Sunday, June 12, 2011

दलित मतांसाठी राष्ट्रवादीचा 'सनद'शीर मार्ग

शिवशक्ती - भीमशक्तीचा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगलाच धसका घेतल्याचं आता स्पष्ट होतंय. 9 जूनरोजी चैतन्यमय वातावरणात शिवशक्ती - भीमशक्तीचा महामोर्चा आझाद मैदानात पार पडला. दुस-याच दिवशी सोमय्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसनं सामाजिक परिवर्तन हक्क परिषद आयोजित केली होती. शिवशक्ती - भीमशक्तीमुळं राष्ट्रवादी काँग्रेस कशी धास्तावली, आहे हेच यातून दिसून येत होतं.
'गेल्या घरी सुखी रहा' असा एखाद्या वधू पित्यानं टाहो फोडावा त्या स्वरात शरद पवारांनी त्यांचं मत व्यक्त केलं. रामदास आठवलेंना धर्मनिरपेक्षतेची आठवण करून देण्यात येत होती. हे कमी की काय ? म्हणून शरद पवारांनी बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांमधील 1 ते 8 प्रतिज्ञा वाचून दाखवल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाया खालील वाळू किती सरकू लागली आहे, हेच त्यांच्या या कृतीतून स्पष्ट झालं.

छगन भुजबळांनी त्यांच्या बाटग्या निष्ठा किती श्रेष्ठ आहेत हे दाखवण्यासाठी शरद पवारांना थेट फुले, शाहू, आंबेडकरांच्या पंक्तीत नेऊन बसवलं. मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर करून शरद पवारांनी सत्ता पणाला लावली, असंही भुजबळ म्हणाले. 1978 साली विधानसभा आणि विधानपरिषदेत मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याचा ठराव एकमतानं संमत करण्यात आला होता. हा ठराव संमत झाल्यानंतर मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी दलित वस्त्यांवर काँग्रेस नेत्यांनी हल्ले केले होते. कित्येक दलितांच्या झोपड्या बेचिराख करून टाकण्यात आल्या होत्या. 1978 साली संमत झालेला ठराव प्रत्यक्षात येण्यासाठी 1994 साल उजाडावं लागलं. 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, असा नामविस्तार करण्यात आला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुचवलेला नामविस्ताराचा पर्याय सर्वांच्या पसंतीला पडला. नामविस्तारामुळं आणि शिवसेनेच्या भुमिकेमुळं 1978 सारखी परिस्थिती मराठवाड्यात उदभवली नाही. राज्यकर्ते म्हणून शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी नामांतर, नामविस्तार याचं श्रेय नक्कीच घ्यावं. पण हे श्रेय त्यांनी आधी नव्हे तर शेवटी घ्यायला हवं. कारण 1978 मध्ये झालेला ठराव प्रत्यक्षात साकारण्यासाठी तब्बल 16 वर्ष त्यांना लागली. या मधल्या काळात दलित संघटनांना मोठा संघर्ष करावा लागला. कित्येक मोर्चे, बंद घडवावे लागले. दलित कार्यकर्त्यांना लाठ्या-काठ्या झेलाव्या लागल्या. कित्येकांना तुरूंगवास घडला. याच आंदोलनातून रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे, गंगाधर गाडे असे कित्येक नेते घडले.

दलित चळवळीचं केंद्रबिंदू ठरलेल्या संभाजीनगरात नामांतरासाठी कित्येक मोर्चे निघाले. रिपब्लिकन पार्टीच्या कोणत्याही गटाचा मोर्चा असला तरी नागरिक त्यात सहभागी होत होते. एक दिवसाच्या ओल्या बाळंतणीपासून तर नव्वद वर्षांच्या वृद्धापर्यंतची रस्त्यावर उतरलेली आंबेडकरी जनता संभाजीनगरनं पाहिलेली आहे. तब्बल 16 वर्ष दलित जनतेनं नामांतरासाठी लढा दिला. त्यामुळं शरद पवार आणि छगन भुजबळ नामांतराचं पहिलं श्रेय तुमचं नव्हे तर, या लढाऊ दलित जनतेचं आहे. जी एक दिवसाची ओली बाळांतिण माता रस्त्यावर उतरली तिचं ते श्रेय आहे. काँग्रेसवाल्यांनो, जर इतकंच श्रेय घ्यायची हौस होती तर मग 1978 मध्येच नामांतर का केलं नाही ?

आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसला दलित मतदारांना आपल्याकडं आकृष्ट करण्यासाठी सनद जाहीर करण्याची वेळ आली आहे. मागील साठ वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि काँग्रेसमधून फुटून निघालेल्या नकली काँग्रेस अर्थात एनसीपी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसनं ते अपयशी ठरल्याचंच मान्य केल्याचं स्पष्ट होतंय. मागील साठ वर्षात दलितांबरोबर बनवाबनवी केली, मात्र त्यांचा विकास घडवून आणण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीला करता आलं नाही. दलितांची मतं घेऊन काँग्रेसी राज्यकर्ते कायम सत्तेत राहिले. पण दलित जनतेला सत्तेत मतांच्या प्रमाणात वाटा कधीच मिळाला नाही. दलितांच्या मतांची रसद

घेणा-यांना आता सनद आठवली आहे. मात्र ही सनद फक्त सत्ता आणि मतं मिळवण्यासाठीच आहे, हे ही तितकंच खरं आहे.

त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा हा सनदशीर मार्ग किती फसवा आहे, हे दलित जनतेच्या लक्षात आलं आहे. आगामी काळात शिवशक्ती आणि भीमशक्तीचाच पर्याय सशक्त करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जातीय राजकारण गाडून टाकण्याची संधी जनतेसमोर निर्माण झाली आहे.

Tuesday, June 7, 2011

ही चित्रं पहा आणि मग बोला...

दिग्विजय सिंह सोनियाजींचा हा डान्स बघितला. मग आता काँग्रेसही नाच-यांचा पक्ष आहे, असंच तुम्हाला म्हणायचं आहे का ?





Friday, June 3, 2011

अजित पवार का बिथरले ?

शिखर बँकेला जमीनीवर आणण्याचा पराक्रम करणारा शरद पवारांचा पुतण्या अजित पवार याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर गरळ ओकली. टू जी स्पेक्ट्रम, लवासा, पुण्यातील जमीन, शाहीद बलवा, कारखान्यांना पॅकेजेस देऊन ते खाणे, सहकार बँक बुडवणे अशी भ्रष्टाचाराची जंत्रीच पवार आणि कंपनीच्या मागे लागली आहे. त्यामुळे या सर्वांना फाटा देण्यासाठी आणि जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच अजित पवारांनी ही गरळ ओकल्याचं स्पष्ट होतंय.
तसंच शिवशक्ती आणि भीमशक्तीचा राज्याच्या पटलावर झालेला उदय, यामुळे ही दलित मतांना गृहित धरणा-या अजित पवारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांची टगेगिरीच बंद होणार आहे. त्यामुळं अजित पवार आणि कंपनी दिवसाढवळ्या बरळू लागली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कोणत्या संस्था काढल्या ? असा त्यांचा सवाल होता. मात्र हा सवाल विचारण्याची वेळ त्यांच्यावर का आली ? कारण पवार आणि कंपनीनं काढल्या सगळ्या संस्था, त्यांच्या ताब्यात असलेली बँक आता डबघईला आली आहे. सर्व साखर कारखाने कोट्यवधींचे पॅकेज देऊनही तोट्यात चालले आहेत. मात्र मिळालेल्या पॅकेजच्या जोरावर राष्ट्रवादीचे जिल्ह्या जिल्ह्यातील सरंजामदार गब्बर होत चालले आहेत. जनतेला हा सर्व भ्रष्टाचार दिसू लागला आहे. जनता राष्ट्रवादीच्या विरोधात चिडली आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीचे नेते स्वत: शेण खाऊन दुस-याचं तोंड हुंगत आहेत.
सोनिया गांधींच्या परदेशीपणाचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. मात्र स्थापना झाल्यापासून हा पक्ष सोनिया गांधींच्या पदराचा आश्रय घेऊन राज्यात सत्तेत आहे. म्हणजे सोनिया गांधींनी विरोधही करायचा, त्यांच्या पदराखाली राहून सत्तेची मर्दूमकी गाजवायची असा या राष्ट्रवादींचा 'पुरूषार्थ' आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करताना प्रत्येक जिल्ह्यातील कारखानदार, सरंजामदार अशी मंडळी हाताशी धरली. या मंडळींनी पोसण्यासाठी त्यांच्या कारखान्यांना पॅकेज दिली. त्यातून राष्ट्रवादी मंडळी गब्बर झाली. कारखाने तर त्यांनी खाल्लेच, सहकारी बँकही बुडवली. आता हिच मंडळी खाजगी साखर कारखाने काढत आहेत. म्हणजे जनतेचा पैसा लुटणारी आणि सरकारला ठेंगा दाखवणारी ही राष्ट्रवादीची नेते मंडळी किती निर्लज्ज आहे, हेच यातून दिसून येतं.
फक्त मराठ्यांचा पक्ष असा, नावलौकिक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळांची केविलवाणी अवस्था झाली आहे. फक्त शरद पवारांच्या पुतण्याला उपमुख्यमंत्री व्हायचं म्हणून कोणतीही 'टाळी' न वाजवता भुजबळांना ते 'माळी' आहेत म्हणून हटवण्यात आलं. आणि हेच नेते जातीयवादाच्या विरोधात बोलतात तेव्हा जनतेची फुकटात करमणूक होते. भ्रष्टाचारात बरबटलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची ही टगेदारी सहकार क्षेत्रात सुरू ठेवावी. शिवसेनाप्रमुखांवर चिखल उडवण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये.

Monday, May 2, 2011

असाच दफनावा लागतो दहशतवाद !

ओसामा बिन लादेनला अखेर अमेरिकेने जलसमाधी दिलीच. अमेरिकेवर हल्ला करणा-या ओसामा बिन लादेनला त्याच्या पापाची शिक्षा अमेरिकेने दिली. अमेरिकेला जगातलं बलाढ्य राष्ट्र का म्हणतात ? त्याचीच प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा जगाला आली. दहशतवाद हा कसाब सारख्या अतिरेक्यांना बिर्याणी खाऊ घालून, पाकिस्तानसारख्या बिनडोक राष्ट्राबरोबर शांततेच्या चर्चा करून संपवता येत नाही. अतिरेक्यांना बिर्याणी नव्हे तर ओसामाला जशा मस्तकात गोळ्या घातल्या तशाच गोळ्या घालून संपवावा लागतो.
ओसामा बिन लादेनला ठार केल्याची बातमी जगभरात सगळ्यांना सुखावून गेली. दहशतवादाचा चेहरा आणि क्रूरकर्माच अमेरिकेने गाडून टाकला. जगभरात अल कैदा आणि दहशतवादी हल्ल्यांनी पोळलेल्या नागरिकांच्या जखमेवरच जणू काही फुंकर मारली गेली.
11 सप्टेंबर 2001 रोजी वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला म्हणजे अमेरिकेच्या स्वाभिमानावरील हल्ला होता. त्याच क्षणी अमेरिकेनं ओसामाला जिवंत किंवा मृत पकडणारच असं जाहीर केलं होतं. दहा वर्ष ओसामाला शोधण्यासाठी अमेरिकेनं जंगजंग पछाडलं. अफगाणिस्तानातल्या पर्वातांच्या रांगा पालथ्या घातल्या. या सर्व काळात लादेन पाकिस्तानातच असल्याचाही सगळ्यांचा संशय होता. कारण पाकिस्तान म्हणजे 'दहशतवादाची मक्का'च आहे. अखेर हा 'दहशतवादाचा हाजी' त्याच मक्केत सापडला. 'लादेन पाकिस्तानात नाही', असं सांगणा-या पाकिस्तानचं नसलेलं नाक पुन्हा एकदा कापलं गेलं.
जगातला आणखी एक मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानातच असल्याचा पुरावा अनेकदा हिंदूस्थाननं दिलाय. मात्र नेहमी प्रमाणे 'लांड्या' बुद्धीच्या पाकिस्ताननं सर्व पुरावे नाकारले.
'लादेनच्या दफनविधीसाठी कोणत्याही देशानं जमीन दिली नसती' , असं कारण सांगत अमेरिकेनं त्याला जलसमाधी दिली. ( मालेगाव आणि मिनी पाकिस्तानातल्या धर्मांध मुस्लिमांना अमेरिकेचं हे म्हणनं पटलं असेल का ?) कारण लादेनची कबर खणली असती तर त्याचं उदात्तीकरण होण्याचाही धोका होता, असा त्यामागचा उद्देश असल्याचंही अमेरिकेनं स्पष्ट केलं.
आणि अमेरिकेचा हेतू किती खरा आहे, याचा पुरावा आपल्याच राज्यात आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाला याच मातीत पुरलं. स्वराज्यावर चालून येणा-यांची अशीच गत होईल असा संदेशच त्यांनी दिला. शिवाजी महाराजांनी 'वैरी मेला वैर संपले' या न्यायानं अफजल खानाची कबर बांधली.

मात्र आता प्रतापगडाच्या खाली काय दिसतं ? अफजल खानाच्या कबरीचं धर्मांध मुस्लिमांनी काँग्रेसच्या राजवटीत उदात्तीकरण केलं. मात्र हा धोका अमेरिकेच्या वेळीच लक्षात आला. आणि हे एका अर्थानं चांगलंही झालं, असंच म्हणावं लागेल. नाहीतर लादेनच्या कबरीवर फुलं वाहण्यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी त्यांच्या मागेमागे मनमोहन सिंह आणि युपीएचं शिष्टमंडळ नक्कीच पोचलं असतं. अनेक धर्मांध मुस्लिमांनाही लादेनच्या कबरीचा उमाळा आला असता. त्या धर्मांधांच्या सोयीसाठी हज यात्रेप्रमाणं विमान प्रवासासाठी अनुदानही देण्यात आलं असतं. हे असं घडलंच असतं. कारण काँग्रेसच्या मुस्लिम प्रेमाचा इतिहास सगळ्यांच्या परिचयाचा आहे.
अमेरिकेनं दहशतवादाचं धड वेगळं केलंय. आता दहशतवादाचे जगभरात पसरलेले अवयवही छाटून टाकावे लागतील. मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला, संसदेवर झालेला हल्ला, देशाच्या अनेक भागात सातत्यानं होणारे हल्ले, काश्मीरमधल्या कारवाया असे अनेक हल्ले आपण पचवले आहेत. अजमल कसाब, अफजल गुरू यांना तरीही जिवंत ठेवण्यात आलं आहे. कारण आपल्या देशात नेभळटांचं सरकार आहे. त्यामुळं दहशतवादाच्या विरोधात लढण्याची आणि दहशतवाद्यांना गोळ्या घालण्याची शक्तीच या सरकारमध्ये नसल्याचं स्पष्ट होतं.
अमेरिका, तू दहशतवादाला दफन केलं. आमच्या देशावर चालून आलेले दहशतवादी कधी दफन होणार ? हाच सवाल आता सर्व देशवासियांच्या मनात आहे.

Friday, April 29, 2011

बांग्लादेशात हिंदूंवर बलात्कार, पाकिस्तानात हिंदूंना जाळले, पण प्लीज थंड बसा !

धर्म ही अफूची गोळी आहे. आणि हे वरील चित्र ते दाखवून देण्यासाठी पुरेसं आहे. मात्र या अफूच्या गोळीचं ज्यांना व्यसन लागलं आहे, त्यांचं हे व्यसन दूर कसं करायचं ? यावर काही गोळी आहे का ? कारण या आपल्या निधर्मी देशात सिंगल कॉलम छापून आलेल्या दोन बातम्यांचा परामर्श या लिखाणात घेतला आहे. बांग्लादेशमध्ये हिंदूंवर रोजच अत्याचार होतात. राजरोसपणे हिंदू मुलींना पळवून नेऊन त्यांच्यावर बलात्कार केला जातो. हिंदूंना रोजच मुस्लीमांचा मार खावा लागतो. खाली दिलेलं हे बांग्लादेशमधल्या मुस्लिमांच्या अत्याचाराचं चित्र या साठी पुरेसं आहे. http://hindubd.blogspot.com/ वर हिंदूंची बांग्लादेशमध्ये काय स्थिती आहे, हे नमूद करण्यात आलं आहे.

२००१ च्या निवडणुकीनंतर शेकडो हिंदू स्त्रियांवर बांग्लादेशमध्ये बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमात ए इस्लामीच्या कार्यकर्त्यांनी बलात्कार केल्याचा सरकारी आकडा आहे. आपल्याकडे ही सिंगल कॉलम बातमी आता छापून आली आहे. मात्र ती बातमी वाचून प्लीज कोणीही पेटून उठू नका. कारण अत्याचाराचा हा पाढा काही अजून संपलेला नाही. हिंदू मुलींवर बलात्कार करून त्यांना मुस्लिम होण्यासाठी भाग पाडलं जात आहे. दिवसाढवळ्या हिंदूंची मंदिरं लूटली जात आहेत. वर दिलेल्या ब्लॉगमधील कॉमेन्टस वाचा, हिंदूंनी कसा तिथं टाहो फोडला आहे, ते हिंदूस्थानकडून मदतीची अपेक्षा करत आहेत हे दिसून येतं. हिंदू आणि बौद्धांच्या श्रद्धास्थानांना तिथं मातीत मिळवलं जात आहे. बांग्लादेशमधला वरती लिंक दिलेला ब्लॉग १० जानेवारी २०११ रोजी अपडेट झाला आहे. त्यानंतर म्हणजे आजपर्यंत साडेतीन महिन्यात तो अपडेट झालेला नाही. कुणास ठाऊक तो ब्लॉग लिहणारा मुस्लिमांच्या हातून तर मारला गेला नसेल ना ? अशी भीती वाटतेय.


वरती जळणारी ही बस पहा. ही जळणारी बस नव्हे तर हिंदूंची पाकिस्तानातली चिता आहे. पाकिस्तान आणि बांग्लादेशातले हिंदू काय मुस्लिमांच्या हातून मरायलाच जन्माला आले आहेत का ? पाकिस्तानातल्या बलुचिस्तानातल्या क्वेटामध्ये प्रवास करणा-या हिंदूंची बस चार सशस्त्र मुस्लिमांनी अडवून ती पेट्रोलनं पेटवून दिलं. त्यात सात चिमुकल्यांसह पंधरा जणांचा मृत्यू झाला. थांबा, शांत व्हा, रक्त उसळू देऊ नका. कारण अत्याचाराची मालिका अजूनही संपलेली नाही. बलुचिस्तानमध्येही हिंदूंची हत्या, मुलींना पळवून नेऊन त्यांना मुस्लिम करणे, बलात्कार करणे या घटना सुरू आहेत. अतिरेकी आणि धर्मांध मुस्लिम कधी हल्ला करतील याचा नेम नाही. तिथल्या सरकारी आकड्यानुसार 2010 या वर्षात 291 हिंदूंचं अपहरण करण्यात आलं. शेवटी हा सरकारी आकडा. त्यातले कित्येक परत आलेच नाहीत. अनेकांना मोठी रक्कम देऊन सोडवून आणावं लागलं.

बांग्लादेश आणि पाकिस्तानातल्या हिंदूंना किती दिवस आपण मरू देणार आहोत ? त्यांनाही जगायचं आहे. मात्र तिथले मुस्लिम त्यांना जगू देणार नाहीत. हिंदू माता - भगिनींची दिवसाढवळ्या विटंबना तिथं सुरूच राहिल. 'आम्हाला हिंदूस्थानात येऊ द्या' असा टाहो बांग्लादेश आणि पाकिस्तानातल्या हिंदूंनी फोडला आहे. अरे निधर्मी सरकारच्या षंढांनो तुमच्या कानावर हा टाहो पडत नाही का ? आपल्या हिंदू बांधवांवरील हा अत्याचार थांबवावा असं तुम्हाला वाटत नाही का ?

सरकार म्हणून तुम्हाला जरी काही वाटत नसलं तरी ते आमचे रक्ताचे हिंदू बांधव आहेत. नाही तरी देशात रोज बांग्लादेशी मुस्लिमांची घुसखोरी, पाकिस्तानातून अतिरेक्यांची घुसखोरी सुरूच आहे. कोट्यावधी बांग्लादेशी मुस्लिम हिंदूस्थानात सुखाने जगत आहेत. मग आपल्या रक्ताच्या हिंदूंना आपल्यात सामावून घेणं काहीच अवघड नाही. पाकिस्तान आणि बांग्लादेशातल्या हिंदूंना त्यांच्या स्वत:च्या हिंदूस्थानात आसरा द्या. पाकिस्तान आणि बांग्लादेशातल्या नागरिकांना अल्पसंख्यक हिंदू नको आहेत. चालेल आम्ही आमचे हिंदू आमच्या देशात सामावून घेतो. तुम्ही तुमचे मुसलमान तुमच्या देशात सामावून घ्या. आता आहे का काही उत्तर लांड्यांनो...बांग्लादेश आणि पाकिस्तानातल्या.

http://www.thereligionofpeace.com/ या वेब साईटवर मुस्लिम अत्याचाराच्या जगभरातल्या अधिक छळ कथा वाचा.

Friday, April 8, 2011

नेतृत्व नसलेल्या समूहाचा नेता आणि मीडिया

देशाचा सर्व मीडिया सध्या अण्णामय झाला आहे. युपीए सरकारचा माजच अण्णांनी उतरवल्याचं स्पष्ट झालं आहे. कपिल सिब्बल, प्रणव मुखर्जी यांना नाक घासत अण्णांसमोर जावं लागलं. सोनिया गांधींनीही त्यांना उपोषण मागं घेण्याची विनंती केली. पण आपल्या मागणीवर ठाम असलेल्या अण्णांनी काँग्रेसी नेत्यांची मागणी धुडकावून लावली. समितीत दोन अध्यक्ष आणि दोन्ही पक्षांचे पाच सदस्य असावे ही मागणी त्यांनी कायम ठेवली आहे. मात्र सरकारसमोर झुकणार नाही असं स्पष्ट करताना देशातल्या नागरिकांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या भावना किती तीव्र आहेत, हेच या घटनाक्रमातून दिसून येत आहे. जंतरमंतरवर जमलेली गर्दी, मुंबईत आझाद मैदानात सुरू असलेलं उपोषण या सह देशभरात अण्णांना पाठिंबा देण्यासाठी 'आम आदमी' उत्सफूर्तपणे रस्त्यावर उतरला आहे. ही काही काँग्रेसच्या सभेला जशी भाड्यानं माणसं आणावी लागतात तशी गर्दी नाही. हा नागरिकांच्या मनात भ्रष्टाचाराविषयी असलेला राग आहे, तो व्यक्त करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. देशात सुरू असलेली भ्रष्टाचाराची मालिका पाहून नागरिकांच्या मनात संताप निर्माण झाला होता. पण नागरिकांचा राजकीय पक्षांवरील विश्वास कमी होत चालला आहे, हे कटू सत्यही या निमीत्तानं अधोरेखीत झालं. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याची घोषणा राजकीय पक्षांनी केली, पण त्यांना नागरिकांचा पाठिंबा मिळू शकला नाही. कारण आता राजकीय नेत्यांची भ्रष्टाचारांमुळं पत घसरली आहे. लोकपाल विधेयकासाठी अण्णांनी उपोषणाची घोषणा करून, उपोषणला सुरूवात करताच देशभरातल्या नागरिकांना नेतृत्व मिळालं. भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांचा संताप व्यक्त करण्यासाठी त्यांना एक माध्यम मिळालं. भ्रष्टाचाराच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारे लढणा-या नागरिकांना त्यांच्या समूहांना अण्णा हजारेंच्या माध्यमातून एक नेता मिळाला.


हिंदी, इंग्रजी आणि मराठी इलेक्ट्रॉनिक मीडियानं या जनआंदोलनाची जोरकस नोंद घेतली. बीबीसीनंही हे आंदोलन वेगळं रसायन असल्याचं स्पष्ट केलं. इजिप्त, लिबियानंतर आता भारताचा नंबर तर नाही ना ? या शंकेनं भ्रष्टाचारी नेत्यांना धडकी भरली. पण काही (विकलेले) पत्रकार, वृत्तपत्रं यांना जनतेची नाडी कळालीच नाही. अण्णांच्या आंदोलनाला आततायीपणा संबोधण्यात आलं. निवडणुकीच्या काळातच असणारा पेड न्यूजचा प्रकार आता रोजच्या बातम्यांमध्येही येऊ घातला आहे की काय ? अशी शंका आता येत आहे. कारण बातमीत बातमी न राहता मत प्रदर्शित होऊ लागलं आहे. काही (सुपारीबाज) पत्रकारांनी हे आंदोलन म्हणजे सेलिब्रिटींची प्रसिद्धीसाठीची धडपड, मेणबत्त्यावाल्यांचा स्टंट अशा प्रकारे बातम्या दिल्या आहेत. पॅकेज पत्रकारिता करणारे पत्रकार या घटनेमुळं उघडे पडत आहेत. अण्णांच्या आंदोलनाला वेगळं वळण देण्यासाठी त्यांना नेहमीप्रमाणं पॅकेज दिलं जात असेल अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे.

नेतृत्व नसलेल्या समूहाला अण्णांच्या रूपानं नेता मिळाला. पण ज्यांच्याकडं समाजाला दिशा देण्याची जबाबदारी आहे अशा काही अपवादात्मक माध्यमांनी बातम्यांचा धंदा मांडला आहे. त्यामुळं अशा पोटार्थी माध्यमं आणि पत्रकारांचीही पत आगामी काळात रसातळाला जाईल यात शंका नाही.

Wednesday, April 6, 2011

विश्वविजेते आणि 'लांड्या' मनाचा आफ्रिदी

2 एप्रिल 2011 रोजी टीम इंडियानं श्रीलंकेवर मात केली. आणि टीम इंडिया विश्वविजेता बनली. त्या आधी झालेल्या पाकिस्तान बरोबरच्या लढतीतही विजय मिळवला. या मॅचनंतर आफ्रिदीनं, टीम इंडियानं चांगली कामगिरी केल्याचं सांगितलं. टीम इंडियाचा खेळ सरस असल्यानं बेस्ट टीम जिंकली अशी, प्रतिक्रिया व्यक्त करून त्याच्यातली खेळ भावना दाखवून दिली. टीम इंडियाच्या विजयानंतर देशभरात सर्वत्र जल्लोष सुरू होता. आणि या जल्लोषाच्या वातावरणातच भारतीयांच्या मनाला छेद देणारी प्रतिक्रिया पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रिदीनं व्यक्त केली. मात्र पाकिस्तानात गेल्यावर त्यानं त्याची एक'जात' प्रतिक्रिया थेट बदलून टाकली. मुस्लिम आणि पाकिस्तानातल्या नागरिकांप्रमाणं भारतीय नागरिकांचे 'दिल बडा नहीं', अशी प्रतिक्रिया त्यानं व्यक्त केली. अर्थात त्यावर वादंग उठल्यानंतर, माझ वक्तव्य चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आल्याची उलटी बोंब त्यानं ठोकली.
अरे, आफ्रिदी तुझ्या देशात जितके मुस्लिम राहतात त्या पेक्षा जास्त मुस्लिम या देशात राहतात. तुझ्या देशात अल्पसंख्याक असणा-या हिंदू आणि ख्रिश्चनांना कशी वागणूक मिळते ? युसूफ योहन्ना हा एकेकाळचा ख्रिश्चन महंमद युसूफ का झाला ? कारण तो जर महंमद झाला नसता तर 'साफ' झाला असता. तुझ्या देशातला अतिरेकी अजमल कसाब. शेकडो निष्पाप नागरिकांचे प्राण घेऊनही अजून जिवंतच आहे. त्याला आम्ही बिर्याणी खाऊ घालतो. आमच्या राज्याचे गृहमंत्री तुरूंगात जाऊन 'कैसे हो कसाब ?' अशी विचारणा करतात. ते ज्या खात्याचे मंत्री आहेत ते पोलीस राजरोस रस्त्यावर खंडण्या उकळतात, आमदाराला मार - मार मारतात. त्या आमदारांची गृहमंत्री कधी चौकशी करत नाहीत. पण कसाबची चौकशी करतात. या पेक्षा आणखी कोणता दिलदारपणा आफ्रिदीला हवासा वाटतो ?

पाकिस्तानातून अतिरेकी अव्याहतपणे काश्मीरमध्ये घुसतात, देशभरात त्यांच्या अतिरेकी कारवाया सुरू असतात तरी भारतानं कधी पाकिस्तानवर हल्ला केलेला नाही. अरे आफ्रिदी हा दिलदारपणा तुला कसा दिसत नाही ?