Sunday, February 27, 2011

टग्यांचे वारसदार, बलात्कारी आमदार

राजकारणात राहून खरं बोलणं हा गुण फार कमी राजकारण्यांमध्ये आहे. कारण खरं बोलणा-यांना राजकारण करताच येत नाही. मात्र राजकारण करतानाही खरं बोलण्याची किमया अजित'दादा' पवार यांनी साधली आहे. मीडिया बॅन केला पाहिजे, पत्रकारांना दंडुके मारले पाहिजे अशी परखड भूमिका त्यांनी नांदेडमध्ये घेऊन पत्रकारांना पोलिसांच्या हातून 'प्रसाद' दिला होता. सहकार क्षेत्रातल्या त्यांच्या बगलबच्च्यांची भलावण करण्यासाठी तिथे टगेच लागतात, असं सांगताना 'मी ही एक टग्या' असल्याची कबूली दिली होती. तर शनीशिंगणापूरमध्ये हॉस्पिटलचे उदघाटन करण्याच्या कार्यक्रमात त्यांनी विरोधकांना 'गांडूळा'ची उपमा दिली होती. तर अशी ही टगेगिरी त्यांनी जाहीरपणे सांगितली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा अजित पवारांना आहे. त्याच्याच जोरावर त्यांनी उपमुख्यमंत्रीपद मिळवलं आहे. छगन भुजबळांना कोणतीही 'टाळी' न वाजवता, त्यांच्या पदावरून पायउतार करण्याची किमया त्यांनी साधली आहे. याला दुस-या भाषेत टगेगिरीही म्हणायला खुद्द अजित पवारांचीही हरकत असणार नाही. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मितीच सहकारातले टगे, सोसायट्यांचे टगे, वतनदार टगे, गावागावातले गुंड आणि टगे यांना पोसण्यासाठी झालेली आहे. या सर्व टग्यांचे पोशिंदे आणि नेते अजित पवार आहेत, असं म्हणनं धाडसाचं होणार नाही.
आता दुसरी गंमत बघा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांसाठी 50 टक्के आरक्षण देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. या मागणीच्या पाठपुराव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शरद पवार यांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या या मागणीचे स्वागतच होईल, यात शंका नाही. मात्र पवार साहेब महिलांना आरक्षण देण्याबरोबरच तुमच्या पक्षाच्या आमदारांकडून संरक्षण मिळेल का ? या दृष्टीने काहीतरी प्रयत्न करा.
कारण वीस वर्षाच्या तरूणीवर बलात्कार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वाघ यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंही या वाघाला ( वाघ कसला बलात्कारी लांडगाच ) पक्षातून निलंबित केलं आहे. पण ऐवढी कारवाई पुरेशी आहे का ? या वाघाला पक्षातून बडतर्फ करून, आमदारकीचा राजीनामा का घेतला नाही ? त्याचे निलंबन रद्द करून तुरूंगातून सुटल्यावर त्याला केलेल्या 'कृत्या'बद्दल महाराष्ट्र भूषण किंवा टग्या भूषण असा एखादा पुरस्कार देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढा-यांचा ( टग्यांचा ) विचार आहे का ?
संभाजीनगर जिल्ह्यातले कन्नडेच मनसे आमदार मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी ताफ्यात घुसले होते. यावेळी पोलिसांबरोबर झालेल्या बाचाबाचीनंतर हर्षवर्धन जाधवांना मारहाण करण्यात आली. ती मारहाण इतकी क्रूर होती की, त्यांचा पार्श्वभाग काळा-निळा पडला होता. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा गुन्हा त्यांनी केला होता. मात्र ते विरोधी पक्षाचे आमदार होते. आता सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने तर आचारसंहिता सुरू असताना सरकारी विश्रामगृहात तरूणीवर बलात्कार केलाय. नोकरी लावून देण्याच्या बहाण्यानं हतबल तरूणीवर बलात्कार करण्याचे कृत्य त्यांनी केले. कायदा - सुव्यवस्थेचा आव आणणारे गृहमंत्री आर.आर.पाटील, हा वाघ अजून त्याच्या पायावर चालतोच कसा ? याचे उत्तर द्या. हर्षवर्धन जाधव सारखा याला का फोडत नाहीत ? या वाघाने केलेल्या कृत्याबद्दल त्याच्या पार्श्वभागाला हार लावून 12 डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर सत्कार करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर.आर.पाटील यांचा विचार आहे का ?
वाळूमाफिया, दूधमाफिया, सहकारमाफिया,कारखानदारमाफिया,भेसळमाफिया,तेलमाफिया या सर्वांचे पोशिंदे असलेल्या या टग्यांच्या वारसदारांकडून राज्यात काहीही भ्रष्टाचारमुक्त राहिलेले नाही. आता तर त्यांनी इज्जतीवर हात घालायलाच सुरूवात केली आहे. 'टग्यांचा खरा वारसदार कोण ?' अशीच स्पर्धा राज्यात सुरू झाली आहे. त्यामुळे राज्यात आगामी काळात यापेक्षाही भयानक घटना घडू शकतील. देवा आता तूच वाचव रे बाबा. देवा तू तरी आहेस ना जागेवर ? का तूझीही या टग्यांनी भेसळ केली ?

Tuesday, February 22, 2011

गोध्राकांड : पूर्वनियोजित कट हेच सत्य


27 फेब्रुवारी 2002 रोजी साबरमती एक्सप्रेसच्या एस-6 कोचमध्ये जिवंत जाळलेल्या 59 कारसेवकांच्या आत्म्यांना हायसं वाटलं असेल. कारण न्यायालयानं गोध्रा जळीतकांड हा पूर्वनियोजित कटच असल्याचा महत्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालामुळं काँग्रेससारख्या जातीयवादी पण धर्मनिरपेक्षतेचा आव आणणा-या पक्षांचा आणि सेक्युलर म्हणवाणा-या एका वर्गाचंही चांगलंच थोबाड फुटलं आहे. कारण ज्या दिवशी या कारसेवकांना धर्मांध मुस्लिमांनी जाळलं त्या नंतर काँग्रेस आणि धर्मनिरपेक्षतावादी
म्हणवणा-यांच्या प्रतिक्रिया आठवल्या तरी अंगावर शहारे येतात. मतांसाठी हिंदूत्ववाद्यांनीच आग लावली असा संतापजनक आरोप करण्यात आला होता. लालू प्रसाद यादव सारख्या मुर्ख रेल्वेमंत्र्यानं नेमलेल्य कमीशननंही तसाच अहवाल दिला होता. ही अशी धर्मनिरपेक्ष अवलाद जर देशात निपजलेली असेल तर हिंदूंचं काय भलं होणार ? आता न्यायालयाच्या निकालाची एक प्रत त्या मूर्ख लालूच्या थोबाडावर फेकून मारायला हवी. कारसेवकांनी मुलींची छेड काढल्यामुळं काही मुस्लिमांबरोबर त्यांचं भांडण झालं आणि त्याच पर्यवसन त्यांना जाळण्यात झालं अशीही एक घाणेरडी थेअरी मांडण्यात आली होती.

मात्र हे हत्याकांड गोध्रा शहरातल्या ज्या रेल्वे स्थानकाजवळ घडलं ती वस्ती संपूर्णपणे मुस्लिमांची आहे. त्या भागाला मिनी पाकिस्तान असंही म्हटलं जातं. ज्या पद्धतीनं रेल्वेचा अख्खा कोच जाळण्यात आला त्यावरून तो कट किती तरी दिवस आधीच शिजला होता, हे स्पष्ट होतं. मात्र धर्मनिरपेक्षतावाद्यांची जीभ हे हत्याकांड मुस्लिमांनी घडवलं हे म्हणायला कचरत होती. आता न्यायालयाच्या निकालानं त्यांची जीभच हासडली गेली आहे.

गोध्राकांड ज्या दिवशी घडलं त्याच्या दुस-या दिवशी हिंसक प्रतिक्रिया उमटली. मात्र ही हिंसक प्रतिक्रिया मुस्लिमांच्या मोहल्ल्यात उमटली. अहमदाबादमध्ये मुस्लिमांनी दोन हिंदूंची हत्या केली. आणि मग त्या नंतर शांत असलेल्या हिंदूंनी रस्त्यावर उतरून 59 कारसेवकांच्या हत्येचा बदलाच घेतला. साबरमती एक्सप्रेसमध्ये जाळून मारण्यात आलेल्यांमध्ये 20 लहान मुलं होती. पंधरा महिला होत्या. मात्र धर्मांधांचे हात त्यांना जाळताना थरथरले नाहीत. या घटनेची प्रतिक्रिया मग रस्त्या - रस्त्यावर उमटली. अर्थात या ठिकाणी त्या प्रतिक्रियेचं समर्थन करण्याचा हेतू नाही. मात्र 'क्रिया' घडलीच नसती तर 'प्रतिक्रिया'ही उमटली नसती, हे ही लक्षात ठेवायलंच हवं. गोध्राकांडाला आता नऊ वर्ष होऊन गेली आहेत. मात्र या नऊ वर्षात गुजरातमध्ये कुठेही दंगल घडली नाही. कारण तिथं दंगलखोर जातीला चांगलाच धडा शिकवण्यात आला आहे. अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, असा दराराच तिथं निर्माण झाला आहे. नाठाळाच्या माथी काठी हाणावीच लागते.
हिंदू हा मुळातच शांतताप्रिय आहे. या शांततेमुळंच हिंदू हे प्रतिक्रियावादी बनले आहेत. मोघल शासक बाबरनं राम मंदिर पाडून मशीद बांधली. याची प्रतिक्रिया ही बाबरी मशीद पाडण्यात झाली होती. मुस्लिमांनी 59 कारसेवकांना जाळलं, त्याची प्रतिक्रिया म्हणून दंगली पेटल्या. त्यामुळं या 'क्रियावादी' शक्तींना रोखण्याची गरज आहे. आणि क्रियाच झाली नाही तर प्रतिक्रियाही उमटणार नाहीत, हे ही तितकंच सत्य आहे.
या धर्मनिरपेक्षतावाद्यांनी कारसेवकांच्या जळीतकांडानंतर जशा थेअरी मांडल्या होत्या, तशीच थेअरी या ठिकाणी मांडू यात. समजा 27 फेब्रुवारी 2002 रोजी साबरमती एक्सप्रेसमध्ये कारसेवकांना जाळण्याऐवजी हज यात्रेला जाणा-या मुस्लिमांना जाळण्यात आलं असतं तर ? काय प्रतिक्रिया उमटली असती. कारसेवकांच्या जळीतकांडाची प्रतिक्रिया फक्त गुजरातमध्येच उमटली होती. मात्र जर हज यात्रेकरूंना जाळलं असतं तर ? अहो देशभर तर सोडाच जगभरात प्रतिक्रिया उमटल्या असत्या. रस्त्या - रस्त्यावर धर्मांध मुस्लिम उतरले असते. त्यामुळं शांतताप्रिय हिंदूंना डिवचू नका, यातच सगळ्यांचं हित सामावलेलं आहे.
न्यायालयानं गोध्राकांड प्रकरणी 31 जणांना दोषी ठरवलं आहे. तर 64 जणांची पुराव्याअभावी सुटका केली आहे. आता या दोषींनी कठोर शिक्षा मिळायलाच हवी, तरच 59 कारसेवकांच्या आत्म्यांना मुक्ती मिळू शकेल.

Friday, February 18, 2011

आता सगळं - सगळं विसरा !

19 फेब्रुवारीपासून क्रिकेट वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. 2 एप्रिल रोजी मुंबईत वानखेडे स्टेडियमवर फायनल मॅच होणार आहे. त्यामुळे या 43 दिवसांच्या अवधीत सगळेच प्रश्न मागे पडणार आहेत. प्रश्नच नव्हे तर सगळे घोटाळे, भ्रष्ट राजकारणी यांना आता संरक्षणच मिळणार आहे. कारण आता मीडियात चर्चा राहणार आहे ती फक्त वर्ल्ड कपचीच. आता खुद्द मीडियालाच आठवण राहणार नाही की, त्यांनी कोणकोणत्या प्रश्नांवर रान उठवलं होतं. मीडियामुळेच कॉमनवेल्थ घोटाळ्याचे आक्राळविक्राळ रूप जगासमोर आले होते. वाळुमाफिया, तेल माफिया यांच्यावर काही प्रमाणात अंकुश आला तो मीडियामुळेच.
मात्र आता, वर्ल्ड कपचे हे 43 दिवस म्हणजे या माफियांसाठी फॉलोऑनच म्हणायला हवा. कारण धर्माला अफूची गोळी म्हटलं जातं. आणि आपल्या देशात क्रिकेट हा धर्मच असल्यानं या अफूच्या गोळीचा तब्बल 43 दिवसांपर्यंत अंमल राहणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचार, घोटाळे, वाळुमाफिया, पेट्रोल माफिया, डिझेल माफिया, रॉकेल माफिया, दूध माफिया, शिक्षण माफिया, साखर माफिया, कांदा माफिया यांच्यावर कोणाचाही अंकुश राहणार नाही. या सर्व माफियांवर कायद्याने जरब बसवण्याची क्षमताच सरकारमध्ये राहिलेली नाही. मीडियामुळेच यांच्यावर थोडाफार अंकुश राहिलेला आहे. परिणामी मीडियाची जबाबदारी वाढलेली आहे. मीडियाने स्वत:वर या अफूच्या गोळीचा परिणाम होणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
कालच म्हणजेच 17 फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयानं आदर्शप्रकरणी गहाळ झालेल्या फाईलचा तपास सीबीआयकडे सोपवला. कारण चोरच चोरीचा तपास लावणार नाहीत, हे न्यायालयाच्या लक्षात आलं आहे. कारण या राज्यात फाईलच नव्हे तर अख्खं सरकारच गहाळ झालेलं आहे. आता याचा तपास कोणाकडे द्यायचा ? राज्यात राज्यकर्ते नव्हे माफियांचे पोशिंदेच सरकार चालवत असल्याने माफियांवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही.
सरकार काम करत नाही. मात्र गैरमार्गाने सगळी कामे होत आहेत. त्यामुळे राज्यात आणि देशात भ्रष्टाचार बोकाळला आहे. क्रिकेट वर्ल्ड कप हा मोठा इव्हेन्ट असला तरी मीडियानं या घोटाळ्यांवरून लक्ष विचलीत होऊ देता कामा नये. कारण राज्यात आणि देशात भ्रष्टाचारी नेते, अधिकारी हे देश विकण्यासाठी टपलेले आहेत. या बोक्यांना देश फक्त ओरबडून खायचा आहे. या बोक्यांची शिकार करायची असेल तर मीडियाला सजग रहावंच लागेल.