Friday, March 26, 2010

अमिताभची उपस्थिती, काँग्रेसला (अ)शोक

मागील दहा वर्षात राज्यातल्या आघाडी सरकारने केलेले दाखवण्यासारखे एकमेव काम म्हणजे वांद्रे - वरळी सी लिंक. अर्थात हा प्रकल्प युतीने मंजूर केला तेव्हाचा त्याचा खर्च आणि नंतर प्रकल्प रेंगाळल्यामुळे त्याचा वाढलेला खर्च हा भाग आपण येथे विचारात घ्यायचा नाही. बरं, दहा वर्षात एकच काम झालं आहे. त्यामुळे एखाद्या दांपत्याला दहा वर्षानंतर अपत्य झालं तर त्यांना जेवढा आनंद होईल तसाच आनंद आघाडी सरकारला व्हावा, यात काही नवल नाही. कारण बाकीच्या आघाडीवर सगळा आनंदीआनंदच आहे. त्यामुळे या एका सी - लिंकचेच चार - चार वेळा उदघाटन करणं सुरू आहे. कधी त्याला राजीव गांधींचे नाव द्या, कधी आठ लेन सुरू झाल्या त्याचा कार्यक्रम कर असे उद्योग आता सुरू आहेत. आणि या कार्यक्रमांमध्येही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कुरघोडीचे राजकारण सुरूच आहे. काँग्रेसचे नाक ठेचण्यासाठीच अमिताभ बच्चनला कार्यक्रमासाठी बोलावण्यात आलं, असाही काही विश्लेषकांचा दावा आहे.
बरं, एकदा कुणाला पाहुणा म्हणून बोलावल्यानंतर मी त्याला बोलावलं नाही. तर लहान्या भावाने बोलावलं असा सूर लावणं म्हणजे पाहुण्यांचा अपमान करण्यासारखंच आहे. अमिताभ बच्चन यांची अमरसिंग यांच्या बरोबरची सलगी, जया बच्चन यांची सपाची खासदारकी यामुळे काँग्रेसची त्यांच्याविषयी नाराजी आहे. मात्र हेच अमिताभ बच्चन एके काळी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले होते. मात्र बोफोर्सच्या भ्रष्टाचाराचे तोफगोळे अंगावर पडल्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि राजकारण यांना रामराम ठोकला. त्यामुळे गांधी आणि बच्चन परिवारामध्ये दुरावा निर्माण झाला. त्यामुळेच हा वांद्रे - वरळी सी लिंकच्या आठ लेन सुरू करण्याच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना 'मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है ?' असा पवित्रा घ्यावा लागला. इतकंच नव्हे तर अमिताभ या कार्यक्रमाला येणार आहेत, याची माहिती नव्हती असंही अशोकराव म्हणाले. काय राव तुम्ही, मुख्यमंत्री असून कार्यक्रमाला कुणाची उपस्थिती राहणार हे तुम्हाला माहित नाही ? तुमच्याच मंत्रीमंडळातले मंत्री अब्दुल सत्तार तुमच्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करत लाथांनी तुडवतात. सर्व चॅनेल्स ते टीव्हीवर दाखवतात. तरी तुम्हाला त्याची माहिती नसते. किंवा हा विषय तितका महत्वाचा नसतो. तुमचंही बरोबर आहे. कारण अब्दुल सत्तार सारखे हिरे काँग्रेसच्या सत्तेच्या हाराची शोभा वाढवतात. यांचा चेहरा गुंड असला तरी त्यांच्या पाठीमागे मोठी वोट बँक असते.
राजकारण आणि समाजकारण करताना इतकी क्षुद्र मनोवृत्ती दाखवणं हे काही मोठेपणाचं लक्षण नाही. एखाद्याला पाहुणा म्हणून बोलवायचं आणि या पद्धतीने अपमानीत करायचं यातून राजकारण्यांच्या मनाचा कोतेपणा दिसून येतो. गांधी आणि बच्चन यांच्या इगो प्रॉब्लेममध्ये आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मात्र पार भजं झालं आहे. यापुढे तर आता अमिताभ बच्चन ज्या मार्गाने जाणार असतील तो मार्गही टाळणं मुख्यमंत्र्यांसाठी श्रेयस्कर ठरेल. नाही तर बो-या, बिस्तरा गुंडाळून नांदेडचा मार्ग त्यांना धरावा लागेल. मात्र इथं गांधी परिवाराला खुश करण्यासाठी त्यांना एक दुसरा मार्ग सुचवता येईल. चव्हाण यांनी पुन्हा या सी लिंक वर असाच काहीतरी सटरफटर कार्यक्रम ठेवावा. त्यासाठी अभिनेता शाहरूख खानला बोलवावं. मग बघा अशोकराव गांधी घराणं तुमच्यावर कसं खुश होतं. प्रियंका आणि राहूल गांधींचा हा खान दोस्त एकदा बोलवाच आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बाजी उलटवून लावत व्हा 'बाजीगर'.

खमंग फोडणी
अमिताभ बच्चन पुण्याच्या साहित्य संमेलनात हजर राहणार असल्यास त्यांच्या बरोबर एका व्यासपीठावर उपस्थित राहू नये, अशी तंबी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना हायकमांडकडून देण्यात आली आहे. काय म्हणावं या काँग्रेसला ? अमिताभ बच्चन आणि अशोकराव चव्हाण हे दोघेही मुंबई या शहरात राहतात. मग आता हायकमांड काय 'वर्षा' बंगला नांदेडला हलविण्याचा आदेश देणार आहे का ?

Friday, March 19, 2010

या, संभाजीनगरावर भगवं निशाण आहे !

औरंगाबाद नाव उच्चारलं तरी डोळ्यासमोर येतात दंगलींचा हिरवागार इतिहास असलेली रक्ताळलेली पानं. कोणतंही कारण असो अथवा नसो सिटी चौकातून हातात तलवारी आणि चाकू घेऊन मुस्लिमांचा जमाव गुलमंडीवर कधी चालून येईल याचा नेम नसायचा. खेड्यापाड्यातून आलेल्या शेतक-याला मोंढ्याच्या परिसरात दिवसा ढवळ्या मुस्लिम गुंडांकडून लुटलं जायचं. गणेशोत्सव, शिवजयंती हे सणही भीतीच्या सावटाखालीच साजरे करावे लागायचे. मुस्लिमांच्या वस्तीतून जाताना हिंदूंना कायम दहशतीतूनच जावं लागायचं. छोट्या रस्त्यांवर चुकून एखाद्या मुस्लिमाला धक्का लागला तरी हिंदूंना चोप मिळायचा. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने हिंदूस्थान विरूध्द क्रिकेटची मॅच जिंकली तर मुस्लिमांच्या मोहल्ल्यात वाजणा-या फटाख्यांचा आवाज सगळ्या शहराला ऐकू जायचा. मुस्लिम वस्त्यांमधील हॉटेल्स आणि दुकानांमध्ये इम्रान खान, वासिम अक्रम, जावेद मियाँदाद, इंझमाम उल हक यांचीच पोस्टर्स सर्रासपणे लावलेली असायची.
मात्र महापालिकेची पहिली निवडणूक जाहीर झाली आणि दहशतीचं चित्र बदलायला सुरूवात झाली. महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे वाघ उतरले. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मराठवाड्यातली पहिली विराट सभा झाली. दबलेल्या आणि हिंमत हारलेल्या हिंदूंना धीर आणि बळ देणारी ही ऐतिहासिक सभा ठरली. याच सभेत हिंदूच्या गुलामीचं आणि मुस्लिम आक्रमकांचे प्रतिक असलेले शहराचे औरंगाबाद हे नाव गाडून टाकण्यात आलं. बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराला नवं नाव दिलं, संभाजीनगर. आता संभाजीनगर या नावाबरोबर जोडली गेली आहे, ती हिंदूंची अस्मिता. आणि गाडून टाकलं आहे आमच्या मानगुटीवर असलेले गुलामीच्या जोखडाचे प्रतीक असलेले औरंगाबाद. बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचाराने भारलेल्या शहरवासीयांनी 1988 मध्ये शिवसेनेचे तब्बल 27 नगरसेवक निवडून दिले. मात्र महापौर पदाच्या निवडणुकीवरून शहरात दंगल पेटली. महापालिकेची निवडणूक होण्यापूर्वीच 'शिवसेना चुनके आयी तो दंगे करावूंगा' अशी धमकीच काँग्रेसच्या तत्कालीन आमदाराने दिली होती. ही धमकी खरी झाली. संभाजीनगरमध्ये दंगल पेटली. या दंगलीचे लोन बिडकीन, पैठण आणि जालन्यापर्यंत पोहोचले. पोलिसांच्या गोळीबारात 20 जण ठार झाले. काँग्रेसच्या हायकमांडला याची दखल घ्यावी लागली.
तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना तातडीने शहरात दाखल व्हावं लागलं. मात्र ही दंगल शंकरराव चव्हाणांना बाधली, शंकरराव चव्हाणांना राजीनामा द्यावा लागला. शहराचा पहिला महापौर काँग्रेसने दिला. मात्र इथूनच सुरू झाला शिवसेनेचा झंझावात. एखाद्या वनव्याप्रमाणे शिवसेना मराठवाड्यात पसरली. निझामी रजाकारांच्या पिलावळींनी मराठवाडा स्वतंत्र झाला तरी कित्येक ठिकाणी उच्छाद मांडलेला होता. रजाकारांच्या या औलादींच्या शिवसैनिकांनी मुसक्या आवळल्या. दंगलीच्या वेदना जपत आणि भीतीच्या छायेखाली जगणा-या नागरिकांना आधार दिला तो शिवसेना आणि शिवसैनिकांनी. गावागावात शिवसेनेची व्याघ्रमुद्रा नागरिकांचे स्वागत करू लागली.
1988 च्या महापालिका यशानंतर विधानसभा, लोकसभा या मोठ्या निवडणुकांसह इतर सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामान्य कार्यकर्ते शिवसेनेने निवडून पाठवले. जात, पैसा यांना महत्व न देता रस्त्यावरील कार्यकर्त्यांना नेते केले, ते शिवसेनेने. मागील 22 वर्षात महापालिकेच्या सगळ्याच निवडणुकांमध्ये जनतेने शिवसेनेला भरभरून मतांचे दान दिले. या निवडणुकीतही संभाजीनगरवरील भगवं निशाण कायमच राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत प्रदीप जैस्वाल सहानुभुतीच्या जोरावर आणि शिवसेनेत परतणार आहे या सुप्त प्रचाराच्या पाठिंब्याने निवडून आले होते. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. आणि आता काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महापालिका निवडणुकीसाठी आघाडी केली आहे. त्यामुळे प्रदीप जैस्वाल यांना विधानसभा निवडणुकीच्या मिळालेली सहानुभुतीची लाट आता ओसरली आहे.
इथल्या जनतेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मतं द्यावी तरी कशासाठी ? उद्योगमंत्री आणि काँग्रेसचे आमदार राजेंद्र दर्डा यांच्या विरोधात कलम 306 अन्वये गुन्हा दाखल आहे. दर्डा यांच्या दबावामुळे आत्महत्या करत असल्याची मृत्यूपूर्व जबानी माजी नगरसेवक गणेश तांबे यांनी दिलेली आहे. मात्र सरकारमध्ये उद्योग मंत्री असलेल्या दर्डांविरूद्ध अजूनही कारवाई झालेली नाही. तर असे हे उद्योगमंत्री जर काँग्रेसच्या ताब्यात महापालिका आली तर विद्यमान आमदारांनाही आत्महत्या करायला लावतील, अशी शंका तांबे प्रकरणावरून मनात येते. त्यामुळे काँग्रेसची गाडून टाकलेली दहशत पुन्हा उभी राहू द्यायची नसेल तर शिवसेनाच पुन्हा निवडून यायला हवी.
1988 मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीच्यावेळी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते. तर आता त्यांचे चिरंजीव अ'शोक'राव चव्हाण हे मुख्यमंत्री आहेत. त्यावेळी तत्कालीन आमदाराने दंगली घडवण्याची धमकी दिली होती. तोच इतिहास पुन्हा तर प्रत्यक्षात येणार नाही ना ? कारण आताच्या आमदाराने तर एक माजी नगरसेवकालाच आत्महत्या करायला लावलेली आहे. दंगली घडवून मुख्यमंत्री बदलणे ही काँग्रेसची परंपराच आहे. त्यामुळे आता नागरिकांनीही सावधान रहायला हवं. कारण राज्यातल्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. त्यांच्या इच्छेसाठी शहर पुन्हा दंगलीच्या वणव्यात लोटू देऊ नका.
इथला सामान्य नागरिक हा शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा आहे. बाळासाहेबांच्या प्रत्येक सभेला इथल्या नागरिकांना प्रतिसाद दिलेला आहे. वयोमानपरत्वे बाळासाहेब ठाकरे शहरात सभा घेणं शक्य नाही. मात्र त्यांनी इथे घेतलेल्या सभांचे शब्द अजूनही कानात घुमत आहेत. त्यांनी दिलेली हिंम्मतच दंगलखोरांच्या विरोधात उभी राहण्यासाठी शक्ती देणारी ठरलेली आहे. त्यामुळे शहरातील नागरिक या संभाजीनगरावरील भगवं निशाण कायम ठेवतील यात शंका नाही. कारण संभाजीनगर हे मराठवड्याचे पॉवर हाऊस आहे. इथं असलेली शिवसेनेची सत्ता हिच मराठवाड्यातील शिवसेनेला आधार देण्याचे काम करते. त्यामुळे होऊन जाऊ द्या पुन्हा ऐकदा एल्गार. करा हिंदूंची वज्रमुठ, कायम ठेवा भगवं निशाण, आणि काँग्रेसला द्या मुठमाती.

Tuesday, March 2, 2010

षंढांच्या देशातला मर्द - शिवाजी महाराज

हिंदुस्थान, भारत, इंडिया देशाच्या नावातसुद्धा एकमत नाही, अशा देशातले आम्ही रहिवासी. कायम गुलामीत राहण्याची सवय लागलेले इथले सगळे देशवासी. परकीय इंग्रजांची दिडशे वर्ष गुलामी केली. त्यांच्याआधी मोगल, आदिलशाही, निझाम या मुस्लीम राज्यकर्त्यांचे घावही सोसले. 15 ऑगस्ट 1947 म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ( स्वातंत्र्य म्हणजे काय रे भाऊ ? असं मात्र कुणी विचारू नका. ) देशी काळ्या इंग्रजांची गुलामी करण्यात आपण धन्यता मानतो आहोत.

मात्र या देशात एक अपवाद वगळता चमत्कार घडला. आणि तो चमत्कार घडवला छत्रपती शिवाजी महाराजांनी. त्यांचीच आज जयंती. मोगलाई आणि आदिलशाहीच्या अन्यायकारी राज्यात हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. मोजक्या मावळ्यांसह सुरू केलेला स्वराज्याचा प्रवास त्यांच्या छत्रपती पदापर्यंत सुरू होता. मुस्लिम राज्यकर्त्यांच्या जाचात पिचलेल्या जनतेचा हुंकार म्हणजे शिवाजी महाराज. वर्षानुवर्ष जुलूम भोगणा-या जनतेचा स्वाभिमान म्हणजे शिवाजी महाराज. हा देश आज जो काही किमान धर्मनिरपेक्ष म्हणवण्याच्या लायकीचा उरला आहे, तो सुद्धा शिवाजी महाराजांमुळेच. कारण शिवाजी महाराजांनी पराक्रम गाजवण्यापूर्वी या देशात मोगलाई कशी माजली होत त्याचं कविराज भूषण यांनी केलेलं वर्णन बघा कसं सार्थ आहे.

देवल गिराविते, फिराविते निसान अली ।ऐसे डूबे रावराने, सबी गए लबकी ।गौर गणपती आप, औरनको देत ताप ।आपनी ही बार सब, मारी गये दबकी ।पीरा पैगंबर, दिगंबर दिखाई देत ।सिद्ध की सिद्धाई गई, रही बात रब की ।कासी की कला गई, मथुरा मस्जिद भई ।गर सिवाजी न होते तो, सुन्नत होती सबकी ॥… कविराज भूषण

आज या देशाला आपण भारत आणि हिंदुस्थान म्हणू शकतो ते फक्त शिवाजी महाराजांमुळेच. नसता या राज्यात आतापर्यंत सगळ्यांची सुंता होऊन सगळे लुंगीत फिरताना आणि अल्ला हु अकबरचे नारे लावताना दिसले असते. मात्र शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वामुळे महाराष्ट्रावर हिरव्या रंगाची चादर चढू शकली नाही. देशाचा कणा ताठ राहिला. मराठा सैन्य अटकेपार झेंडा फडकावू शकलं. नसता आपल्या देशाचा इतिहास हा फक्त गुलामीचा आणि गद्दारीचाच आहे. कुणाची तरी चाकरी करणं किंवा जोडे उचलणं हेच आमच्या रक्तात आहे. मग जोडे उचलण्यासाठी मोगल, मुस्लिम किंवा गांधी कुणीही चालतात. फक्त इमानाने चाकरी, गुलामी करून जोड्यांपाशी निष्ठा वाहणा-यांची परंपरा आजही जोपासनं सुरूच आहे.

देशात आता पर्यंत हजारो राजे-महाराजे झाले. मात्र कोणत्या राजाची आजच्या काळात जयंती साजरी केली जाते का ? देशात नव्हे तर परदेशातही अनेक राजे झाले. मात्र शिवाजी महाराजांसारखी जयंती साजरी होण्याचं मात्र त्यांच्या नशिबात नाही.शिवाजी महाराजांनी या देशात हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. मात्र आज देश नावाची चीज आहे का ? शीखांचे पाकिस्तानात मुंडके छाटलं जातंय. भरदिवसा पाकिस्तानात हिंदू मुलींचे अपहरण होऊन त्या बाटवल्या जाताहेत. त्यांचा नंतर ठावठिकाणा लागत नाही. आणि इथं मुस्लीम या देशाचे जावई झाले आहेत. देशातल्या प्रमुख शहरांमध्ये अतिरेक्यांचा स्लिपर सेल तयार झालाय. कोणत्या शहरात कुठे, कधी बॉम्बस्फोट होईल याचा भरवसा राहिलेला नाही. पाकिस्तानच्या अतिरेकी संघटनांनी इथं जाळं पसरलंय. आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना आपल्या देशात क्रिकेट खेळू द्यावं यासाठी शाहरूख खान गळा काढतोय. सरकारनेही विशेष अध्यादेश काढून शाहरूखच्या टीममध्ये पाकिस्तानी खेळाडू घेऊ द्यावेत. पाकिस्तानी प्लेअरची मॅच पाहण्याची तिकीटे अल्प दरात मुंबई हल्ल्यातल्या शहीदांच्या कुटुंबियांना द्यावी. तसंच पुण्यातल्या जर्मन बेकरीत ठार झालेल्यांच्या कुटुंबियांनाही पाकिस्तानी खेळाडूंचा खेळ बघू द्यावा. काय देश देश करता ? पाकिस्तानच्या खेळाडूंचा खेळ बघा, पोलीस संरक्षणात माय नेम इज खान बघा. काय बरं वाटतं ना ? इथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार, कार्यकर्ते चित्रपट बघतात त्यात काय वाईट वाटायचं. आता ज्यांनी चित्रपट पाहिले त्या वीरांनाच सीमेवर संरक्षणासाठी पाठवा आणि सीमेपलीकडील खानांना त्यांचे नाव विचारायला सांगा.
शाहरूखच्या सिनेमाला संरक्षण देण्यासाठी सर्व पोलीस सुंता केल्यासारखे सिनेमा हॉलच्या बाहेर उभे केले.
मतांसाठी अशोकराव सुंता करून डोक्यावर गोल टोपी घालून मशिदीबाहेर उभे राहिले तरी नवल वाटायला नको. मतांसाठी 'स्वाभिमान' गहाण ठेवणा-या नेत्यांना आता तरी जागा. हिंदूंना बाटवण्यासाठी धर्मांध मुस्लिम संघटना, मिशनरीज टपल्या आहेत. पैशाच्या जोरावर आदिवासी, दलित, आणि गरिब हिंदूंचं धर्मांतर सुरू आहे. बांग्लादेशी घुसखोरांचा टक्का दिवसेंदिवस वाढत चाललाय. प्रत्येक शहरात मुस्लिमांचे पॉकेट्स तयार होत आहेत. याच गतीनं जर धर्मांतर आणि मुस्लिम टक्का वाढत राहिला तर 272 पेक्षा जास्त मुस्लिम खासदार संसदेत निवडून गेल्यावर हा देश धर्मनिरपेक्ष राहिल का ? 272 मुस्लिम खासदार संसदेत गेले तर ते या देशाची घटना मानतील का ? जे मुस्लिम भारत हा देशच मानत नाहीत. ज्यांना इस्लामी राज्य स्थापन करायचं आहे, त्यांच्यासाठी घटना, संसद काही महत्वाच्या नाहीत. हे लक्षात ठेवा.
शिवाजी महाराजांनी जशी धार्मिक सहिष्णूता जपली त्याच पद्धतीने राज्यही केले. मात्र वेळ आल्यावर स्वराज्यावर चालून आलेल्या अफझल खानाचा कोथळाही त्यांनी काढलाच होता. मुस्लिम झालेल्या नेताजी पालकरचं शुद्धिकरण करून त्याला पुन्हा स्वधर्मात घेतलं होतं.
आज पुन्हा शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करून जागं होण्याची वेळ आली आहे. धर्मांधांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे. धार्मिक सहिष्णुता आम्ही जपू. मात्र देशाच्या मुळावर येणा-यांचा कोथळाच काढू, असं सांगण्याची ताकद इथल्या राज्यकर्त्यांमध्ये निर्माण होवो, हिच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना.