Monday, May 2, 2011

असाच दफनावा लागतो दहशतवाद !

ओसामा बिन लादेनला अखेर अमेरिकेने जलसमाधी दिलीच. अमेरिकेवर हल्ला करणा-या ओसामा बिन लादेनला त्याच्या पापाची शिक्षा अमेरिकेने दिली. अमेरिकेला जगातलं बलाढ्य राष्ट्र का म्हणतात ? त्याचीच प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा जगाला आली. दहशतवाद हा कसाब सारख्या अतिरेक्यांना बिर्याणी खाऊ घालून, पाकिस्तानसारख्या बिनडोक राष्ट्राबरोबर शांततेच्या चर्चा करून संपवता येत नाही. अतिरेक्यांना बिर्याणी नव्हे तर ओसामाला जशा मस्तकात गोळ्या घातल्या तशाच गोळ्या घालून संपवावा लागतो.
ओसामा बिन लादेनला ठार केल्याची बातमी जगभरात सगळ्यांना सुखावून गेली. दहशतवादाचा चेहरा आणि क्रूरकर्माच अमेरिकेने गाडून टाकला. जगभरात अल कैदा आणि दहशतवादी हल्ल्यांनी पोळलेल्या नागरिकांच्या जखमेवरच जणू काही फुंकर मारली गेली.
11 सप्टेंबर 2001 रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला म्हणजे अमेरिकेच्या स्वाभिमानावरील हल्ला होता. त्याच क्षणी अमेरिकेनं ओसामाला जिवंत किंवा मृत पकडणारच असं जाहीर केलं होतं. दहा वर्ष ओसामाला शोधण्यासाठी अमेरिकेनं जंगजंग पछाडलं. अफगाणिस्तानातल्या पर्वातांच्या रांगा पालथ्या घातल्या. या सर्व काळात लादेन पाकिस्तानातच असल्याचाही सगळ्यांचा संशय होता. कारण पाकिस्तान म्हणजे 'दहशतवादाची मक्का'च आहे. अखेर हा 'दहशतवादाचा हाजी' त्याच मक्केत सापडला. 'लादेन पाकिस्तानात नाही', असं सांगणा-या पाकिस्तानचं नसलेलं नाक पुन्हा एकदा कापलं गेलं.
जगातला आणखी एक मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच असल्याचा पुरावा अनेकदा हिंदूस्थाननं दिलाय. मात्र नेहमी प्रमाणे 'लांड्या' बुद्धीच्या पाकिस्ताननं सर्व पुरावे नाकारले.
'लादेनच्या दफनविधीसाठी कोणत्याही देशानं जमीन दिली नसती' , असं कारण सांगत अमेरिकेनं त्याला जलसमाधी दिली. ( मालेगाव आणि मिनी पाकिस्तानातल्या धर्मांध मुस्लिमांना अमेरिकेचं हे म्हणनं पटलं असेल का ?) कारण लादेनची कबर खणली असती तर त्याचं उदात्तीकरण होण्याचाही धोका होता, असा त्यामागचा उद्देश असल्याचंही अमेरिकेनं स्पष्ट केलं.
आणि अमेरिकेचा हेतू किती खरा आहे, याचा पुरावा आपल्याच राज्यात आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाला याच मातीत पुरलं. स्वराज्यावर चालून येणा-यांची अशीच गत होईल असा संदेशच त्यांनी दिला. शिवाजी महाराजांनी 'वैरी मेला वैर संपले' या न्यायानं अफजल खानाची कबर बांधली.

मात्र आता प्रतापगडाच्या खाली काय दिसतं ? अफजल खानाच्या कबरीचं धर्मांध मुस्लिमांनी काँग्रेसच्या राजवटीत उदात्तीकरण केलं. मात्र हा धोका अमेरिकेच्या वेळीच लक्षात आला. आणि हे एका अर्थानं चांगलंही झालं, असंच म्हणावं लागेल. नाहीतर लादेनच्या कबरीवर फुलं वाहण्यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी त्यांच्या मागेमागे मनमोहन सिंह आणि युपीएचं शिष्टमंडळ नक्कीच पोचलं असतं. अनेक धर्मांध मुस्लिमांनाही लादेनच्या कबरीचा उमाळा आला असता. त्या धर्मांधांच्या सोयीसाठी हज यात्रेप्रमाणं विमान प्रवासासाठी अनुदानही देण्यात आलं असतं. हे असं घडलंच असतं. कारण काँग्रेसच्या मुस्लिम प्रेमाचा इतिहास सगळ्यांच्या परिचयाचा आहे.
अमेरिकेनं दहशतवादाचं धड वेगळं केलंय. आता दहशतवादाचे जगभरात पसरलेले अवयवही छाटून टाकावे लागतील. मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला, संसदेवर झालेला हल्ला, देशाच्या अनेक भागात सातत्यानं होणारे हल्ले, काश्मीरमधल्या कारवाया असे अनेक हल्ले आपण पचवले आहेत. अजमल कसाब, अफजल गुरू यांना तरीही जिवंत ठेवण्यात आलं आहे. कारण आपल्या देशात नेभळटांचं सरकार आहे. त्यामुळं दहशतवादाच्या विरोधात लढण्याची आणि दहशतवाद्यांना गोळ्या घालण्याची शक्तीच या सरकारमध्ये नसल्याचं स्पष्ट होतं.
अमेरिका, तू दहशतवादाला दफन केलं. आमच्या देशावर चालून आलेले दहशतवादी कधी दफन होणार ? हाच सवाल आता सर्व देशवासियांच्या मनात आहे.

Friday, April 29, 2011

बांग्लादेशात हिंदूंवर बलात्कार, पाकिस्तानात हिंदूंना जाळले, पण प्लीज थंड बसा !

धर्म ही अफूची गोळी आहे. आणि हे वरील चित्र ते दाखवून देण्यासाठी पुरेसं आहे. मात्र या अफूच्या गोळीचं ज्यांना व्यसन लागलं आहे, त्यांचं हे व्यसन दूर कसं करायचं ? यावर काही गोळी आहे का ? कारण या आपल्या निधर्मी देशात सिंगल कॉलम छापून आलेल्या दोन बातम्यांचा परामर्श या लिखाणात घेतला आहे. बांग्लादेशमध्ये हिंदूंवर रोजच अत्याचार होतात. राजरोसपणे हिंदू मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर बलात्कार केला जातो. हिंदूंना रोजच मुस्लीमांचा मार खावा लागतो. खाली दिलेलं हे बांग्लादेशमधल्या मुस्लिमांच्या अत्याचाराचं चित्र या साठी पुरेसं आहे. http://hindubd.blogspot.com/ वर हिंदूंची बांग्लादेशमध्ये काय स्थिती आहे, हे नमूद करण्यात आलं आहे.

२००१ च्या निवडणुकीनंतर शेकडो हिंदू स्त्रियांवर बांग्लादेशमध्ये बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमात ए इस्लामीच्या कार्यकर्त्यांनी बलात्कार केल्याचा सरकारी आकडा आहे. आपल्याकडे ही सिंगल कॉलम बातमी आता छापून आली आहे. मात्र ती बातमी वाचून प्लीज कोणीही पेटून उठू नका. कारण अत्याचाराचा हा पाढा काही अजून संपलेला नाही. हिंदू मुलींवर बलात्कार करून त्यांना मुस्लिम होण्यासाठी भाग पाडलं जात आहे. दिवसाढवळ्या हिंदूंची मंदिरं लूटली जात आहेत. वर दिलेल्या ब्लॉगमधील कॉमेन्टस वाचा, हिंदूंनी कसा तिथं टाहो फोडला आहे, ते हिंदूस्थानकडून मदतीची अपेक्षा करत आहेत हे दिसून येतं. हिंदू आणि बौद्धांच्या श्रद्धास्थानांना तिथं मातीत मिळवलं जात आहे. बांग्लादेशमधला वरती लिंक दिलेला ब्लॉग १० जानेवारी २०११ रोजी अपडेट झाला आहे. त्यानंतर म्हणजे आजपर्यंत साडेतीन महिन्यात तो अपडेट झालेला नाही. कुणास ठाऊक तो ब्लॉग लिहणारा मुस्लिमांच्या हातून तर मारला गेला नसेल ना ? अशी भीती वाटतेय.


वरती जळणारी ही बस पहा. ही जळणारी बस नव्हे तर हिंदूंची पाकिस्तानातली चिता आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेशातले हिंदू काय मुस्लिमांच्या हातून मरायलाच जन्माला आले आहेत का ? पाकिस्तानातल्या बलुचिस्तानातल्या क्वेटामध्ये प्रवास करणा-या हिंदूंची बस चार सशस्त्र मुस्लिमांनी अडवून ती पेट्रोलनं पेटवून दिलं. त्यात सात चिमुकल्यांसह पंधरा जणांचा मृत्यू झाला. थांबा, शांत व्हा, रक्त उसळू देऊ नका. कारण अत्याचाराची मालिका अजूनही संपलेली नाही. बलुचिस्तानमध्येही हिंदूंची हत्या, मुलींना पळवून नेऊन त्यांना मुस्लिम करणे, बलात्कार करणे या घटना सुरू आहेत. अतिरेकी आणि धर्मांध मुस्लिम कधी हल्ला करतील याचा नेम नाही. तिथल्या सरकारी आकड्यानुसार 2010 या वर्षात 291 हिंदूंचं अपहरण करण्यात आलं. शेवटी हा सरकारी आकडा. त्यातले कित्येक परत आलेच नाहीत. अनेकांना मोठी रक्कम देऊन सोडवून आणावं लागलं.

बांग्लादेश आणि पाकिस्तानातल्या हिंदूंना किती दिवस आपण मरू देणार आहोत ? त्यांनाही जगायचं आहे. मात्र तिथले मुस्लिम त्यांना जगू देणार नाहीत. हिंदू माता - भगिनींची दिवसाढवळ्या विटंबना तिथं सुरूच राहिल. 'आम्हाला हिंदूस्थानात येऊ द्या' असा टाहो बांग्लादेश आणि पाकिस्तानातल्या हिंदूंनी फोडला आहे. अरे निधर्मी सरकारच्या षंढांनो तुमच्या कानावर हा टाहो पडत नाही का ? आपल्या हिंदू बांधवांवरील हा अत्याचार थांबवावा असं तुम्हाला वाटत नाही का ?

सरकार म्हणून तुम्हाला जरी काही वाटत नसलं तरी ते आमचे रक्ताचे हिंदू बांधव आहेत. नाही तरी देशात रोज बांग्लादेशी मुस्लिमांची घुसखोरी, पाकिस्तानातून अतिरेक्यांची घुसखोरी सुरूच आहे. कोट्यावधी बांग्लादेशी मुस्लिम हिंदूस्थानात सुखाने जगत आहेत. मग आपल्या रक्ताच्या हिंदूंना आपल्यात सामावून घेणं काहीच अवघड नाही. पाकिस्तान आणि बांग्लादेशातल्या हिंदूंना त्यांच्या स्वत:च्या हिंदूस्थानात आसरा द्या. पाकिस्तान आणि बांग्लादेशातल्या नागरिकांना अल्पसंख्यक हिंदू नको आहेत. चालेल आम्ही आमचे हिंदू आमच्या देशात सामावून घेतो. तुम्ही तुमचे मुसलमान तुमच्या देशात सामावून घ्या. आता आहे का काही उत्तर लांड्यांनो...बांग्लादेश आणि पाकिस्तानातल्या.

http://www.thereligionofpeace.com/ या वेब साईटवर मुस्लिम अत्याचाराच्या जगभरातल्या अधिक छळ कथा वाचा.

Friday, April 8, 2011

नेतृत्व नसलेल्या समूहाचा नेता आणि मीडिया

देशाचा सर्व मीडिया सध्या अण्णामय झाला आहे. युपीए सरकारचा माजच अण्णांनी उतरवल्याचं स्पष्ट झालं आहे. कपिल सिब्बल, प्रणव मुखर्जी यांना नाक घासत अण्णांसमोर जावं लागलं. सोनिया गांधींनीही त्यांना उपोषण मागं घेण्याची विनंती केली. पण आपल्या मागणीवर ठाम असलेल्या अण्णांनी काँग्रेसी नेत्यांची मागणी धुडकावून लावली. समितीत दोन अध्यक्ष आणि दोन्ही पक्षांचे पाच सदस्य असावे ही मागणी त्यांनी कायम ठेवली आहे. मात्र सरकारसमोर झुकणार नाही असं स्पष्ट करताना देशातल्या नागरिकांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या भावना किती तीव्र आहेत, हेच या घटनाक्रमातून दिसून येत आहे. जंतरमंतरवर जमलेली गर्दी, मुंबईत आझाद मैदानात सुरू असलेलं उपोषण या सह देशभरात अण्णांना पाठिंबा देण्यासाठी 'आम आदमी' उत्सफूर्तपणे रस्त्यावर उतरला आहे. ही काही काँग्रेसच्या सभेला जशी भाड्यानं माणसं आणावी लागतात तशी गर्दी नाही. हा नागरिकांच्या मनात भ्रष्टाचाराविषयी असलेला राग आहे, तो व्यक्त करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. देशात सुरू असलेली भ्रष्टाचाराची मालिका पाहून नागरिकांच्या मनात संताप निर्माण झाला होता. पण नागरिकांचा राजकीय पक्षांवरील विश्वास कमी होत चालला आहे, हे कटू सत्यही या निमीत्तानं अधोरेखीत झालं. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याची घोषणा राजकीय पक्षांनी केली, पण त्यांना नागरिकांचा पाठिंबा मिळू शकला नाही. कारण आता राजकीय नेत्यांची भ्रष्टाचारांमुळं पत घसरली आहे. लोकपाल विधेयकासाठी अण्णांनी उपोषणाची घोषणा करून, उपोषणला सुरूवात करताच देशभरातल्या नागरिकांना नेतृत्व मिळालं. भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांचा संताप व्यक्त करण्यासाठी त्यांना एक माध्यम मिळालं. भ्रष्टाचाराच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारे लढणा-या नागरिकांना त्यांच्या समूहांना अण्णा हजारेंच्या माध्यमातून एक नेता मिळाला.


हिंदी, इंग्रजी आणि मराठी इलेक्ट्रॉनिक मीडियानं या जनआंदोलनाची जोरकस नोंद घेतली. बीबीसीनंही हे आंदोलन वेगळं रसायन असल्याचं स्पष्ट केलं. इजिप्त, लिबियानंतर आता भारताचा नंबर तर नाही ना ? या शंकेनं भ्रष्टाचारी नेत्यांना धडकी भरली. पण काही (विकलेले) पत्रकार, वृत्तपत्रं यांना जनतेची नाडी कळालीच नाही. अण्णांच्या आंदोलनाला आततायीपणा संबोधण्यात आलं. निवडणुकीच्या काळातच असणारा पेड न्यूजचा प्रकार आता रोजच्या बातम्यांमध्येही येऊ घातला आहे की काय ? अशी शंका आता येत आहे. कारण बातमीत बातमी न राहता मत प्रदर्शित होऊ लागलं आहे. काही (सुपारीबाज) पत्रकारांनी हे आंदोलन म्हणजे सेलिब्रिटींची प्रसिद्धीसाठीची धडपड, मेणबत्त्यावाल्यांचा स्टंट अशा प्रकारे बातम्या दिल्या आहेत. पॅकेज पत्रकारिता करणारे पत्रकार या घटनेमुळं उघडे पडत आहेत. अण्णांच्या आंदोलनाला वेगळं वळण देण्यासाठी त्यांना नेहमीप्रमाणं पॅकेज दिलं जात असेल अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे.

नेतृत्व नसलेल्या समूहाला अण्णांच्या रूपानं नेता मिळाला. पण ज्यांच्याकडं समाजाला दिशा देण्याची जबाबदारी आहे अशा काही अपवादात्मक माध्यमांनी बातम्यांचा धंदा मांडला आहे. त्यामुळं अशा पोटार्थी माध्यमं आणि पत्रकारांचीही पत आगामी काळात रसातळाला जाईल यात शंका नाही.

Wednesday, April 6, 2011

विश्वविजेते आणि 'लांड्या' मनाचा आफ्रिदी

2 एप्रिल 2011 रोजी टीम इंडियानं श्रीलंकेवर मात केली. आणि टीम इंडिया विश्वविजेता बनली. त्या आधी झालेल्या पाकिस्तान बरोबरच्या लढतीतही विजय मिळवला. या मॅचनंतर आफ्रिदीनं, टीम इंडियानं चांगली कामगिरी केल्याचं सांगितलं. टीम इंडियाचा खेळ सरस असल्यानं बेस्ट टीम जिंकली अशी, प्रतिक्रिया व्यक्त करून त्याच्यातली खेळ भावना दाखवून दिली. टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरात सर्वत्र जल्लोष सुरू होता. आणि या जल्लोषाच्या वातावरणातच भारतीयांच्या मनाला छेद देणारी प्रतिक्रिया पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रिदीनं व्यक्त केली. मात्र पाकिस्तानात गेल्यावर त्यानं त्याची एक'जात' प्रतिक्रिया थेट बदलून टाकली. मुस्लिम आणि पाकिस्तानातल्या नागरिकांप्रमाणं भारतीय नागरिकांचे 'दिल बडा नहीं', अशी प्रतिक्रिया त्यानं व्यक्त केली. अर्थात त्यावर वादंग उठल्यानंतर, माझ वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आल्याची उलटी बोंब त्यानं ठोकली.
अरे, आफ्रिदी तुझ्या देशात जितके मुस्लिम राहतात त्या पेक्षा जास्त मुस्लिम या देशात राहतात. तुझ्या देशात अल्पसंख्याक असणा-या हिंदू आणि ख्रिश्चनांना कशी वागणूक मिळते ? युसूफ योहन्ना हा एकेकाळचा ख्रिश्चन महंमद युसूफ का झाला ? कारण तो जर महंमद झाला नसता तर 'साफ' झाला असता. तुझ्या देशातला अतिरेकी अजमल कसाब. शेकडो निष्पाप नागरिकांचे प्राण घेऊनही अजून जिवंतच आहे. त्याला आम्ही बिर्याणी खाऊ घालतो. आमच्या राज्याचे गृहमंत्री तुरूंगात जाऊन 'कैसे हो कसाब ?' अशी विचारणा करतात. ते ज्या खात्याचे मंत्री आहेत ते पोलीस राजरोस रस्त्यावर खंडण्या उकळतात, आमदाराला मार - मार मारतात. त्या आमदारांची गृहमंत्री कधी चौकशी करत नाहीत. पण कसाबची चौकशी करतात. या पेक्षा आणखी कोणता दिलदारपणा आफ्रिदीला हवासा वाटतो ?

पाकिस्तानातून अतिरेकी अव्याहतपणे काश्मीरमध्ये घुसतात, देशभरात त्यांच्या अतिरेकी कारवाया सुरू असतात तरी भारतानं कधी पाकिस्तानवर हल्ला केलेला नाही. अरे आफ्रिदी हा दिलदारपणा तुला कसा दिसत नाही ?

Wednesday, March 30, 2011

पाकिस्तानचा पाडाव, आता लक्ष्य लंका दहन

वर्ल्ड कपची प्रबळ दावेदार समजल्या जाणा-या टीम इंडियानं अपेक्षेप्रमाणं पाकिस्तानचा 29 धावांनी पराभव केला. टीम इंडियानं आता फायनलमध्ये प्रवेश केलाय. वीरेंद्र सेहवागचा धडाका पाहता टीम इंडिया 300 पेक्षा जास्त धावा करणार असं वाटत होतं. मात्र मधली फळी अपेक्षीत कामगिरी करू शकली नाही. त्यामुळं टीम इंडिया 260 धावा करू शकली. सहा जीवदान मिळूनही सचिन तेंडूलकरला सेंच्युरीची सेंच्युरी करण्यात अपयश आलं. आता मुंबईत होम ग्राऊंडवर सचिन शतक ठोकून वर्ल्ड कप जिंकून देईल अशी खात्री वाटतेय.
मीडल ऑर्डरला सातत्य राखता येत नाही, ही टीम इंडियाची नेहमीचीच डोकेदुखी झालेली आहे. त्यातच बॉलिंगची नसलेली धार, ही सुद्धा चिंतेची बाब म्हणावी लागेल.
टीम इंडियाच्या बॉलिंगला धार नसताना सेमी फायनलमध्ये मिळालेलं यश उल्लेखनीय आहे. आता फायनलमध्ये श्रीलंकेचं दहन झालंच पाहिजे. तब्बल 28 वर्षानंतर भारताला वर्ल्ड कप जिंकण्याची संधी प्राप्त झाली आहे. 'अभी नहीं तो कभी नहीं' या न्यायानं एक पाऊल पुढे टाकत टीम इंडियानं वर्ल्ड कप मिळवलाच पाहिजे.

Sunday, March 20, 2011

जाणता राजा !

जगाच्या इतिहासात अनेक राजे - महाराजे, सुलतान होऊन गेले आहेत. अर्थात यामध्ये मोठ्या प्रमाणात वंश परंपरा किंवा दगाबाजी करून झालेलेही अनेक जण होते. मात्र या सर्व राजे - महाराजे, आणि सुलतानांची आज आठवण ठेवली जाते. कोणत्या राजाची जयंती उत्साहात साजरी केली जाते ? अनेक राजे, सुलतान हे इतिहासात गडप झाले आहेत. मात्र एक जाणता राजा असा आहे की, ज्याची अनेक वर्षांपासून उत्साहात जयंती साजरी केली जाते. आणि तो राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. कारण शिवाजी महाराज हे काही वंश परंपरेने राजे झाले नव्हते. इतिहास हा त्यांच्या शिवाय अधूरा आहे, कारण स्वत: शिवाजी महाराजांनीच इतिहास घडवलेला आहे.
मोघलशाही, आदिलशाहीमुळे खचून गेलेल्या इथल्या रयतेला लढायला शिकवलं ते शिवाजी महाराजांनी. चार शतकांपूर्वी आपल्या देशात ख-या अर्थानं जन्म झाला तो लोकशाहीचा. शिवाजी महाराजांचा शिवकाल हीच खरी लोकशाही. मावळ्यांच्या मदतीनं त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. शिवाजी महाराजांचा जन्मच झाला नसता तर हा देश इस्लामी राजवटीचा गुलाम बनला असता. सर्वांना डोक्यावर गोल टोप्या घालून मशिदीत नमाज अदा करावी लागली असती. मात्र शिवाजी महाराजांमुळं ही 'हरित क्रांती' टळली.
शिवाजी महाराजांची दूरदृष्टी अफाट होती. स्वराज्य प्रबळ करण्यासाठी किल्ले आणि सागरी किल्ले महत्वाचे आहेत. हे त्यांनी हेरलं होतं. मात्र या सर्वांपेक्षा त्यांच्यातली जिद्द आणि गनिमी कावा आजही प्रेरणा देणारा आहे.
संपूर्ण शिवचरित्र हेच विविध पराक्रमांनी भारलेलं आहे. मात्र यात मैलाचा दगड ठरावा तो प्रतापगडच. कारण याच प्रतापगडाच्या पायथ्याशी जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारा इतिहास घडला. शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य चिरडून टाकण्यासाठी अफजल खान हजारो सैन्य, मोठं घोडदळ, अजस्त्र हत्ती, दारूगोळा घेऊन चालून आला होता. मात्र शिवाजी महाराजांनी युद्ध कलेचं मोठं उदाहरण इथं जगाला दाखवून दिलं. महाराजांनी मोठ्या चातूर्यानं खानाला निरोप पाठवून बोलणीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावलं. अफजल खानाला वाटलं की, शिवाजी महाराज घाबरले. पण त्याच्या हे लक्षात आलं नाही की, तो आता महाराजांनी जो भाग कायम पायदळी तुडवलेला आहे, तिथंच तो चालला होता. एवढंच नव्हे तर हजारोंचे सैन्य घेऊन आलेल्या अफजल खानाला शेवटी दहा जण घेऊन महाराजांबरोबर बोलणी करण्यासाठी यावं लागलं. शिवाजी महाराजही दहा जणांसह खानाच्या भेटीला गेले.
मात्र खानानं जो दगाफटका करायचा तो केलाच. त्यानं शिवाजी महाराजांवर वार केला. खानाची प्रवृत्ती महाराजांना माहित असावी, त्यामुळं त्यांनी आधीच घातलेल्या चिलखतामुळं ते बचावले. दुस-याच क्षणी महाराजांनी वाघनखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला. ही घटना म्हणजे महाराजांनी अफजल खानाचा वध केला, इतकीच मर्यादीत नाही. कारण त्या काळात देशात पसरत असलेल्या इस्लामी साम्राज्यालाच या वधामुळं धक्का बसला. मोघलांची सगळी शक्ती शिवाजी महाराजांच्या विरोधात खर्ची पडली. मोघल साम्राज्य भारतातच अडकून पडलं. शिवाजी महाराज नसते तर मोघल साम्राज्याचा श्रीलंका, म्यानमार आणि त्याच्या पुढेही विस्तार झाला असता. मात्र शिवाजी महाराजांच्या शौर्यामुळं ही हिरवळ दूरवर पसरू शकली नाही.
वैरी मेला वैर संपले, या न्यायानं महाराजांनी अफजल खानाची प्रतापगडाच्या पायथ्याशी कबर बांधली. महाराजांनीच त्याची आतडी बाहेर काढली होती. कारण दहशतवाद हा असाच संपवायचा असतो. बिर्याणी खायला देऊन दहशतवाद संपत नसतो. मात्र एकदा अफजल खानाचा वध केल्यानंतर त्याची कबर बांधण्याचा दिलदारपणा इतिहासात कुठे सापडणं शक्यच नाही. मात्र ही कबर म्हणजेही एक इशाराच होता. या हिंदवी स्वराज्यावर जर चालून आलात तर तुमचीही अशीच कबर खोदली जाईल, असा इशाराच महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी घालून दिला.
शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात मुस्लिमांनाही दुय्यम वागणूक नव्हती. सैन्यात आणि महाराजांच्या अंगरक्षकांमध्येही मुस्लिम होते. लढाईच्या वेळी महिला आणि त्यांच्या अब्रूचं रक्षण करण्याचा दंडकच घालून देण्यात आला होता. या मुळंच सर्व रयतेला हे आपलं राज्य वाटत होतं. हा राजा जनतेला जाणून घेणारा होता. जनतेलाही राजाचं प्रेम जाणवत होतं. त्यामुळंच हा राजा 'जाणता राजा' म्हटला
परकीयांशी दिलेला लढा, जिंकलेले किल्ले, आग्र्याहून सुटका, सुरतची लूट, राज्याभिषेक या सारख्या अनेक शौर्यांची प्रेरणा महाराजांपासून घेता येते. सागराचे महत्व आणि त्याच्या सुरक्षेचा वेध चार शतकांपूर्वीच महाराजांनी घेतला होता. त्यामुळंच त्यांनी अनेक जलदूर्ग बांधले. मात्र शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्या नादान राज्यकर्त्यांना घेता आला नाही. आणि त्यामुळंच मुंबईवर 26/11चा हल्ला झाला. राज्यकर्त्यांची शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याची मानसिकता नाही. त्यांचा 'आदर्श'च मुळात 31 मजल्यांचा आहे. त्या कुलाब्यातल्या सोसायटीत चार फ्लॅट पदरात पाडणं हाच त्यांचा आदर्श.
व्हियतनाम मधल्या जनतेनंही अमेरिकेच्या साठ हजार सैनिकांची कबर खोदली होती. कारण तिथल्या जनतेनं शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आत्मसात केला होता. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या जोरावर त्यांनी बलाढ्य अमेरिकेला धूळ चारली. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यामुळंच विजय मिळाल्याचं तिथली जनता सांगते. असा हा जागतिक किर्तीचा राजा आपल्या देशात होऊन गेला. आणि आज आपल्यावरच दहशतवादी हल्ले होताहेत. कारण आपण दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालत बसलो आहोत. दहशतवाद असा संपूष्टात येत नाही, हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं आहे. होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा हर हर महादेव, जय भवानी - जय शिवाजी, मग बघा कुणाची माय व्याली आहे, इथं हल्ले करायला ?

Sunday, March 13, 2011

अशी नसते गं आई !

8 मे महिला दिन. ऑफिसमध्ये सकाळ पासून महिला दिना विषयीच्या बातम्या सुरू होत्या. वेगवेगळ्या क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी बजावणा-या महिलांच्या बातम्या प्रत्येक बुलेटिनमध्ये जात होत्या. आणि त्यातच एक ब्रेकिंग न्यूज आली. मालाड पूर्वेला सह्याद्री टॉवर्स इमारतीत राहणा-या निधी गुप्ता या महिलेनं दोन लहान मुलांसह आत्महत्या केली. अंगावर शहारे आणणारी ही बातमी, आणि एकीकडे महिली दिनाच्या बातम्या देत असतानाच निधी गुप्ताच्या आत्महत्येचीही बातमी करावी लागली.

चार्टर्ड अकाऊंटन्ट असलेल्या निधी गुप्तानं गौरव आणि महिका या दोन लहानग्यांसह आत्महत्या केली. मनाला सुन्न करणारी ही बातमी. आई पोटच्या मुलासाठी काय करत नाही ? आई तर एक पिढीच घडवते. मुलांची शाळा नव्हे तर विद्यापीठच आई असते. गौरव आणि महिकाच्या आईनं असं का केलं असेल ?
अशी नसते गं आई ! असंच तर ही मुलं तिला म्हणत नसतील ना ?
आपल्या देशातली एकत्र कुटुंब पद्धती ही जगात आपली ओळख होती. मात्र या नाते - संबंधांमध्ये आता त्सुनामी आली आहे, हेच या आत्महत्येतून स्पष्ट होत नाही का ? आपणही किती संवेदनाहीन झालो आहोत. मनाला चटका लावणारी ही बातमी, मात्र त्यावर रोखठोक चर्चा झालीच नाही. समाजातली मते - मतांतरे व्यक्त झालीच नाहीत. 11 मार्चला जपानमध्ये त्सुनामी आली. त्या त्सुनामीत नाते संबंधांच्या या त्सुनामीची बातमी वाहून गेली.
जग सोडून जाणारी निधी गुप्ता, मरणाच्या वाटेवर जाताना मुलांना का सोबत घेऊन गेली असेल ? मुलांना मृत्यूच्या दाढेत लोटताना तिचे हात का थरथरले नसतील ? मुलांकडं बघून जगण्याची नवी जिद्द निर्माण होते. मुलांच्या निरागस हास्यासमोर जगातली सर्व दु:ख विसरून जायला होतं. मग हे सर्व निधीला का जाणवलं नसेल ?
आता या प्रकरणात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सासरच्या मंडळींच्या जाचामुळे निधीने हे पाऊन उचलल्याचं तिच्या वडिलांनी म्हटलं आहे. पुढिल तपासात सत्य बाहेर येईलही. मात्र निधीबरोबर
वावरणा-यांना, तिच्या नातेवाईकांना तिची घालमेल जाणवली नसेल का ? निधीच्या पतीला दारूचं व्यसन होतं. तसंच प्रॉपर्टीवरूनही वाद सुरू होता. या कौटुंबिक समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी वेळीच का पुढाकार घेतला नसेल ? जर त्यांच्या कुटुंबात संवाद असता, नाते - संबंधांमध्ये जिव्हाळा असता तर अशी घटना नक्कीच घडली नसती.
आपली कौटुंबिक आस्था कमी होत चालल्याचंच हे प्रतीक आहे. नातेसंबंधांमध्ये निर्माण होणारा तणाव, वाढती स्पर्धा, आणि घड्याळाच्या काट्यालाही मागे टाकून पुढे जाण्याची घाई यामुळं प्रत्येक व्यक्ती आत्मकेंद्री होत चालली आहे. या आत्मकेंद्री प्रवृत्तीमुळं समाजातला संवाद खुंटत चालला आहे. त्यामुळंच समाजात निकोप वातावरण निर्माण व्हायला हवं. घर हे फक्त भिंती असता कामा नये. घराघरातली घट्ट नातेसंबंधच अशा प्रकारच्या आत्महत्या रोखू शकतात. जिवनात कितीही तणाव असला तरी आत्महत्या हा काही मार्ग नव्हे.