Monday, May 3, 2010

मुंबईचे शांघाय नव्हे, झाली गोगलगाय

मोटरमन संपावर गेले, आणि मुंबई रस्त्यावर आली. सरकार नावाची काही चीज या शहरात अस्तित्वात आहे किंवा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली. लाखो प्रवासी अनेक स्थानकांवर ताटकळत थांबले. परंतू त्यांच्या वाहतूकीची कोणतीही व्यवस्था सरकारकडे नव्हती. बेस्ट बसेस तरी अशा किती पुरणार होत्या ? त्यामुळे सरकारने खाजगी गाड्यांनाही वाहतूकीची परवानगी दिली. इतर वेळी प्रवासी वाहतूक करणा-या खाजगी गाड्यांवर कारवाई केली जाते. मात्र आता काही पर्यायच नाही, म्हटल्यावर काय करणार ? काही मोटरमन एका शहराला वेठीस धरतात. आणि सरकार मख्खपणे त्याकडे पाहते. संयमाने वागणा-या प्रवाशांनीही मग अनेक ठिकाणी त्यांचा संताप व्यक्त केला.
राज्यात आणि देशात काँग्रेसचे सरकार सत्तेत आहे. सरकारच्या कारभा-यांना मुंबईचे शांघाय करण्याचे डोहाळे मागील काही वर्षांपासून लागले आहेत. आता आजच्या या मोटरमनच्या संपाने त्यांचे डोहाळ जेवण झाले, असं म्हणायला हरकत नाही. पायाभूत सुविधा कशाबरोबर खातात ? याचा सरकारला काही पत्ता तरी आहे का ? या सरकारला तर फक्त पैशांची टक्केवारी आणि जमिनी या व्यतीरिक्त काही कळत नाही.
या मुंबईत काँग्रेसचे सहा खासदार आहेत. आम आदमी स्थानकांवर ताटकळत होता. तेव्हा हे खासदार कुठे होते ? नको तेव्हा वाहिन्यांसमोर चमकेशगिरी करणारे हे खासदार या काळात आम आदमीला दिलासा देण्यासाठी का समोर आले नाहीत ? मुंबईचे शांघाय करायचे गाजर दाखवता. आणि आम मुंबईकर संकटात असतो तेव्हा तोंड लपवता. अशाने कसे होणार शांघाय ? मुंबईत पायाभूत सुविधांचा किती अभाव आहे, हेच या निमीत्ताने दिसून आले. काही हजार मोटरमन या शहराला वेठीस धरू शकतात. तेव्हा आपण या शहरात आणि राज्यात विदेशी गुंतवणूक व्हावी अशी अपेक्षा तरी कशी धरावी ?
मुंबईचे शांघाय हे राज्यकर्ते करू शकत नाहीत. कारण त्यासाठी अंगात हवी असणारी रग आणि प्रबळ इच्छाशक्तीचा त्यांच्यात अभाव आहे. परप्रांतियांचे लोंढे, बांग्लादेशी घुसखोर यासारख्यांना इथं सुविधा मिळू शकतील. मात्र पायाभूत सुविधांचा विकास होणे या आघाडी सरकारकडून शक्य नाही. मुंबईचे शांघाय तर होणार नाही. मात्र मुंबईचा वेग थांबवून तिची गोगलगाय करण्याची 'क्षमता' या सरकारमध्ये आहे हे नक्की.

2 comments:

  1. Garu, read your three four article on blog. very nice. good writing. i like article on aurangabed mnc election..and also cm amitabh contro..recent article on mumbai is also good..keep it up. post your scrap on orcut.
    thanks..
    Dhananjay Koshti
    and
    Jai maharashtra

    ReplyDelete
  2. SANGHATIT LOK ASANGHATI JANTES DON DIVAS VETHIS DHARTAT TARI SARKAR HATAT HAT DHARUN GAPPA BASUN RAHATE.

    ReplyDelete