म नाहीच.
या शहरावर अंडरवर्ल्डचं राज्य आहे. दहशतवादीही त्यांना सामील झाले आहेत. अंडरवर्ल्ड म्हणजे मुस्लिम गुन्हेगारांचच या शहरावर राज्य आहे. दहशतवादी संघटनांचे स्लिपर सेल इथल्या मोहल्ल्यांमध्ये आहेत. दहशतवाद्यांना साथ देणारी सापांची हिरवळ या शहरातच नव्हे तर देशभरात आहे, हे सांगण्यासाठी कुणाच्याही साक्षीची गरज नाही. मात्र ही हिरवळ ठेचून काढण्याची हिंमत देशातल्या आणि राज्यातल्या राज्यकर्त्यांमध्ये आहे का ?


यांच्या मतांच्या राजकारणासाठी सामान्यांनी किती दिवस मरायचं ? सामान्यांनी काय फक्त मरणातच जीवन अनुभवायचं ? देशात सुरक्षा नावाची कोणतीच चीज अस्तित्वात नाही. गुन्हेगारांना पकडायचं म्हटलं तर पोलिसांचे हात जातात ते मोहल्ल्यात. आणि तिथं कुणाच्या दाढीला स्पर्श झाला म्हणजे यांचा 'इस्लाम खतरे में' यायचा आणि काँग्रेसची सत्ताही खतरे में. त्यामुळं काँग्रेस आणि धर्मांध मुस्लिमांचं असं साटंलोटं जमून आलं आहे. देशावर असलेलं इस्लामी दहशतवादाचं संकट दिवसेंदिवस गडद हिरवं होत चाललं आहे. भ्रष्टाचारानं बरबटलेलं आणि मुस्लिमांचं फक्त मतांसाठीच अनुनय करणा-यांचं सरकार सत्तेत असे पर्यंत हे सहन करावंच लागेल.

Sunday, June 12, 2011

दलित मतांसाठी राष्ट्रवादीचा 'सनद'शीर मार्ग

शिवशक्ती - भीमशक्तीचा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगलाच धसका घेतल्याचं आता स्पष्ट होतंय. 9 जूनरोजी चैतन्यमय वातावरणात शिवशक्ती - भीमशक्तीचा महामोर्चा आझाद मैदानात पार पडला. दुस-याच दिवशी सोमय्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसनं सामाजिक परिवर्तन हक्क परिषद आयोजित केली होती. शिवशक्ती - भीमशक्तीमुळं राष्ट्रवादी काँग्रेस कशी धास्तावली, आहे हेच यातून दिसून येत होतं.
'गेल्या घरी सुखी रहा' असा एखाद्या वधू पित्यानं टाहो फोडावा त्या स्वरात शरद पवारांनी त्यांचं मत व्यक्त केलं. रामदास आठवलेंना धर्मनिरपेक्षतेची आठवण करून देण्यात येत होती. हे कमी की काय ? म्हणून शरद पवारांनी बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांमधील 1 ते 8 प्रतिज्ञा वाचून दाखवल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाया खालील वाळू किती सरकू लागली आहे, हेच त्यांच्या या कृतीतून स्पष्ट झालं.

छगन भुजबळांनी त्यांच्या बाटग्या निष्ठा किती श्रेष्ठ आहेत हे दाखवण्यासाठी शरद पवारांना थेट फुले, शाहू, आंबेडकरांच्या पंक्तीत नेऊन बसवलं. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करून शरद पवारांनी सत्ता पणाला लावली, असंही भुजबळ म्हणाले. 1978 साली विधानसभा आणि विधानपरिषदेत मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव एकमतानं संमत करण्यात आला होता. हा ठराव संमत झाल्यानंतर मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी दलित वस्त्यांवर काँग्रेस नेत्यांनी हल्ले केले होते. कित्येक दलितांच्या झोपड्या बेचिराख करून टाकण्यात आल्या होत्या. 1978 साली संमत झालेला ठराव प्रत्यक्षात येण्यासाठी 1994 साल उजाडावं लागलं. 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, असा नामविस्तार करण्यात आला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुचवलेला नामविस्ताराचा पर्याय सर्वांच्या पसंतीला पडला. नामविस्तारामुळं आणि शिवसेनेच्या भुमिकेमुळं 1978 सारखी परिस्थिती मराठवाड्यात उदभवली नाही. राज्यकर्ते म्हणून शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी नामांतर, नामविस्तार याचं श्रेय नक्कीच घ्यावं. पण हे श्रेय त्यांनी आधी नव्हे तर शेवटी घ्यायला हवं. कारण 1978 मध्ये झालेला ठराव प्रत्यक्षात साकारण्यासाठी तब्बल 16 वर्ष त्यांना लागली. या मधल्या काळात दलित संघटनांना मोठा संघर्ष करावा लागला. कित्येक मोर्चे, बंद घडवावे लागले. दलित कार्यकर्त्यांना लाठ्या-काठ्या झेलाव्या लागल्या. कित्येकांना तुरूंगवास घडला. याच आंदोलनातून रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे, गंगाधर गाडे असे कित्येक नेते घडले.

दलित चळवळीचं केंद्रबिंदू ठरलेल्या संभाजीनगरात नामांतरासाठी कित्येक मोर्चे निघाले. रिपब्लिकन पार्टीच्या कोणत्याही गटाचा मोर्चा असला तरी नागरिक त्यात सहभागी होत होते. एक दिवसाच्या ओल्या बाळंतणीपासून तर नव्वद वर्षांच्या वृद्धापर्यंतची रस्त्यावर उतरलेली आंबेडकरी जनता संभाजीनगरनं पाहिलेली आहे. तब्बल 16 वर्ष दलित जनतेनं नामांतरासाठी लढा दिला. त्यामुळं शरद पवार आणि छगन भुजबळ नामांतराचं पहिलं श्रेय तुमचं नव्हे तर, या लढाऊ दलित जनतेचं आहे. जी एक दिवसाची ओली बाळांतिण माता रस्त्यावर उतरली तिचं ते श्रेय आहे. काँग्रेसवाल्यांनो, जर इतकंच श्रेय घ्यायची हौस होती तर मग 1978 मध्येच नामांतर का केलं नाही ?

आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसला दलित मतदारांना आपल्याकडं आकृष्ट करण्यासाठी सनद जाहीर करण्याची वेळ आली आहे. मागील साठ वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि काँग्रेसमधून फुटून निघालेल्या नकली काँग्रेस अर्थात एनसीपी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसनं ते अपयशी ठरल्याचंच मान्य केल्याचं स्पष्ट होतंय. मागील साठ वर्षात दलितांबरोबर बनवाबनवी केली, मात्र त्यांचा विकास घडवून आणण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीला करता आलं नाही. दलितांची मतं घेऊन काँग्रेसी राज्यकर्ते कायम सत्तेत राहिले. पण दलित जनतेला सत्तेत मतांच्या प्रमाणात वाटा कधीच मिळाला नाही. दलितांच्या मतांची रसद

घेणा-यांना आता सनद आठवली आहे. मात्र ही सनद फक्त सत्ता आणि मतं मिळवण्यासाठीच आहे, हे ही तितकंच खरं आहे.

त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा हा सनदशीर मार्ग किती फसवा आहे, हे दलित जनतेच्या लक्षात आलं आहे. आगामी काळात शिवशक्ती आणि भीमशक्तीचाच पर्याय सशक्त करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जातीय राजकारण गाडून टाकण्याची संधी जनतेसमोर निर्माण झाली आहे.

Tuesday, June 7, 2011

ही चित्रं पहा आणि मग बोला...

दिग्विजय सिंह सोनियाजींचा हा डान्स बघितला. मग आता काँग्रेसही नाच-यांचा पक्ष आहे, असंच तुम्हाला म्हणायचं आहे का ?





Friday, June 3, 2011

अजित पवार का बिथरले ?

शिखर बँकेला जमीनीवर आणण्याचा पराक्रम करणारा शरद पवारांचा पुतण्या अजित पवार याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गरळ ओकली. टू जी स्पेक्ट्रम, लवासा, पुण्यातील जमीन, शाहीद बलवा, कारखान्यांना पॅकेजेस देऊन ते खाणे, सहकार बँक बुडवणे अशी भ्रष्टाचाराची जंत्रीच पवार आणि कंपनीच्या मागे लागली आहे. त्यामुळे या सर्वांना फाटा देण्यासाठी आणि जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच अजित पवारांनी ही गरळ ओकल्याचं स्पष्ट होतंय.
तसंच शिवशक्ती आणि भीमशक्तीचा राज्याच्या पटलावर झालेला उदय, यामुळे ही दलित मतांना गृहित धरणा-या अजित पवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची टगेगिरीच बंद होणार आहे. त्यामुळं अजित पवार आणि कंपनी दिवसाढवळ्या बरळू लागली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कोणत्या संस्था काढल्या ? असा त्यांचा सवाल होता. मात्र हा सवाल विचारण्याची वेळ त्यांच्यावर का आली ? कारण पवार आणि कंपनीनं काढल्या सगळ्या संस्था, त्यांच्या ताब्यात असलेली बँक आता डबघईला आली आहे. सर्व साखर कारखाने कोट्यवधींचे पॅकेज देऊनही तोट्यात चालले आहेत. मात्र मिळालेल्या पॅकेजच्या जोरावर राष्ट्रवादीचे जिल्ह्या जिल्ह्यातील सरंजामदार गब्बर होत चालले आहेत. जनतेला हा सर्व भ्रष्टाचार दिसू लागला आहे. जनता राष्ट्रवादीच्या विरोधात चिडली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे नेते स्वत: शेण खाऊन दुस-याचं तोंड हुंगत आहेत.
सोनिया गांधींच्या परदेशीपणाचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. मात्र स्थापना झाल्यापासून हा पक्ष सोनिया गांधींच्या पदराचा आश्रय घेऊन राज्यात सत्तेत आहे. म्हणजे सोनिया गांधींनी विरोधही करायचा, त्यांच्या पदराखाली राहून सत्तेची मर्दूमकी गाजवायची असा या राष्ट्रवादींचा 'पुरूषार्थ' आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करताना प्रत्येक जिल्ह्यातील कारखानदार, सरंजामदार अशी मंडळी हाताशी धरली. या मंडळींनी पोसण्यासाठी त्यांच्या कारखान्यांना पॅकेज दिली. त्यातून राष्ट्रवादी मंडळी गब्बर झाली. कारखाने तर त्यांनी खाल्लेच, सहकारी बँकही बुडवली. आता हिच मंडळी खाजगी साखर कारखाने काढत आहेत. म्हणजे जनतेचा पैसा लुटणारी आणि सरकारला ठेंगा दाखवणारी ही राष्ट्रवादीची नेते मंडळी किती निर्लज्ज आहे, हेच यातून दिसून येतं.
फक्त मराठ्यांचा पक्ष असा, नावलौकिक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळांची केविलवाणी अवस्था झाली आहे. फक्त शरद पवारांच्या पुतण्याला उपमुख्यमंत्री व्हायचं म्हणून कोणतीही 'टाळी' न वाजवता भुजबळांना ते 'माळी' आहेत म्हणून हटवण्यात आलं. आणि हेच नेते जातीयवादाच्या विरोधात बोलतात तेव्हा जनतेची फुकटात करमणूक होते. भ्रष्टाचारात बरबटलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची ही टगेदारी सहकार क्षेत्रात सुरू ठेवावी. शिवसेनाप्रमुखांवर चिखल उडवण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.

Monday, May 2, 2011

असाच दफनावा लागतो दहशतवाद !

ओसामा बिन लादेनला अखेर अमेरिकेने जलसमाधी दिलीच. अमेरिकेवर हल्ला करणा-या ओसामा बिन लादेनला त्याच्या पापाची शिक्षा अमेरिकेने दिली. अमेरिकेला जगातलं बलाढ्य राष्ट्र का म्हणतात ? त्याचीच प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा जगाला आली. दहशतवाद हा कसाब सारख्या अतिरेक्यांना बिर्याणी खाऊ घालून, पाकिस्तानसारख्या बिनडोक राष्ट्राबरोबर शांततेच्या चर्चा करून संपवता येत नाही. अतिरेक्यांना बिर्याणी नव्हे तर ओसामाला जशा मस्तकात गोळ्या घातल्या तशाच गोळ्या घालून संपवावा लागतो.
ओसामा बिन लादेनला ठार केल्याची बातमी जगभरात सगळ्यांना सुखावून गेली. दहशतवादाचा चेहरा आणि क्रूरकर्माच अमेरिकेने गाडून टाकला. जगभरात अल कैदा आणि दहशतवादी हल्ल्यांनी पोळलेल्या नागरिकांच्या जखमेवरच जणू काही फुंकर मारली गेली.
11 सप्टेंबर 2001 रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला म्हणजे अमेरिकेच्या स्वाभिमानावरील हल्ला होता. त्याच क्षणी अमेरिकेनं ओसामाला जिवंत किंवा मृत पकडणारच असं जाहीर केलं होतं. दहा वर्ष ओसामाला शोधण्यासाठी अमेरिकेनं जंगजंग पछाडलं. अफगाणिस्तानातल्या पर्वातांच्या रांगा पालथ्या घातल्या. या सर्व काळात लादेन पाकिस्तानातच असल्याचाही सगळ्यांचा संशय होता. कारण पाकिस्तान म्हणजे 'दहशतवादाची मक्का'च आहे. अखेर हा 'दहशतवादाचा हाजी' त्याच मक्केत सापडला. 'लादेन पाकिस्तानात नाही', असं सांगणा-या पाकिस्तानचं नसलेलं नाक पुन्हा एकदा कापलं गेलं.
जगातला आणखी एक मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच असल्याचा पुरावा अनेकदा हिंदूस्थाननं दिलाय. मात्र नेहमी प्रमाणे 'लांड्या' बुद्धीच्या पाकिस्ताननं सर्व पुरावे नाकारले.
'लादेनच्या दफनविधीसाठी कोणत्याही देशानं जमीन दिली नसती' , असं कारण सांगत अमेरिकेनं त्याला जलसमाधी दिली. ( मालेगाव आणि मिनी पाकिस्तानातल्या धर्मांध मुस्लिमांना अमेरिकेचं हे म्हणनं पटलं असेल का ?) कारण लादेनची कबर खणली असती तर त्याचं उदात्तीकरण होण्याचाही धोका होता, असा त्यामागचा उद्देश असल्याचंही अमेरिकेनं स्पष्ट केलं.
आणि अमेरिकेचा हेतू किती खरा आहे, याचा पुरावा आपल्याच राज्यात आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाला याच मातीत पुरलं. स्वराज्यावर चालून येणा-यांची अशीच गत होईल असा संदेशच त्यांनी दिला. शिवाजी महाराजांनी 'वैरी मेला वैर संपले' या न्यायानं अफजल खानाची कबर बांधली.

मात्र आता प्रतापगडाच्या खाली काय दिसतं ? अफजल खानाच्या कबरीचं धर्मांध मुस्लिमांनी काँग्रेसच्या राजवटीत उदात्तीकरण केलं. मात्र हा धोका अमेरिकेच्या वेळीच लक्षात आला. आणि हे एका अर्थानं चांगलंही झालं, असंच म्हणावं लागेल. नाहीतर लादेनच्या कबरीवर फुलं वाहण्यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी त्यांच्या मागेमागे मनमोहन सिंह आणि युपीएचं शिष्टमंडळ नक्कीच पोचलं असतं. अनेक धर्मांध मुस्लिमांनाही लादेनच्या कबरीचा उमाळा आला असता. त्या धर्मांधांच्या सोयीसाठी हज यात्रेप्रमाणं विमान प्रवासासाठी अनुदानही देण्यात आलं असतं. हे असं घडलंच असतं. कारण काँग्रेसच्या मुस्लिम प्रेमाचा इतिहास सगळ्यांच्या परिचयाचा आहे.
अमेरिकेनं दहशतवादाचं धड वेगळं केलंय. आता दहशतवादाचे जगभरात पसरलेले अवयवही छाटून टाकावे लागतील. मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला, संसदेवर झालेला हल्ला, देशाच्या अनेक भागात सातत्यानं होणारे हल्ले, काश्मीरमधल्या कारवाया असे अनेक हल्ले आपण पचवले आहेत. अजमल कसाब, अफजल गुरू यांना तरीही जिवंत ठेवण्यात आलं आहे. कारण आपल्या देशात नेभळटांचं सरकार आहे. त्यामुळं दहशतवादाच्या विरोधात लढण्याची आणि दहशतवाद्यांना गोळ्या घालण्याची शक्तीच या सरकारमध्ये नसल्याचं स्पष्ट होतं.
अमेरिका, तू दहशतवादाला दफन केलं. आमच्या देशावर चालून आलेले दहशतवादी कधी दफन होणार ? हाच सवाल आता सर्व देशवासियांच्या मनात आहे.