Thursday, January 24, 2019

नवी इंदिरा, जुनी काँग्रेस !

प्रियंका गांधी वाड्रा यांच्या रूपानं काँग्रेसची नवी इंदिरा राजकारणाच्या मैदानात उतरलीय. गांधी कुटुंबाची पाचवी पिढी राजकारणात आलीय. भाजपच्या आव्हानामुळे जिंकण्याचं मोठं आव्हान असताना काँग्रेसनं हा शेवटचा डाव खेळलाय. काँग्रेसची ही नवी इंदिरा युवा वर्गाला आकर्षित करून पक्षाला जिंकवून देणार का ? याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.
 प्रियांका गांधी वाड्रा आणि इंदिरा गांधी यांच्यातलं साम्य हिच काँग्रेसची सर्वात मोठी शक्ती आहे.इंदिरा गांधींचा चेहरा आणि प्रियंका गांधीचा चेहरा यांच्यात विलक्षण साम्य आहे. दोन्ही नेत्यांचे टेपोरे डोळे बोलके आहेत. दोघांचे धारदार नाक आणि दातांची ठेवणही सारखीच आहे. इंदिरा गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्या केसांची स्टाईलही सारखीच आहे. प्रियंका गांधीत इंदिरा गांधींची सर्व छबी पाहायला मिळते. 
इंदिरा गांधींना जनतेत मिसळून संवाद साधायला आवडायचं. प्रियंका गांधी वाड्रा याही अनेकदा जनतेत मिसळून संवाद साधताना दिसतात.
राहुल गांधींची उत्तर प्रदेशातली कोंडी फोडण्यासाठी प्रियंका यांना उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आलीय. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला सपा आणि बसपानं किंमत दिली नव्हती. या दोघांनी काँग्रेससाठी फक्त दोन जागा सोडल्या होत्या. http://santoshgore.blogspot.com/?m=1
ईस्टर्न युपीची जबाबदारी प्रियंका गांधींकडे देण्यात आलीय. हा भाग बिहारला लागून आहे. या ठिकाणी काँग्रेसचा एकही खासदार नाही. त्यामुळे इथं जिंकलेली प्रत्येक जागा हे काँग्रेस आणि प्रियंका गांधी वाड्रा यांचं यश असेल. 
एकंदरीतच काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीच्या आधी ही मोठी खेळी खेळलीय. प्रियंकाच्या एन्ट्रीचा काँग्रेसला नक्कीच फायदा होऊ शकतो. कारण देशात 40 टक्क्यांपेक्षा जास्त मतदार आहेत. महाराष्ट्रात 26 लाख तरूण मतदारांची भर पडली आहे. या युवा मतदाराला इतर प्रस्थापित नेत्यांपेक्षा प्रियंका गांधी वाड्रा यांच्या रूपातला चेहला नक्कीच आश्वासक वाटू शकतो. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तर ऍडव्हान्टेज काँग्रेस, असं चित्र निर्माण झालंय. http://santoshgore.blogspot.com/?m=1
1980 मध्ये काँग्रेस पक्ष आजच्या सारखाच अशक्त झाला होता. त्यावेळी इंदिरा गांधींनी काँग्रेसला तारलं होतं. आता 2019 मध्ये पुन्हा तेच मॅजिक प्रियंका करतील का हा प्रश्न आहे. आणि तसं झालं तर राहुल गांधींपेक्षा प्रियंकांचं वजन वाढणार हे नक्की. 1966 मध्ये इंदिरा गांधी पहिल्यांदा पंतप्रधान बनल्या त्यावेळी त्यांना मोरारजी देसाईंनी गुंगी गुडिया म्हटलं होतं. पण याच इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे करून जगाचा निकाशा बदलून टाकला. बांग्लादेश युद्ध जिंकल्यानंतरही 1971 च्या निवडणुकीत काँग्रेसला कमी जागा मिळाल्या. देशात वेगवेगळी आंदोलनं सुरू झाली.12 जून 1975 मध्ये इंदिरांची खासदारकी अलाहाबाद उच्च न्यायालयानं रद्द केली. दुसरीकडे जयप्रकाश नारायणांचं आंदोलन परमसीमेवर पोहोचलं होतं. राजकीय अराजकतेतून इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली. त्यानंतर 1977 मध्ये काँग्रेसची सत्ता गेली. काँग्रेससाठी तो अत्यंत वाईट कालखंड होता. http://santoshgore.blogspot.com/?m=1
तशीच परिस्थिती सध्याही आहे. लोकसभेत काँग्रेसचे अवघे 44 खासदार आहेत. मागील पाच वर्षात काँग्रेसला अल्प यश मिळालं. इंदिरा गांधींनी जशी फिनिक्स भरारी घेतली होती, तशीच कामगिरी करण्याचं आव्हान आता प्रियंका गांधींच्या समोर असणार आहे.
मात्र प्रियंका यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे, ते रॉबर्ट वाड्रा यांच्यावर होणा-या आरोपांचं. कारण हेच विरोधकांच्या हातातलं मोठं शस्त्र आहे. रॉबर्ट वाड्रा यांच्या कंपनीने 2008 मध्ये एक पैसाही न खर्चता जमिनीच्या व्यवहारातून 50 कोटी कमावल्याचा आरोप आहे. तर तीच संपत्ती 2012 मध्ये 300 कोटींची झाली. अशोक खेमका या माजी सनदी अधिका-यानं हरियाणातल्या तत्कालीन काँग्रेस सरकारचा 20 हजार कोटींचा जमीन घोटाळा समोर येऊ शकतो, असा दावा केला होता.
आता प्रियंका गांधी वाड्रा या राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे रॉबर्ट वाड्रा यांच्यार झालेले हे विविध आरोप पुन्हा नव्यानं होतील. नव्हे तर त्यांचा वेग वाढेल. नवनव्या चौकशींना सामोरं जावं लागेल. एकंदरीतच प्रियंका यांचं स्वागत जरी दणक्यात झालं असलं तर पुढची वाटचाल तितकी सोपी नाही. हे ही तितकंच खरं. #संगो