Friday, August 20, 2010

हिंदूंनो, मुस्लीम व्हा, नाहीतर भारत सोडा

आपल्या धर्मनिरपेक्ष देशाचे तेज आज जगात उजळून निघाले. ज्या धर्मनिरपेक्ष देशाचे स्वप्न महात्मा गांधींनी पाहिले होते, ते स्वप्न आज ख-या अर्थाने अस्तित्वात यायला सुरूवात झाली आहे. कारण आता काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी शिखांना इस्लाम कबूल करा, नाही तर काश्मीर सोडा असे आवाहन केले आहे. महात्मा गांधी ( आणि त्यांच्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहूल गांधी, राहूल गांधींचे लग्न झाल्यानंतर जन्माला येणारा ज्युनिअर गांधी ) यांनी देशात जे धर्मनिरपेक्षतेचे रोपटे लावले होते त्याला आता चांगलीच 'हिरवी' फळे लागली आहेत. आणि आता ही 'फळं' गांधींसह सगळ्यांनाच ( चाखावी ) भोगावी लागणार आहेत.
भारतात जरी हिंदूंची लोकसंख्या जास्त असली, तरी जगात आपली ओळख ही धर्मनिरपेक्ष राष्ट्र अशीच आहे. आणि सर्व गांधी घराणे, काँग्रेस व इतर पुरोगामी पक्ष ही ओळख प्राणपणाने जपण्याचा प्रयत्न करताहेत. त्यामुळे काश्मीरमधल्या शिखांनी कोणतीही खळखळ न करता एकतर इस्लाम कबूल करायला हवा, किंवा काश्मीर तरी सोडायला हवं. संपूर्ण जग इस्लाममय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. 'हसके लिया पाकिस्तान, छिनके लेंगे हिंदुस्थान' ही पाकिस्तानातली लोकप्रिय घोषणा त्याचेच द्योतक आहे. आज काश्मीरमधल्या शिखांना इस्लाम कबूल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उद्या देशातल्या सर्वच धर्माच्या नागरिकांना इस्लाम कबूल करण्याचे आवाहन करण्यात येईल. अर्थात पुरोगामी असणारे लोक तेव्हा काही भूमिका घेतील की सरळ गोल टोप्या घालतील ? या विषयी आता तरी काही सांगता येणे शक्य नाही. मात्र जे इस्लाम कबूल करणार नाहीत, त्यांनी मरण्यासाठीची तयारी करून ठेवावी. कारण इस्लामी दहशतवादी त्यांच्या धर्मासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात.
तुमच्या धर्माने पोट भरेल का ?
बरं आपण काही वेळासाठी असं समजू की, सर्व जगाने इस्लाम धर्म कबूल केला. जगातले सर्व लोक अगदी प्राणीसुद्धा मुस्लीम झाले. मग त्यांना पोटभर खायला मिळेल ? त्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटेल ? सगळ्यांना रहायला घरं मिळतील ? माणसा-माणसातली स्पर्धा संपेल ? पृथ्वीची 'जन्नत' होईल ? तर या प्रश्नाची उत्तरं आहेत का कोणाकडे ? इराण-इराक ही मुस्लीम राष्ट्रे असूनही त्यांच्यात युद्ध झाले. इराकनेही इस्लामी राष्ट्र असलेल्या कुवेतवर हल्ला केलाच ना. म्हणजे दोन मुस्लीम राष्ट्रेही शांततेत राहू शकत नाहीत. तर मग सगळं जग जरी इस्लाममय झालं तर शांतता नांदेल याची खात्री कोणी देऊ शकेल का ?
पाकिस्तानातही पूर आलाच ना...
जगाच्या इस्लामी राष्ट्रांचे स्वयंघोषित नेतृत्व करणा-या पाकिस्तानात पवित्र रमजानच्या महिन्यात पूर आला. हजारो लोक त्यात ठार झाले. उपवासाच्या महिन्यात नागरिकांवर अन्नाच्या दाण्यासाठी मोहताज होण्याची वेळ आली. हे तर अल्लाची इबादत करणारं राष्ट्र. मग तिथे का अशी वेळ यावी ? ज्या हज यात्रेसाठी जगभरातून नागरिक जातात, तिथे तरी त्यांची सुरक्षा होते का ? इस्लाममध्ये मृतदेहावर अग्नी देऊन अंत्यसंस्कार करत नाहीत. मात्र 15 एप्रिल 1997 रोजी मीनात लागलेल्या आगीत 343 हज यात्रेकरूंचा अक्षरश: कोळसा झाला होता. देवाच्या दारातही कोणी सुरक्षीत नाही. मग हे अतिरेकी कशाला इतरांनी त्यांच्या धर्मात यावे यासाठी 'अतिरेक' करत असतील ?
मरण कुणालाही चुकले नाही...
जगात कुणालाही मरण चुकलेले नाही. कोणत्याही धर्माचा माणूस हा अमर नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मरण अटळ आहे. मुस्लीम झाला म्हणून कोणाचं मरण टळणार नाही, की कोणाच्या अन्नाची चिंता मिटणार नाही. माणसाचा खरा धर्म हा माणूसकीचा आहे. सहजीवन हाच मानवी जीवनाचा पाया आहे. आणि हे इस्लामी अतिरेकी या सहजीवनाच्या पायावरच आघात करायला निघाले आहेत. आणि या अतिरेक्यांना आता त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल. ज्या धर्मग्रंथाचे ते दाखले देतात, त्यात स्पष्टपणे असं बजावण्यात आलं आहे की, जी भूमी इस्लामला मानत नाही ती भूमी सैतानाची भूमी आहे. त्या भूमीवर मुस्लीमांनी एकही क्षण न थांबता 'हिजरत' करावे. म्हणजे ती भूमी तात्काळ सोडावी. आता आपला हा भारत देश. तो तर कोणताच धर्म मानत नाही. अर्थात सर्व धर्मांना स्वातंत्र्य देतो, पण देशाचा असा कोणताही धर्म नाही. तेव्हा अतिरेक्यांनो तुम्हीच तुमचा इस्लाम नीटपणे पाळा. या पवित्र भूमीने हजारो वर्षांपासून अनेकांचा सांभाळ केलाय. कित्येक संस्कृती इथं विकसीत झाल्या. कित्येक संस्कृती इथे सामावल्या गेल्या. अगदी तुमच्या सारख्या हिरव्या सापांचेही लाड झाले. आता त्याच भूमीवर फुत्कार घालून दंश करण्याचा प्रयत्न करू नका. सरळ तुमचा धर्म पाळा आणि 'हिजरत' करा.

Tuesday, August 3, 2010

जरा लांबलं बरं का

माझ्या ब्लॉगच्या अनियमीत वाचनात नियमीतपणा असणा-या वाचकांना यावेळी जरा थांबावंच लागलं. कारण जसा वाचकांच्या अनियमीत वाचनात नियमीतपणा असू शकतो. तसा तो लेखकाच्या अनियमीत लिखाणात नियमीतपणा असू शकतो. व्वा लेखाच्या सुरूवातीलाच चांगला पंच बसला नाही का ? आता कुणाचं उत्तर काही का असेना. पण आपण सकारात्मक विचारसरणी कशाला सोडायची ? आता विचार काही केला तरी वस्तूस्थिती काही बदलणार नाही. त्यामुळे यावेळी ब्लॉग मध्ये खंड पडला आणि जरा लांबलं हे कबूल केलेलं बरं.
मागील महिनाभरात अनेक विषय होते, ज्यावर लिहणं गरजेचं होतं. बेळगाव प्रश्न, एफएम वाल्यांचा मराठी द्वेष, महागाई, काश्मीर, परप्रांतीय असे ते विषय होते. बरं यात नवं असं काय होतं ? कारण हे प्रश्न तर पूर्वीपासूनच आहेत. फक्त ते नव्याने कधी उपस्थित होतात ? याचीच ती का उत्सुकता असते. पण आपण लिहण्यात एक मजा असते. सगळेच लिहतात. ( एक जनरल वाक्य. ) तसं मी ही लिहतो. ज्या व्यवसायात मी आहे, त्या व्यवसायात लिखाण करण्याची संधी तशी कमीच मिळते. अर्थात नोकरी, संसार सांभाळून लिहणं म्हणजे दिव्यच. अर्थात यावर कुणी मित्र असंही म्हणेल की, आम्ही नियमीत लिहतो. मग काय आम्हाला संसार नाही का ? असा प्रश्न जर कुणी उपस्थित केला तर तो मुळीच चुकीचा नाही. पण नोकरी, संसार सांभाळून हे वाक्य वापरण्यात आलंय ते सरळमार्गी संसारी व्यक्तीसाठी. ( जोक )
पण काही का असेना यावेळी जरा लांबलंच. कारण कधी नव्हे तो आजारीही पडलो. चांगला मलेरिया झाला. कॉलेजमध्ये असताना लव्हेरिया झाला नाही. पण मुंबईत मच्छरांनी माझ्या निष्कलंक शरीराला मलेरियाने कलंकित केलं. त्यामुळे सात दिवस घरात विश्रांती घ्यावी लागली. ( आहे या पगारात फार्म हाऊस विकत घेणे शक्य नाही. त्यामुळे घरातच विश्रांती ) आता मी आजारी पडलो, याचा पत्नी आणि साडे तीन वर्षाचे चिरंजीव यांना आनंदच झाला. पत्नीने केलेली सेवा आणि चिरंजीवांनी मांडलेला उच्छाद यामुळे 'कभी खुशी कभी गम' अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र पत्नीला आजारी नव-याची दया आली. तिच्या सेवेने मला सात दिवसातच ठणठणीत झाल्यासारखं वाटलं. म्हणून पुन्हा कार्यालयात गेलो. आणि तीन दिवसात पुन्हा आजारी पडलो.
मग पुन्हा खुशी - गम. अर्थात आजारी पडणं वाईटच. आजारपण काढून कार्यालयात ( ऑफीसमध्ये ) गेल्यावर सर्व सहका-यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. हात भर आंतर राखून असणारेही जवळ आले. म्हणजे चौकशी करून गेले. आजारपण काढलेल्या जीवाला जरा बरं वाटलं. तशातच घराचंही काम सुरू आहे. त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रं गोळा करणं, विविध गोष्टींची पूर्तता करणं हे ही ओघानंच आलं. याचाही लिखाणावर परिणाम झालाच.तर अशा अनेक कारणांमुळे यावेळी ब्लॉग लिहणं जरा लांबलं. पण आता मी आलोय. अर्थात कुठे गेलोच नव्हतो. पण हे वाक्य असंच वापरावं लागतं. पुन्हा लिहायला सुरूवात केलीय. तेव्हा असेच आपला नियमीत अनियमीतपणा जपत भेटत राहू. मी सवडीने लिहीन, तुम्हीही सवडीने वाचा. अर्थात आवड असेल तर सवड निघतेच. व्वा लेखाच्या शेवटीही चांगलाच पंच बसला नाही का ? पुन्हा सकारात्मक विचारसरणी.