Wednesday, March 30, 2011

पाकिस्तानचा पाडाव, आता लक्ष्य लंका दहन

वर्ल्ड कपची प्रबळ दावेदार समजल्या जाणा-या टीम इंडियानं अपेक्षेप्रमाणं पाकिस्तानचा 29 धावांनी पराभव केला. टीम इंडियानं आता फायनलमध्ये प्रवेश केलाय. वीरेंद्र सेहवागचा धडाका पाहता टीम इंडिया 300 पेक्षा जास्त धावा करणार असं वाटत होतं. मात्र मधली फळी अपेक्षीत कामगिरी करू शकली नाही. त्यामुळं टीम इंडिया 260 धावा करू शकली. सहा जीवदान मिळूनही सचिन तेंडूलकरला सेंच्युरीची सेंच्युरी करण्यात अपयश आलं. आता मुंबईत होम ग्राऊंडवर सचिन शतक ठोकून वर्ल्ड कप जिंकून देईल अशी खात्री वाटतेय.
मीडल ऑर्डरला सातत्य राखता येत नाही, ही टीम इंडियाची नेहमीचीच डोकेदुखी झालेली आहे. त्यातच बॉलिंगची नसलेली धार, ही सुद्धा चिंतेची बाब म्हणावी लागेल.
टीम इंडियाच्या बॉलिंगला धार नसताना सेमी फायनलमध्ये मिळालेलं यश उल्लेखनीय आहे. आता फायनलमध्ये श्रीलंकेचं दहन झालंच पाहिजे. तब्बल 28 वर्षानंतर भारताला वर्ल्ड कप जिंकण्याची संधी प्राप्त झाली आहे. 'अभी नहीं तो कभी नहीं' या न्यायानं एक पाऊल पुढे टाकत टीम इंडियानं वर्ल्ड कप मिळवलाच पाहिजे.

No comments:

Post a Comment