Friday, March 19, 2010

या, संभाजीनगरावर भगवं निशाण आहे !

औरंगाबाद नाव उच्चारलं तरी डोळ्यासमोर येतात दंगलींचा हिरवागार इतिहास असलेली रक्ताळलेली पानं. कोणतंही कारण असो अथवा नसो सिटी चौकातून हातात तलवारी आणि चाकू घेऊन मुस्लिमांचा जमाव गुलमंडीवर कधी चालून येईल याचा नेम नसायचा. खेड्यापाड्यातून आलेल्या शेतक-याला मोंढ्याच्या परिसरात दिवसा ढवळ्या मुस्लिम गुंडांकडून लुटलं जायचं. गणेशोत्सव, शिवजयंती हे सणही भीतीच्या सावटाखालीच साजरे करावे लागायचे. मुस्लिमांच्या वस्तीतून जाताना हिंदूंना कायम दहशतीतूनच जावं लागायचं. छोट्या रस्त्यांवर चुकून एखाद्या मुस्लिमाला धक्का लागला तरी हिंदूंना चोप मिळायचा. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने हिंदूस्थान विरूध्द क्रिकेटची मॅच जिंकली तर मुस्लिमांच्या मोहल्ल्यात वाजणा-या फटाख्यांचा आवाज सगळ्या शहराला ऐकू जायचा. मुस्लिम वस्त्यांमधील हॉटेल्स आणि दुकानांमध्ये इम्रान खान, वासिम अक्रम, जावेद मियाँदाद, इंझमाम उल हक यांचीच पोस्टर्स सर्रासपणे लावलेली असायची.
मात्र महापालिकेची पहिली निवडणूक जाहीर झाली आणि दहशतीचं चित्र बदलायला सुरूवात झाली. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे वाघ उतरले. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मराठवाड्यातली पहिली विराट सभा झाली. दबलेल्या आणि हिंमत हारलेल्या हिंदूंना धीर आणि बळ देणारी ही ऐतिहासिक सभा ठरली. याच सभेत हिंदूच्या गुलामीचं आणि मुस्लिम आक्रमकांचे प्रतिक असलेले शहराचे औरंगाबाद हे नाव गाडून टाकण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला नवं नाव दिलं, संभाजीनगर. आता संभाजीनगर या नावाबरोबर जोडली गेली आहे, ती हिंदूंची अस्मिता. आणि गाडून टाकलं आहे आमच्या मानगुटीवर असलेले गुलामीच्या जोखडाचे प्रतीक असलेले औरंगाबाद. बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचाराने भारलेल्या शहरवासीयांनी 1988 मध्ये शिवसेनेचे तब्बल 27 नगरसेवक निवडून दिले. मात्र महापौर पदाच्या निवडणुकीवरून शहरात दंगल पेटली. महापालिकेची निवडणूक होण्यापूर्वीच 'शिवसेना चुनके आयी तो दंगे करावूंगा' अशी धमकीच काँग्रेसच्या तत्कालीन आमदाराने दिली होती. ही धमकी खरी झाली. संभाजीनगरमध्ये दंगल पेटली. या दंगलीचे लोन बिडकीन, पैठण आणि जालन्यापर्यंत पोहोचले. पोलिसांच्या गोळीबारात 20 जण ठार झाले. काँग्रेसच्या हायकमांडला याची दखल घ्यावी लागली.
तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना तातडीने शहरात दाखल व्हावं लागलं. मात्र ही दंगल शंकरराव चव्हाणांना बाधली, शंकरराव चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला. शहराचा पहिला महापौर काँग्रेसने दिला. मात्र इथूनच सुरू झाला शिवसेनेचा झंझावात. एखाद्या वनव्याप्रमाणे शिवसेना मराठवाड्यात पसरली. निझामी रजाकारांच्या पिलावळींनी मराठवाडा स्वतंत्र झाला तरी कित्येक ठिकाणी उच्छाद मांडलेला होता. रजाकारांच्या या औलादींच्या शिवसैनिकांनी मुसक्या आवळल्या. दंगलीच्या वेदना जपत आणि भीतीच्या छायेखाली जगणा-या नागरिकांना आधार दिला तो शिवसेना आणि शिवसैनिकांनी. गावागावात शिवसेनेची व्याघ्रमुद्रा नागरिकांचे स्वागत करू लागली.
1988 च्या महापालिका यशानंतर विधानसभा, लोकसभा या मोठ्या निवडणुकांसह इतर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामान्य कार्यकर्ते शिवसेनेने निवडून पाठवले. जात, पैसा यांना महत्व न देता रस्त्यावरील कार्यकर्त्यांना नेते केले, ते शिवसेनेने. मागील 22 वर्षात महापालिकेच्या सगळ्याच निवडणुकांमध्ये जनतेने शिवसेनेला भरभरून मतांचे दान दिले. या निवडणुकीतही संभाजीनगरवरील भगवं निशाण कायमच राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत प्रदीप जैस्वाल सहानुभुतीच्या जोरावर आणि शिवसेनेत परतणार आहे या सुप्त प्रचाराच्या पाठिंब्याने निवडून आले होते. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. आणि आता काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महापालिका निवडणुकीसाठी आघाडी केली आहे. त्यामुळे प्रदीप जैस्वाल यांना विधानसभा निवडणुकीच्या मिळालेली सहानुभुतीची लाट आता ओसरली आहे.
इथल्या जनतेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतं द्यावी तरी कशासाठी ? उद्योगमंत्री आणि काँग्रेसचे आमदार राजेंद्र दर्डा यांच्या विरोधात कलम 306 अन्वये गुन्हा दाखल आहे. दर्डा यांच्या दबावामुळे आत्महत्या करत असल्याची मृत्यूपूर्व जबानी माजी नगरसेवक गणेश तांबे यांनी दिलेली आहे. मात्र सरकारमध्ये उद्योग मंत्री असलेल्या दर्डांविरूद्ध अजूनही कारवाई झालेली नाही. तर असे हे उद्योगमंत्री जर काँग्रेसच्या ताब्यात महापालिका आली तर विद्यमान आमदारांनाही आत्महत्या करायला लावतील, अशी शंका तांबे प्रकरणावरून मनात येते. त्यामुळे काँग्रेसची गाडून टाकलेली दहशत पुन्हा उभी राहू द्यायची नसेल तर शिवसेनाच पुन्हा निवडून यायला हवी.
1988 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीच्यावेळी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. तर आता त्यांचे चिरंजीव अ'शोक'राव चव्हाण हे मुख्यमंत्री आहेत. त्यावेळी तत्कालीन आमदाराने दंगली घडवण्याची धमकी दिली होती. तोच इतिहास पुन्हा तर प्रत्यक्षात येणार नाही ना ? कारण आताच्या आमदाराने तर एक माजी नगरसेवकालाच आत्महत्या करायला लावलेली आहे. दंगली घडवून मुख्यमंत्री बदलणे ही काँग्रेसची परंपराच आहे. त्यामुळे आता नागरिकांनीही सावधान रहायला हवं. कारण राज्यातल्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. त्यांच्या इच्छेसाठी शहर पुन्हा दंगलीच्या वणव्यात लोटू देऊ नका.
इथला सामान्य नागरिक हा शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा आहे. बाळासाहेबांच्या प्रत्येक सभेला इथल्या नागरिकांना प्रतिसाद दिलेला आहे. वयोमानपरत्वे बाळासाहेब ठाकरे शहरात सभा घेणं शक्य नाही. मात्र त्यांनी इथे घेतलेल्या सभांचे शब्द अजूनही कानात घुमत आहेत. त्यांनी दिलेली हिंम्मतच दंगलखोरांच्या विरोधात उभी राहण्यासाठी शक्ती देणारी ठरलेली आहे. त्यामुळे शहरातील नागरिक या संभाजीनगरावरील भगवं निशाण कायम ठेवतील यात शंका नाही. कारण संभाजीनगर हे मराठवड्याचे पॉवर हाऊस आहे. इथं असलेली शिवसेनेची सत्ता हिच मराठवाड्यातील शिवसेनेला आधार देण्याचे काम करते. त्यामुळे होऊन जाऊ द्या पुन्हा ऐकदा एल्गार. करा हिंदूंची वज्रमुठ, कायम ठेवा भगवं निशाण, आणि काँग्रेसला द्या मुठमाती.

5 comments:

  1. सकाळची बातमी वाचा. व त्यात किती तथ्य आहे यावर लिहा.

    औरंगाबाद - शहर शिवसेनेत आज उभी फूट पडली असून, नाराज गटातील उपमहापौर भाऊसाहेब वाघ, शहरप्रमुख अनिल पोलकर आणि उपप्रमुख राजू इंगळे यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांनी आज शहर प्रगती आघाडीमध्ये प्रवेश केला आहे.

    शिवसेनेने या प्रमुख नेत्यांना निवडणुकीसाठी उमेदवारी न दिल्याने, ही फूट पडल्याचे सांगण्यात येत आहे. शहर प्रगती आघाडीचे प्रमुख आमदार प्रदीप जयस्वाल यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

    ReplyDelete
  2. http://72.78.249.124/esakal/20100320/4825997864771395161.htm

    ReplyDelete
  3. Editor of 'SAAMNA' should take very serious note of this article. His chair can be in trouble in nearest future.

    ReplyDelete
  4. सामान्य माणूस बावरतो असे सगळे वाचले कि
    जो जो जे जे म्हणतो ते ते ऐक ऐक ऐकतो
    :)


    http://sushant-danekar.blogspot.com/

    ReplyDelete
  5. औरंगाबादमधील दहशत केव्हाच संपलीय. आता प्रश्न आहे विकासाचा.
    "औरंगाबाद की संभाजीनगर" या वादातच अडकून पडायचे असेल तर हरकत नाही.

    ReplyDelete