Monday, May 2, 2011

असाच दफनावा लागतो दहशतवाद !

ओसामा बिन लादेनला अखेर अमेरिकेने जलसमाधी दिलीच. अमेरिकेवर हल्ला करणा-या ओसामा बिन लादेनला त्याच्या पापाची शिक्षा अमेरिकेने दिली. अमेरिकेला जगातलं बलाढ्य राष्ट्र का म्हणतात ? त्याचीच प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा जगाला आली. दहशतवाद हा कसाब सारख्या अतिरेक्यांना बिर्याणी खाऊ घालून, पाकिस्तानसारख्या बिनडोक राष्ट्राबरोबर शांततेच्या चर्चा करून संपवता येत नाही. अतिरेक्यांना बिर्याणी नव्हे तर ओसामाला जशा मस्तकात गोळ्या घातल्या तशाच गोळ्या घालून संपवावा लागतो.
ओसामा बिन लादेनला ठार केल्याची बातमी जगभरात सगळ्यांना सुखावून गेली. दहशतवादाचा चेहरा आणि क्रूरकर्माच अमेरिकेने गाडून टाकला. जगभरात अल कैदा आणि दहशतवादी हल्ल्यांनी पोळलेल्या नागरिकांच्या जखमेवरच जणू काही फुंकर मारली गेली.
11 सप्टेंबर 2001 रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला म्हणजे अमेरिकेच्या स्वाभिमानावरील हल्ला होता. त्याच क्षणी अमेरिकेनं ओसामाला जिवंत किंवा मृत पकडणारच असं जाहीर केलं होतं. दहा वर्ष ओसामाला शोधण्यासाठी अमेरिकेनं जंगजंग पछाडलं. अफगाणिस्तानातल्या पर्वातांच्या रांगा पालथ्या घातल्या. या सर्व काळात लादेन पाकिस्तानातच असल्याचाही सगळ्यांचा संशय होता. कारण पाकिस्तान म्हणजे 'दहशतवादाची मक्का'च आहे. अखेर हा 'दहशतवादाचा हाजी' त्याच मक्केत सापडला. 'लादेन पाकिस्तानात नाही', असं सांगणा-या पाकिस्तानचं नसलेलं नाक पुन्हा एकदा कापलं गेलं.
जगातला आणखी एक मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच असल्याचा पुरावा अनेकदा हिंदूस्थाननं दिलाय. मात्र नेहमी प्रमाणे 'लांड्या' बुद्धीच्या पाकिस्ताननं सर्व पुरावे नाकारले.
'लादेनच्या दफनविधीसाठी कोणत्याही देशानं जमीन दिली नसती' , असं कारण सांगत अमेरिकेनं त्याला जलसमाधी दिली. ( मालेगाव आणि मिनी पाकिस्तानातल्या धर्मांध मुस्लिमांना अमेरिकेचं हे म्हणनं पटलं असेल का ?) कारण लादेनची कबर खणली असती तर त्याचं उदात्तीकरण होण्याचाही धोका होता, असा त्यामागचा उद्देश असल्याचंही अमेरिकेनं स्पष्ट केलं.
आणि अमेरिकेचा हेतू किती खरा आहे, याचा पुरावा आपल्याच राज्यात आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाला याच मातीत पुरलं. स्वराज्यावर चालून येणा-यांची अशीच गत होईल असा संदेशच त्यांनी दिला. शिवाजी महाराजांनी 'वैरी मेला वैर संपले' या न्यायानं अफजल खानाची कबर बांधली.

मात्र आता प्रतापगडाच्या खाली काय दिसतं ? अफजल खानाच्या कबरीचं धर्मांध मुस्लिमांनी काँग्रेसच्या राजवटीत उदात्तीकरण केलं. मात्र हा धोका अमेरिकेच्या वेळीच लक्षात आला. आणि हे एका अर्थानं चांगलंही झालं, असंच म्हणावं लागेल. नाहीतर लादेनच्या कबरीवर फुलं वाहण्यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी त्यांच्या मागेमागे मनमोहन सिंह आणि युपीएचं शिष्टमंडळ नक्कीच पोचलं असतं. अनेक धर्मांध मुस्लिमांनाही लादेनच्या कबरीचा उमाळा आला असता. त्या धर्मांधांच्या सोयीसाठी हज यात्रेप्रमाणं विमान प्रवासासाठी अनुदानही देण्यात आलं असतं. हे असं घडलंच असतं. कारण काँग्रेसच्या मुस्लिम प्रेमाचा इतिहास सगळ्यांच्या परिचयाचा आहे.
अमेरिकेनं दहशतवादाचं धड वेगळं केलंय. आता दहशतवादाचे जगभरात पसरलेले अवयवही छाटून टाकावे लागतील. मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला, संसदेवर झालेला हल्ला, देशाच्या अनेक भागात सातत्यानं होणारे हल्ले, काश्मीरमधल्या कारवाया असे अनेक हल्ले आपण पचवले आहेत. अजमल कसाब, अफजल गुरू यांना तरीही जिवंत ठेवण्यात आलं आहे. कारण आपल्या देशात नेभळटांचं सरकार आहे. त्यामुळं दहशतवादाच्या विरोधात लढण्याची आणि दहशतवाद्यांना गोळ्या घालण्याची शक्तीच या सरकारमध्ये नसल्याचं स्पष्ट होतं.
अमेरिका, तू दहशतवादाला दफन केलं. आमच्या देशावर चालून आलेले दहशतवादी कधी दफन होणार ? हाच सवाल आता सर्व देशवासियांच्या मनात आहे.

5 comments:

  1. mala watat thod correction aahe 11 Sept 2011 nahi tar 2003 If I am not mistaken

    ReplyDelete
  2. ho 11 sept 2011 nahi....itk nakki....

    ReplyDelete
  3. आता दाऊद इब्राहिम आणि लष्करे-तोयबाने अमेरिकेट एखादा बॉम्बस्फोट घडवावा अशी वाट आपण पाहत बसायची म्हणजे त्यानंतर अमेरिका त्यांचा नायनाट करेल आणि आपले सरकार आनंदाने टाळ्या पिटेल

    ReplyDelete
  4. माफ करा. ब्लॉगमध्ये तारीख टाकताना चूक झाली आहे. आपल्या सुचनेनुसार ती दुरूस्तही केली आहे. धन्यवाद.

    ReplyDelete
  5. मला सगळ्यात आधी हे नमूद करायचे आहे कि संतोष गोरे यांचे विचार महत्वाचे कि त्यांनी केलेल्या चुका महत्वाच्या आपली हि कुपमंडूक वृत्ती कधी जाईल हेच लक्षात येत नाही लेखा मागचा संदेश न समजावून घेता हि चूक केली, ती चुक्केली,असे पाहिजे होते, तसे पाहिजे होते, हा काय व्याक्रनाचा धडा आहे काय, आणि संतोष गोरे यांनी तो लेख माझ्या काय व्याकरणाच्या चुका आहेत ते सांगा म्हणून लिहिलेला नाही हे सुज्ञ मंडळी ने लक्षात घेतले तर फार चांगले होईल...
    संतोष जी आपण ज्या भावनेनेन लेख्लीहीलेला आहे ती एक सच्चा भारतीयाची उत्कट प्रतिक्रिया आहे यात शंका नाही, पण या देशाला व सरकार ला काय झालेले आहे समजताच नाही खुशाल अतिरेकी येतात आणि माणसांना मारून जातात आणि मुठ भात मतांसाठी नेभळट मंडळी त्यांचे पालन पोषण करतात... हि व्यवस्थाच एक वाझ वेश्या आहे, ती सुखी नाही कारण ती वांझ आहे आणि वेश्या असल्याए तिचे चरित्र आक्य आहे आपण पाहतोच आहे गेल्या साथ वर्षान पासून... आपणास माझ्या शुभेच्छा....

    ReplyDelete